ETV Bharat / state

धरणांच्या जलसाठ्यात इंचभरही वाढ नाही, यवतमाळवर दुष्काळाचे सावट

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून, निळोणा आणि चापडोह या 2 प्रकल्पांमधून शहरातील साडेतीन लाख ग्राहकांना पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र, पावसाने हजेरी न लावल्याने हे प्रकल्प अद्यापही भरलेले नाही.

author img

By

Published : Jul 30, 2019, 10:58 AM IST

people in Yavatmal fears for drought as both nilona and chapdoh dams are still empty

यवतमाळ - शहराला पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण अजूनही पूर्ण भरले नसल्याने, यवतमाळकरांची चिंता वाढली आहे. मागील वर्षी यावेळी निळोणा धरण ओव्हरफ्लो झाले होते. मात्र, यावर्षी धरणात कमी पाऊस पडल्याने जलसाठा कमी आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास, यवतमाळकरांना येत्या उन्हाळ्यात कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागेल, अशी भीती आहे.

धरणांच्या जलसाठ्यात इंचभरही वाढ नाही, यवतमाळवर दुष्काळाचे सावट

गतवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली होती. तर, जूनच्या शेवटच्या आठवड्यात शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा आणि चापडोह हे दोन्ही प्रकल्प पूर्णपणे भरून झाले होते. मात्र, यावर्षी जुलै महिना संपत आला तरी पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने, धरणाच्या पातळीत इंचभरही वाढ झालेली नाही.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून, निळोणा आणि चापडोह या प्रकल्पांमधून शहरातील साडेतीन लाख नागरिकांना पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र पावसाने हजेरी न लावल्याने हे प्रकल्प अद्यापही भरलेले नाही.
यावर्षी पावसाने चांगलीच उसंत घेतली असून, केवळ 24.20 टक्के पाऊस पडला आहे. दोन्ही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी किमान 49 टक्के पावसाची आवश्यकता असते.

यवतमाळ - शहराला पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण अजूनही पूर्ण भरले नसल्याने, यवतमाळकरांची चिंता वाढली आहे. मागील वर्षी यावेळी निळोणा धरण ओव्हरफ्लो झाले होते. मात्र, यावर्षी धरणात कमी पाऊस पडल्याने जलसाठा कमी आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास, यवतमाळकरांना येत्या उन्हाळ्यात कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागेल, अशी भीती आहे.

धरणांच्या जलसाठ्यात इंचभरही वाढ नाही, यवतमाळवर दुष्काळाचे सावट

गतवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली होती. तर, जूनच्या शेवटच्या आठवड्यात शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा आणि चापडोह हे दोन्ही प्रकल्प पूर्णपणे भरून झाले होते. मात्र, यावर्षी जुलै महिना संपत आला तरी पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने, धरणाच्या पातळीत इंचभरही वाढ झालेली नाही.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून, निळोणा आणि चापडोह या प्रकल्पांमधून शहरातील साडेतीन लाख नागरिकांना पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र पावसाने हजेरी न लावल्याने हे प्रकल्प अद्यापही भरलेले नाही.
यावर्षी पावसाने चांगलीच उसंत घेतली असून, केवळ 24.20 टक्के पाऊस पडला आहे. दोन्ही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी किमान 49 टक्के पावसाची आवश्यकता असते.

Intro:Body:प्रकल्पाच्या जलसाठ्यात इंचभरही वाढ नाही यवतमाळकरांना लागली दुष्काळाची चिंता

यवतमाळ- शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा धरण अजूनही परिपूर्ण भरले नसल्याने यवतमाळ करांची चिंता वाढली आहे. मागील वर्षी यावेळी निळोणा धरण ओव्हरफ्लो झाले होते. मात्र यावेळेस धरणात पाऊस कमी पडल्याने जलसाठा कमी आहे. यावेळी जर धरणात साठा कमी झाला तर येत्या उन्हाला मध्ये यवतमाळकरणा पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार असून कोरड्या दुष्काळाला समोर जावे लागण्याची चिंता आतापासून वाटू लागली आहे.
जिल्ह्यात गतवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून असाच पावसाला सुरुवात झाली होती तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि चाकडो हे दोन्ही प्रकल्प पूर्णपणे भरून झाले होते मात्र यावर्षी जुलै महिना संपत आला तरी पावसाने जोरदार हजेरी न लावल्याने आजही धरणाच्या पातळीत इंचभरही वाढ झालेली नाही त्यामुळे दोन वर्षापूर्वी यवतमाळकराणा पिण्याच्या पाण्यासाठी रात्रभर भटकंती करावी लागत होती. अशीच यावर्षी परिस्थिती निर्माण होण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून शहरातील साडेतीन लाख ग्राहकांना पाण्याचा पुरवठा निळोणा आणि चापडोह या 2 प्रकल्पातून करण्यात येतो. यातही संपूर्ण शहराची भिस्त ही निळोणा धरणवर्ती अवलंबून असते. मात्र पावसाने हजेरी न लावल्याने हे प्रकल्प अद्यापही भरलेले नाही.
यावर्षी पावसाने चांगलीच उसंत घेतल्याने केवळ 24.20 टक्के पाऊस पडला. वास्तवामध्ये 49 टक्के पाऊस पडायला पाहिजे होता.


बाईट -प्रा बबलू देशमुख नागरिक
बाईट राजेश गोंडाने नागरिक Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.