ETV Bharat / sports

टी 20 विश्वचषकातील भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यापूर्वी पंतप्रधान मोदींच्या दोन्ही संघांना शुभेच्छा, म्हणाले... - t20 world cup 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 5:10 PM IST

PM Modi Wishes for IND vs BAN Match : टी 20 विश्वचषकात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज सुपर-8 फेरीत सामना रंगणार आहे. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या या सामन्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी दोन्ही क्रिकेट संघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

नवी दिल्ली PM Modi Wishes for IND vs BAN Match : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी 20 क्रिकेट विश्वचषकात आज सुपर-8 फेरीत भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना रंगणार आहे. भारतीय संघ हा सामना जिंकून उपांत्य फेरीतलं आपलं स्थान पक्कं करण्याचा प्रयत्न करेल, तर बांगलादेशला सुपर-8 मधील पहिल्या विजयाचे वेध लागले आहेत. या सामन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी : पंतप्रधान मोदींनी शनिवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरुन बांगलादेशच्या पंतप्रधान दोन दिवसांच्या दौऱ्यावर शुक्रवारी भारतात आल्या आहेत. याशिवाय दोन्ही नेत्यांनी सशस्त्र दलांचं आधुनिकीकरण, दहशतवाद आणि कट्टरवाद यावरही चर्चा केली. या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी दोन्ही संघांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "टी 20 विश्वचषकातील आजच्या सामन्यासाठी मी भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा विकासातील भागीदार आहे आणि आम्ही बांगलादेशसोबतच्या आमच्या संबंधांना सर्वोच्च प्राधान्य देतो."

उपांत्य फेरीत स्थान पक्कं करण्याचा भारताचा प्रयत्न : आज भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरेल तेव्हा विजय मिळवून विश्वचषकातील विजयाची घोडदौड सुरू ठेवण्याचं त्यांचं लक्ष्य असेल. या सामन्यानंतर भारतीय संघ 24 तारखेला ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. मात्र, भारतीय संघानं आजच्या सामन्यात विजय मिळवला तर उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यावर अवलंबून राहावं लागणार नाही. त्यामुळं भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत आजचा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. तोच दुसरीकडे मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर बांगलादेशल या सामन्यात विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल.

हेही वाचा :

  1. वेस्ट इंडिजनं अमेरिकेला लोळवलं; अवघ्या 10.5 षटकात जिंकला सामना, शाई होपची वादळी खेळी
  2. बांगलादेशसमोर टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्याचं आव्हान; कोणाचं पारडं जड? जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड
  3. कोहलीच्या 'या विराट' विक्रमाची सूर्यानं त्याच्यापेक्षा निम्मे सामने खेळून केली बरोबरी

नवी दिल्ली PM Modi Wishes for IND vs BAN Match : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी 20 क्रिकेट विश्वचषकात आज सुपर-8 फेरीत भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना रंगणार आहे. भारतीय संघ हा सामना जिंकून उपांत्य फेरीतलं आपलं स्थान पक्कं करण्याचा प्रयत्न करेल, तर बांगलादेशला सुपर-8 मधील पहिल्या विजयाचे वेध लागले आहेत. या सामन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी : पंतप्रधान मोदींनी शनिवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरुन बांगलादेशच्या पंतप्रधान दोन दिवसांच्या दौऱ्यावर शुक्रवारी भारतात आल्या आहेत. याशिवाय दोन्ही नेत्यांनी सशस्त्र दलांचं आधुनिकीकरण, दहशतवाद आणि कट्टरवाद यावरही चर्चा केली. या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी दोन्ही संघांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "टी 20 विश्वचषकातील आजच्या सामन्यासाठी मी भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा विकासातील भागीदार आहे आणि आम्ही बांगलादेशसोबतच्या आमच्या संबंधांना सर्वोच्च प्राधान्य देतो."

उपांत्य फेरीत स्थान पक्कं करण्याचा भारताचा प्रयत्न : आज भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरेल तेव्हा विजय मिळवून विश्वचषकातील विजयाची घोडदौड सुरू ठेवण्याचं त्यांचं लक्ष्य असेल. या सामन्यानंतर भारतीय संघ 24 तारखेला ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. मात्र, भारतीय संघानं आजच्या सामन्यात विजय मिळवला तर उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यावर अवलंबून राहावं लागणार नाही. त्यामुळं भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत आजचा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. तोच दुसरीकडे मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर बांगलादेशल या सामन्यात विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल.

हेही वाचा :

  1. वेस्ट इंडिजनं अमेरिकेला लोळवलं; अवघ्या 10.5 षटकात जिंकला सामना, शाई होपची वादळी खेळी
  2. बांगलादेशसमोर टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्याचं आव्हान; कोणाचं पारडं जड? जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड
  3. कोहलीच्या 'या विराट' विक्रमाची सूर्यानं त्याच्यापेक्षा निम्मे सामने खेळून केली बरोबरी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.