ETV Bharat / opinion

बंगालमध्ये यावर्षीचा पावसाळा ममता बॅनर्जींसाठी अस्तित्वाची लढाई ठरू शकतो - MAMATA ARMAGEDDON MOMENT

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2024, 4:56 PM IST

Mamata Armageddon moment - कोलकात्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर बलात्कार आणि खून प्रकरण खूपच गाजत आहे. मात्र यानंतर उसळलेला जनक्षोभ हाताळण्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कुठेतरी फसगत झाल्याचं दिसतंय. हे त्यांना महागात पडू शकतं. याविषयी दीपंकर बोस यांचा लेख.

बंगालमधील आंदोलन, इन्सेटमध्ये ममता बॅनर्जी
बंगालमधील आंदोलन, इन्सेटमध्ये ममता बॅनर्जी (AP)

कोलकाता Mamata Armageddon moment : कोलकाता येथील आकर्षक युवा भारती क्रीडांगण (सॉल्ट लेक स्टेडियम) अनेक घडामोडींचं एक जुनं साक्षीदार आहे. या भव्य स्टेडियममध्ये एक लाखाहून अधिक प्रेक्षक बसू शकतात आणि शहरातील सर्वात मोठ्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं जातं.

जनतेचा सवाल - नुकतंच 18 ऑगस्ट रोजी हे स्टेडियम ऐतिहासिक ड्युरंड चषक स्पर्धेसाठी सज्ज होतं. कट्टर प्रतिस्पर्धी मोहन बागान आणि पूर्व बंगाल भिडणार होते. संघ तयार होते, खेळाडू तयार होते, आयोजक तयार होते, पण प्रशासन मात्र तयार नव्हतं. कारणच तसं होतं. 14 ऑगस्टच्या रात्रीचं आंदोलन. हिंसक जमावाने पोलिसांना झुगारून आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये घुसखोरी केली. या ठिकाणी 31 वर्षीय महिला वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. आंदोलक एवढे चिडले होते की, प्रशासनाने सामना आयोजकांना सांगितलं की सामन्यासाठी सुरक्षा पुरवली जाऊ शकत नाही. परिणामी सामना रद्द करण्यात आला.

पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा केला
पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा केला (AP)

सरकारचा अंदाज चुकला - बंगाल प्रशासनाला वाटलं की त्यांनी पहिली लढाई जिंकली. पण, लक्षात आलं की प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. रविवारी दोन क्लबच्या हजारो समर्थकांनी स्टेडियमबाहेर निदर्शनं केली. “जर सरकार आमचा निषेध रोखण्यासाठी एवढा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करू शकते, तर स्टेडियमच्या आत सुरक्षा पुरवू शकत नसल्याच्या बहाण्याने त्यांना सामना रद्द करण्यास कशामुळे प्रवृत्त केलं? ते कोणाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत? असे सवाल विचारले जाऊ लागले. त्यातच आणखी एका फुटबॉल संघाने म्हणजेच मोहम्मडन स्पोर्टिंग क्लबच्या समर्थकांनी आरजी कार मधील डॉक्टरांना न्याय देण्याची मागणी केली.

27 ऑगस्ट 2024 रोजी कोलकाता येथे पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या
27 ऑगस्ट 2024 रोजी कोलकाता येथे पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या (AP)

महिलांचा आंदोलनात मोठा सहभाग - वास्तविक 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्री, जेव्हा बंगालमधील हजारो लोक बलात्कार आणि खून झालेल्या डॉक्टरला 'न्याय' मागण्यासाठी रस्त्यावर उतरले होते तेव्हा त्यांचा आवाज मोठा होता. कोलकातामध्ये प्रचंड मेळावे काही नवीन नाहीत. किंबहुना, कोलकात्याचं ते स्वभाववैशिष्ट्य आहे. पण, जेव्हा मोठ्या प्रमाणावर जमवाजमव होते, त्यातही प्रामुख्याने महिलांनी ‘रिक्लेम द नाईट’ मोहिमेला प्रतिसाद दिला, तेव्हा रस्त्यावरचा संताप दिसून आला. ही आग तेव्हापासून थांबलेली नाही. स्टेडियमबाहेरच्या निदर्शनांद्वारे, महाविद्यालय आणि विद्यापीठ कॅम्पस, न्यायालये, आयटी हब, वैद्यकीय संस्था किंवा परफॉर्मिंग आर्ट्स स्पेस आणि आता शाळांमधून हा प्रश्न अधिक तीव्रतेनं उपस्थित होत आहे.

डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येचा निषेध करणाऱ्या एकाला पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केली
डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येचा निषेध करणाऱ्या एकाला पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केली (AP)

परिस्थितीचे गांभीर्य ओळखण्यात गफलत - यातच ममता बॅनर्जी अपयशी ठरल्या. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य जोखता आले नाही. 9 ऑगस्टला बलात्कार आणि खुनाचा क्रुर गुन्हा उघडकीस आल्यापासून, बंगाल सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत. ज्यामुळे प्रशासन हा प्रकार दडपण्याच्या तयारीत होतं, या विचाराला चालना मिळाली. निष्काळजीपणा, पारदर्शकतेचा अभाव, जनक्षोभाची असंवेदनशील हाताळणी, गुन्हेगारी स्थळाला लागूनच अचानक नूतनीकरणाचं काम, आई-वडील आपल्या मुलीच्या मृतदेहाची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहत राहिले, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी झालेली गर्दी, आतील तोडफोड रोखण्यात पोलिसांचं आंदोलकांना आवरण्यातलं अपयश दिसून येत होतं. आरजी कार मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदिप घोष यांनी एकीकडे राजीनाम दिला, त्यानंतर लगेचच, त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट असूनही काही तासांतच कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (CNMCH) चे प्राचार्य म्हणून पुन्हा नियुक्त केलं गेलं. निषेधाच्या ताज्या घडामोडीत CNMCH च्या विद्यार्थ्यांनी त्यांना महाविद्यालयात प्रवेश नाकारला. त्यांची नवीन नियुक्ती रद्द करण्यास सरकारला भाग पाडले. आर्थिक अनियमिततेच्या तक्रारी करूनही त्यांना आतापर्यंत ममतांच्या राज्यात कोणी हात लावू शकले नव्हते. गेल्या वर्षी जूनमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर घोष यांची आरजी कार हॉस्पिटलमधून मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये बदली करण्यात आली होती. पण, ते पंधरा दिवसाताच परतले. एका महिन्यानंतर आरजी कार मेडिकल कॉलेजच्या उपअधीक्षकांनी राज्य दक्षता आयोगाला पत्र लिहून घोष यांच्यावर बायोमेडिकल वेस्टची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आणि कोविड निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला. चौकशी सुरू करण्यात आली, परंतु रहस्यमयपणे हे प्रकरण दाबण्यात आलं.

सिंडिकेट राज - ममता-सरकारमधील हेच ‘सिंडिकेट राज’ आता संपत चाललं आहे. सततच्या निदर्शनांद्वारे, कदाचित 2011 नंतर पहिल्यांदाच बंगाली मध्यमवर्ग ममता बॅनर्जींच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की, त्यांना बलात्कार आणि हत्येमागे असलेल्यांना फाशीची शिक्षा हवी आहे. त्यांचा पुतण्या आणि तृणमूलचा नंबर 2 नेता, अभिषेक बॅनर्जी एक पाऊल पुढे गेला आहे. 2019 च्या पोलीस चकमक आणि एका महिलेवर बलात्कार आणि हत्येचा आरोप असलेल्या चार व्यक्तींच्या हत्येवर आधारित हैदराबाद मॉडेलचं समर्थन त्यानं केलंय. यासंदर्भातील सोशल मीडियाची साक्ष काढून अभिषेकने आरजी कार मेडिकल कॉलेजच्या गुन्हेगारासाठी समान सूत्र वापरण्याची अर्थात एन्काउंटरची वकिली केली आहे. एखाद्या गोष्टीचा लवकर निकाल लावण्याची भाषा समजू शकते, मात्र जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री किंवा जबाबदार राजकीय नेता अशा गोष्टी बोलतो, तेव्हा ते संविधान आणि न्यायव्यवस्थेबद्दलच्या त्यांच्या आकलनाविषयी चिंता वाढते. प्रत्यक्षात, ममता आणि त्यांचा पुतण्या या दोघींनाही त्यांच्याविरुद्धचा जनक्षोभ दूर करण्यासाठी त्यांचा इतका हताश प्रयत्न होता की त्यांना त्याचा काहीच फायदा झाला नाही.

