- मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून, आज कोरोनाच्या ९,८९५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच, आज ६,४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के असून आतापर्यत बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ९४ हजार २५३ झाली आहे. सध्या राज्यात १ लाख ४० हजार ०९२ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
सविस्तर वाचा :राज्यात आज १० हजार नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद; तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २ लाखांजवळ..
- मुंबई - मुंबईत आज कोरोनाचे 1,257 नवे रुग्ण आढळून आले असून 55 मृत्यूंची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 5 हजार 829वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा 5,927 वर पोहचला आहे. मुंबईत आज एकाच दिवशी 1,984 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सविस्तर वाचा :दिलासादायक! मुंबईत आज नव्या रुग्णांहूनही बरे झालेले रुग्ण अधिक; एकूण संख्या पोहोचली १,०५,८२९वर..
- गडचिरोली: कोरोनाचा संसर्ग गडचिरोली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात हातपाय पसरत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 424 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे, 286 रुग्ण हे सुरक्षा दलाचे जवान आहेत. नक्षल कारवायांसाठी हॉटस्पॉट असलेल्या अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यात ज्या जवानांवर नक्षल कारवाया रोखण्याचे आव्हान आहे, त्याच जवानांना आता अलगीकरणात राहून कोरोनाशी लढा द्यावा लागत आहे.
सविस्तर वाचा :Exclusive : सुरक्षा दलाचे 286 जवान कोरोनाबधित, मात्र सुरक्षा यंत्रणा खंबीर! पाहा विशेष मुलाखत...
- मुंबई : डॉक्टर, आरोग्य सेवक पोलीस यांच्याप्रमाणेच विविध महापालिकांचे कर्मचारी देखील कोरोना योद्धेच ठरले आहेत. महामारीपासून सर्वसामान्यांचा बचाव करण्यासाठी हे सर्व योद्धे जीवाचे रान करत आहेत. पण कोरोनाचा विळखा या योद्ध्यांनाही बसला आहे. त्यात विविध पालिकांच्या कर्मचाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. यासंर्भात 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला विशेष आढावा...
सविस्तर वाचा :ईटीव्ही भारत विशेष: राज्यातील पालिका कर्मचाऱ्यांची कोरोना काळात दमदार कामगिरी
- ठाणे- ठाणे महानगपालिकेचे कळवा स्थित छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेहमीच गडबड घोटाळा होत असल्याचे आढळून आले आहे. आता पुन्हा एकदा या रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघाले आहेत. येथील दोन कोरोनाबाधित रुग्णांनी पळ काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सविस्तर वाचा :ठाण्यातील कळवा रुग्णालयातून दोन कोरोना रुग्ण पळाले
- मुंबई-- सर्वसामान्यांना कोरोनाची लागण होत असताना कोरोना योद्धा म्हणून आघाडीवर लढणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या मृत्यूचा आकडा चिंता वाढविणारा आहे. राज्याच्या आयुष टास्क फोर्सच्या माहितीनुसार राज्यात कोरोनामुळे 86 आयुष डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. आयुष डॉक्टरांनाही 50 लाखांचा विमा देण्याची मागणी करण्यात येत आहे.