ETV Bharat / state

कुणी रस्ता देता का रस्ता! रस्ता नसल्यानं चक्क बैलगाडीतून न्यावा लागला मृतदेह; स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही दयनीय स्थिती - Chhatrapati Sambhajinagar Road

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2024, 9:40 PM IST

Chhatrapati Sambhajinagar Road Issue : 'बुलेट ट्रेन' धावण्याच्या मार्गावर सध्या आपण आहोत. अवघ्या काही तासातच हजारो किलोमीटरचं अंतर पार करू शकतो, इतका विकास भारतात झालाय. शहरांसह काही ग्रामीण भागातील नागरिकांचं राहणीमान उंचावलंय. आताच आपण 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. मात्र, तरीही आज ग्रामीण भागात रस्त्यांची बोंबाबोब आहे.

Chhatrapati Sambhajinagar News
बैलगाडीवरून नेला मृतदेह (Source - ETV Bharat Reporter)

छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar Road Issue : देशाची झपाट्यानं प्रगती होत आहे, त्यात दोन जिल्ह्यांना जोडणारे रस्ते मोठे आणि मजबूत होत असल्यानं प्रवास सुखकर होत असल्याचा दावा नेहमीच केला जातो. मात्र, आधुनिक युगात आजही ग्रामीण भागातील रस्ते तयार होण्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागते. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्यानं मृतदेह चक्क बैलगाडीवरून नेण्याची वेळ एका कुटुंबीयांवर आली. गल्लेबोरगावमधील अंधार मळा येथे ही धक्कादायक घटना घडली.

मृतदेह नेण्यासाठी बैलगाडीचा वापर : गल्लेबोरगाव गावाजवळ असलेल्या अंधार मळा परिसरात 25 ते 30 शेतकरी राहतात. या परिसरातील तत्कालीन तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी कच्चा रस्ता तयार करून दिला होता. मात्र, हा कच्चा रस्ता असल्यानं पावसाळ्यात पाणी साचून रस्त्यावर चिखल होतो. त्यामुळं या भागातील लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एखाद्या व्यक्तीची प्रकृती बिघडली तर त्याला या रस्त्यावरून नेणं कठीण होतं. अंधार मळा परिसरात राहणाऱ्या ठकडाबाई रखमाजी शेवारे यांचं सोमवारी रात्री निधन झालं. अंधार मळा ते गल्लेबोरगाव हा कच्चा रस्ता अडीच किलोमीटरचा असून, गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता जलमय व चिखलमय झाला. त्यामुळं ठकडाबाई यांचा मृतदेह नेण्यासाठी बैलगाडीचा वापर करावा लागला. रस्ता नसल्यानं चिखलातून मार्ग काढण्यासाठी लोकांना बैलगाड्यांवर अवलंबून राहावं लागतं आहे.


रस्ता चांगला करण्याची मागणी : रस्त्याअभावी अंत्यसंस्कारासाठी मृतदेह बैलगाडीतून न्यावा लागला. या घटनेनं प्रशासनाला आता तरी जाग येणार का? लोकप्रतिनिधी या रस्त्याचं मजबुतीकरण करून डांबरीकरण करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. अंधार मळा ते गल्लेबोरगाव रस्त्याचं मजबुतीकरण व डांबरीकरण करावं, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली.

हेही वाचा

  1. बिस्किट खायला गेला अन् आई-वडिलांचा एकुलता एक आयुष हरपला; वाचा नेमकं काय घडलं - Thane Crime News
  2. इमारतीच्या टेरेसवरून पडून तरुणीचा मृत्यू, अल्पवयीन प्रियकराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल - Mumbai crime
  3. पालघर हादरलं! हातपाय बांधलेल्या अवस्थेत नाल्यात आढळला महिलेचा मृतदेह, मुलगी बेपत्ता - Palghar Crime News

छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar Road Issue : देशाची झपाट्यानं प्रगती होत आहे, त्यात दोन जिल्ह्यांना जोडणारे रस्ते मोठे आणि मजबूत होत असल्यानं प्रवास सुखकर होत असल्याचा दावा नेहमीच केला जातो. मात्र, आधुनिक युगात आजही ग्रामीण भागातील रस्ते तयार होण्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागते. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्यानं मृतदेह चक्क बैलगाडीवरून नेण्याची वेळ एका कुटुंबीयांवर आली. गल्लेबोरगावमधील अंधार मळा येथे ही धक्कादायक घटना घडली.

मृतदेह नेण्यासाठी बैलगाडीचा वापर : गल्लेबोरगाव गावाजवळ असलेल्या अंधार मळा परिसरात 25 ते 30 शेतकरी राहतात. या परिसरातील तत्कालीन तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी कच्चा रस्ता तयार करून दिला होता. मात्र, हा कच्चा रस्ता असल्यानं पावसाळ्यात पाणी साचून रस्त्यावर चिखल होतो. त्यामुळं या भागातील लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एखाद्या व्यक्तीची प्रकृती बिघडली तर त्याला या रस्त्यावरून नेणं कठीण होतं. अंधार मळा परिसरात राहणाऱ्या ठकडाबाई रखमाजी शेवारे यांचं सोमवारी रात्री निधन झालं. अंधार मळा ते गल्लेबोरगाव हा कच्चा रस्ता अडीच किलोमीटरचा असून, गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता जलमय व चिखलमय झाला. त्यामुळं ठकडाबाई यांचा मृतदेह नेण्यासाठी बैलगाडीचा वापर करावा लागला. रस्ता नसल्यानं चिखलातून मार्ग काढण्यासाठी लोकांना बैलगाड्यांवर अवलंबून राहावं लागतं आहे.


रस्ता चांगला करण्याची मागणी : रस्त्याअभावी अंत्यसंस्कारासाठी मृतदेह बैलगाडीतून न्यावा लागला. या घटनेनं प्रशासनाला आता तरी जाग येणार का? लोकप्रतिनिधी या रस्त्याचं मजबुतीकरण करून डांबरीकरण करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. अंधार मळा ते गल्लेबोरगाव रस्त्याचं मजबुतीकरण व डांबरीकरण करावं, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली.

हेही वाचा

  1. बिस्किट खायला गेला अन् आई-वडिलांचा एकुलता एक आयुष हरपला; वाचा नेमकं काय घडलं - Thane Crime News
  2. इमारतीच्या टेरेसवरून पडून तरुणीचा मृत्यू, अल्पवयीन प्रियकराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल - Mumbai crime
  3. पालघर हादरलं! हातपाय बांधलेल्या अवस्थेत नाल्यात आढळला महिलेचा मृतदेह, मुलगी बेपत्ता - Palghar Crime News
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.