चुकीच्या दृष्टिकोनाबद्दल टीका- ममता बॅनर्जी आरजी कार बलात्कार आणि खून प्रकरणात जे काही करत आहेत तो मुळात जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे. हे तेव्हाच स्पष्ट झालं जेव्हा हजारो, बहुसंख्य महिलांनी, 'रट्टीर साथी - हेल्पर्स ऑफ द नाईट' या कार्यक्रमाद्वारे राज्य सरकारचा या प्रकरणी गुडघे टेकण्याच्या प्रतिक्रियेचा निषेध केला. जेव्हा पश्चिम बंगालमध्ये कार्यरत संस्थांना रात्रपाळी महिलांना नको असं प्रशासकीय आदेशात म्हटलं होतं. किंवा महिलांसाठी नाईट ड्युटी टाळली जाऊ शकते, तेव्हा लोकांनी सरकारची असंवेदनशीलता आणि चुकीच्या दृष्टिकोनाबद्दल टीका केली.

सातत्याने संघर्ष - अशा वेळी एक प्रश्न पडतो. 'सिंडिकेट राज' आणि खोलवर रुजलेल्या घराणेशाहीने ममता बॅनर्जींच्या सरकारला इतके ग्रासले आहे की, लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लावण्यासाठी फक्त बलात्कार आणि खुनाचीच गरज होती, तर तृणमूल काँग्रेस निवडणुकीनंतर निवडणुका का जिंकत राहते? असा प्रश्न पडतो. बंगालमध्ये 2011 पासून ममता बॅनर्जी यांनी 34 वर्षांच्या डाव्या आघाडीला सत्तेतून बाहेर काढलं तेव्हापासून डावे आणि काँग्रेस या दोघांमध्ये सातत्याने संघर्ष होत आहे. भाजपाचंही त्यांच्याशी जुळत नाही.

लोकाभिमुख उपाय - या वरवर गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, कोणत्याही विश्वासार्ह पर्यायाचा अभाव. हा एकमेव घटक ममतांना पुन्हा सत्तेवर आणतो आणि संसदेत आमदारांची संख्या अधिक सुनिश्चित करतो. त्यांनी दोन गोष्टी यशस्वीपणे मिसळून बंगालसमोर मांडल्या आहेत - एक, त्या भाजपा आणि 'सोनार बांग्ला' यांच्यात उभी असलेली एकमेव व्यक्ती आहे आणि दुसरी, लक्ष्मी भंडारच्या रूपाने त्यांचे लोकाभिमुख उपाय, महिलांसाठी रोखठोक आणि तत्सम योजना.

रक्त पाहून धैर्य वाढते - खरं तर ममतां बॅनर्जी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या शेजारच्या भागात काय घडलं ते काळजीपूर्वक पाहावं. बांगलादेशाने उदारमतवादी शेख हसीनांचा हिंसक पराभव पाहिला आहे, ज्यांनी त्या देशाला राजकीय आणि सापेक्ष आर्थिक स्थैर्य देऊ केलं. त्यातूनही काही धडा घेतला पाहिजे. बांगलादेशातील आधुनिक काळातील प्रसिद्ध कवी इम्तियाज महमूद जेव्हा 'फुल देखे भोय बरचे, रोकतो देखे सहोश' (फुलांच्या दर्शनाने भीती वाढते, रक्त पाहून धैर्य वाढते) लिहितो तेव्हा ते त्या देशातील रस्त्यांवर तरुणांना प्रेरणा देते. ममता बॅनर्जी दशकांनंतर पहिल्यांदाच बंगाली मूड आणि रस्त्यावरचा उद्वेग समजून घेण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यांनी 2006 मध्ये तृणमूलच्या 30-विषम जागांच्या विरुद्ध 275 सदस्यांच्या विधानसभेत 235 जागांसह अजिंक्य डाव्या आघाडीला पाहिलं आहे. त्यांना चांगलंच माहीत असलं पाहिजे की संख्या आणि आवाज यापुढे कशाचंच चालत नाही.

अमेरिकन समाजशास्त्रज्ञ एडगर झेड फ्रेडनबर्ग यांनी म्हटल्याप्रमाणं, किशोर आणि प्रौढांविषयीचे विचार पाहता, यावेळी ममता बॅनर्जी यांनी तरुणांना कमी लेखण्याआधी दोनदा विचार केला पाहिजे होता. कारण हे आंदोलन ममता बॅनर्जी यांच्या अस्तित्वालाच धक्का देऊ शकतं.

कोलकाता Mamata Armageddon moment : कोलकाता येथील आकर्षक युवा भारती क्रीडांगण (सॉल्ट लेक स्टेडियम) अनेक घडामोडींचं एक जुनं साक्षीदार आहे. या भव्य स्टेडियममध्ये एक लाखाहून अधिक प्रेक्षक बसू शकतात आणि शहरातील सर्वात मोठ्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं जातं.

जनतेचा सवाल - नुकतंच 18 ऑगस्ट रोजी हे स्टेडियम ऐतिहासिक ड्युरंड चषक स्पर्धेसाठी सज्ज होतं. कट्टर प्रतिस्पर्धी मोहन बागान आणि पूर्व बंगाल भिडणार होते. संघ तयार होते, खेळाडू तयार होते, आयोजक तयार होते, पण प्रशासन मात्र तयार नव्हतं. कारणच तसं होतं. 14 ऑगस्टच्या रात्रीचं आंदोलन. हिंसक जमावाने पोलिसांना झुगारून आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये घुसखोरी केली. या ठिकाणी 31 वर्षीय महिला वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. आंदोलक एवढे चिडले होते की, प्रशासनाने सामना आयोजकांना सांगितलं की सामन्यासाठी सुरक्षा पुरवली जाऊ शकत नाही. परिणामी सामना रद्द करण्यात आला.

पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा केला
पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा केला (AP)

सरकारचा अंदाज चुकला - बंगाल प्रशासनाला वाटलं की त्यांनी पहिली लढाई जिंकली. पण, लक्षात आलं की प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. रविवारी दोन क्लबच्या हजारो समर्थकांनी स्टेडियमबाहेर निदर्शनं केली. “जर सरकार आमचा निषेध रोखण्यासाठी एवढा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करू शकते, तर स्टेडियमच्या आत सुरक्षा पुरवू शकत नसल्याच्या बहाण्याने त्यांना सामना रद्द करण्यास कशामुळे प्रवृत्त केलं? ते कोणाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत? असे सवाल विचारले जाऊ लागले. त्यातच आणखी एका फुटबॉल संघाने म्हणजेच मोहम्मडन स्पोर्टिंग क्लबच्या समर्थकांनी आरजी कार मधील डॉक्टरांना न्याय देण्याची मागणी केली.

27 ऑगस्ट 2024 रोजी कोलकाता येथे पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या
27 ऑगस्ट 2024 रोजी कोलकाता येथे पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या (AP)

महिलांचा आंदोलनात मोठा सहभाग - वास्तविक 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्री, जेव्हा बंगालमधील हजारो लोक बलात्कार आणि खून झालेल्या डॉक्टरला 'न्याय' मागण्यासाठी रस्त्यावर उतरले होते तेव्हा त्यांचा आवाज मोठा होता. कोलकातामध्ये प्रचंड मेळावे काही नवीन नाहीत. किंबहुना, कोलकात्याचं ते स्वभाववैशिष्ट्य आहे. पण, जेव्हा मोठ्या प्रमाणावर जमवाजमव होते, त्यातही प्रामुख्याने महिलांनी ‘रिक्लेम द नाईट’ मोहिमेला प्रतिसाद दिला, तेव्हा रस्त्यावरचा संताप दिसून आला. ही आग तेव्हापासून थांबलेली नाही. स्टेडियमबाहेरच्या निदर्शनांद्वारे, महाविद्यालय आणि विद्यापीठ कॅम्पस, न्यायालये, आयटी हब, वैद्यकीय संस्था किंवा परफॉर्मिंग आर्ट्स स्पेस आणि आता शाळांमधून हा प्रश्न अधिक तीव्रतेनं उपस्थित होत आहे.

डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येचा निषेध करणाऱ्या एकाला पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केली
डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येचा निषेध करणाऱ्या एकाला पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केली (AP)

परिस्थितीचे गांभीर्य ओळखण्यात गफलत - यातच ममता बॅनर्जी अपयशी ठरल्या. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य जोखता आले नाही. 9 ऑगस्टला बलात्कार आणि खुनाचा क्रुर गुन्हा उघडकीस आल्यापासून, बंगाल सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत. ज्यामुळे प्रशासन हा प्रकार दडपण्याच्या तयारीत होतं, या विचाराला चालना मिळाली. निष्काळजीपणा, पारदर्शकतेचा अभाव, जनक्षोभाची असंवेदनशील हाताळणी, गुन्हेगारी स्थळाला लागूनच अचानक नूतनीकरणाचं काम, आई-वडील आपल्या मुलीच्या मृतदेहाची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहत राहिले, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी झालेली गर्दी, आतील तोडफोड रोखण्यात पोलिसांचं आंदोलकांना आवरण्यातलं अपयश दिसून येत होतं. आरजी कार मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदिप घोष यांनी एकीकडे राजीनाम दिला, त्यानंतर लगेचच, त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट असूनही काही तासांतच कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (CNMCH) चे प्राचार्य म्हणून पुन्हा नियुक्त केलं गेलं. निषेधाच्या ताज्या घडामोडीत CNMCH च्या विद्यार्थ्यांनी त्यांना महाविद्यालयात प्रवेश नाकारला. त्यांची नवीन नियुक्ती रद्द करण्यास सरकारला भाग पाडले. आर्थिक अनियमिततेच्या तक्रारी करूनही त्यांना आतापर्यंत ममतांच्या राज्यात कोणी हात लावू शकले नव्हते. गेल्या वर्षी जूनमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर घोष यांची आरजी कार हॉस्पिटलमधून मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये बदली करण्यात आली होती. पण, ते पंधरा दिवसाताच परतले. एका महिन्यानंतर आरजी कार मेडिकल कॉलेजच्या उपअधीक्षकांनी राज्य दक्षता आयोगाला पत्र लिहून घोष यांच्यावर बायोमेडिकल वेस्टची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आणि कोविड निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला. चौकशी सुरू करण्यात आली, परंतु रहस्यमयपणे हे प्रकरण दाबण्यात आलं.

सिंडिकेट राज - ममता-सरकारमधील हेच ‘सिंडिकेट राज’ आता संपत चाललं आहे. सततच्या निदर्शनांद्वारे, कदाचित 2011 नंतर पहिल्यांदाच बंगाली मध्यमवर्ग ममता बॅनर्जींच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की, त्यांना बलात्कार आणि हत्येमागे असलेल्यांना फाशीची शिक्षा हवी आहे. त्यांचा पुतण्या आणि तृणमूलचा नंबर 2 नेता, अभिषेक बॅनर्जी एक पाऊल पुढे गेला आहे. 2019 च्या पोलीस चकमक आणि एका महिलेवर बलात्कार आणि हत्येचा आरोप असलेल्या चार व्यक्तींच्या हत्येवर आधारित हैदराबाद मॉडेलचं समर्थन त्यानं केलंय. यासंदर्भातील सोशल मीडियाची साक्ष काढून अभिषेकने आरजी कार मेडिकल कॉलेजच्या गुन्हेगारासाठी समान सूत्र वापरण्याची अर्थात एन्काउंटरची वकिली केली आहे. एखाद्या गोष्टीचा लवकर निकाल लावण्याची भाषा समजू शकते, मात्र जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री किंवा जबाबदार राजकीय नेता अशा गोष्टी बोलतो, तेव्हा ते संविधान आणि न्यायव्यवस्थेबद्दलच्या त्यांच्या आकलनाविषयी चिंता वाढते. प्रत्यक्षात, ममता आणि त्यांचा पुतण्या या दोघींनाही त्यांच्याविरुद्धचा जनक्षोभ दूर करण्यासाठी त्यांचा इतका हताश प्रयत्न होता की त्यांना त्याचा काहीच फायदा झाला नाही.

चुकीच्या दृष्टिकोनाबद्दल टीका- ममता बॅनर्जी आरजी कार बलात्कार आणि खून प्रकरणात जे काही करत आहेत तो मुळात जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे. हे तेव्हाच स्पष्ट झालं जेव्हा हजारो, बहुसंख्य महिलांनी, 'रट्टीर साथी - हेल्पर्स ऑफ द नाईट' या कार्यक्रमाद्वारे राज्य सरकारचा या प्रकरणी गुडघे टेकण्याच्या प्रतिक्रियेचा निषेध केला. जेव्हा पश्चिम बंगालमध्ये कार्यरत संस्थांना रात्रपाळी महिलांना नको असं प्रशासकीय आदेशात म्हटलं होतं. किंवा महिलांसाठी नाईट ड्युटी टाळली जाऊ शकते, तेव्हा लोकांनी सरकारची असंवेदनशीलता आणि चुकीच्या दृष्टिकोनाबद्दल टीका केली.

सातत्याने संघर्ष - अशा वेळी एक प्रश्न पडतो. 'सिंडिकेट राज' आणि खोलवर रुजलेल्या घराणेशाहीने ममता बॅनर्जींच्या सरकारला इतके ग्रासले आहे की, लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लावण्यासाठी फक्त बलात्कार आणि खुनाचीच गरज होती, तर तृणमूल काँग्रेस निवडणुकीनंतर निवडणुका का जिंकत राहते? असा प्रश्न पडतो. बंगालमध्ये 2011 पासून ममता बॅनर्जी यांनी 34 वर्षांच्या डाव्या आघाडीला सत्तेतून बाहेर काढलं तेव्हापासून डावे आणि काँग्रेस या दोघांमध्ये सातत्याने संघर्ष होत आहे. भाजपाचंही त्यांच्याशी जुळत नाही.

लोकाभिमुख उपाय - या वरवर गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, कोणत्याही विश्वासार्ह पर्यायाचा अभाव. हा एकमेव घटक ममतांना पुन्हा सत्तेवर आणतो आणि संसदेत आमदारांची संख्या अधिक सुनिश्चित करतो. त्यांनी दोन गोष्टी यशस्वीपणे मिसळून बंगालसमोर मांडल्या आहेत - एक, त्या भाजपा आणि 'सोनार बांग्ला' यांच्यात उभी असलेली एकमेव व्यक्ती आहे आणि दुसरी, लक्ष्मी भंडारच्या रूपाने त्यांचे लोकाभिमुख उपाय, महिलांसाठी रोखठोक आणि तत्सम योजना.

रक्त पाहून धैर्य वाढते - खरं तर ममतां बॅनर्जी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या शेजारच्या भागात काय घडलं ते काळजीपूर्वक पाहावं. बांगलादेशाने उदारमतवादी शेख हसीनांचा हिंसक पराभव पाहिला आहे, ज्यांनी त्या देशाला राजकीय आणि सापेक्ष आर्थिक स्थैर्य देऊ केलं. त्यातूनही काही धडा घेतला पाहिजे. बांगलादेशातील आधुनिक काळातील प्रसिद्ध कवी इम्तियाज महमूद जेव्हा 'फुल देखे भोय बरचे, रोकतो देखे सहोश' (फुलांच्या दर्शनाने भीती वाढते, रक्त पाहून धैर्य वाढते) लिहितो तेव्हा ते त्या देशातील रस्त्यांवर तरुणांना प्रेरणा देते. ममता बॅनर्जी दशकांनंतर पहिल्यांदाच बंगाली मूड आणि रस्त्यावरचा उद्वेग समजून घेण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यांनी 2006 मध्ये तृणमूलच्या 30-विषम जागांच्या विरुद्ध 275 सदस्यांच्या विधानसभेत 235 जागांसह अजिंक्य डाव्या आघाडीला पाहिलं आहे. त्यांना चांगलंच माहीत असलं पाहिजे की संख्या आणि आवाज यापुढे कशाचंच चालत नाही.

अमेरिकन समाजशास्त्रज्ञ एडगर झेड फ्रेडनबर्ग यांनी म्हटल्याप्रमाणं, किशोर आणि प्रौढांविषयीचे विचार पाहता, यावेळी ममता बॅनर्जी यांनी तरुणांना कमी लेखण्याआधी दोनदा विचार केला पाहिजे होता. कारण हे आंदोलन ममता बॅनर्जी यांच्या अस्तित्वालाच धक्का देऊ शकतं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.