ETV Bharat / state

जाळपोळ करत गावकऱ्यांनी रोखला नागपूर-तुळजापूर महामार्ग; ८ ते १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

author img

By

Published : Jul 16, 2021, 3:30 AM IST

नागपूर-तुळजापूर या महामार्गाचे काम सुरू असून यामुळे या महामार्गावरिल पाणी घरात शिरत असल्याने संतप्त झालेल्या भांबराजा येथील नागरिकांनी जाळपोळ करून रास्ता रोको आंदोलन करत महामार्ग रोखून धरला.

http://10.10.50.85//maharashtra/15-July-2021/mh-ytl-03-bhambraja-rastarokho-vis-byte-10049_15072021205921_1507f_1626362961_647.jpg
जाळपोळ करीत गावकऱ्यांनी रोखला नागपूर-तुळजापूर महामार्ग; ८ ते १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

यवतमाळ - नागपूर-तुळजापूर या महामार्गाचे काम सुरू असून यामुळे या महामार्गावरिल पाणी घरात शिरत असल्याने संतप्त झालेल्या भांबराजा येथील नागरिकांनी जाळपोळ करून रास्ता रोको आंदोलन करत महामार्ग रोखून धरला. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा आठ ते दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

नागपूर-तुळजापूर मार्गावर भांबराजा हे गाव आहे. या महामार्गाच्या कामामुळे पावसाळ्यातील पाणी जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. हे पाणी गावालगत असलेल्या नाल्यात जाऊन ते पाणी गावात शिरत आहे. संततधार पावसामुळे गावाशेजारील असलेल्या नाल्यात महामार्गचे पाणी जाऊन गावातील जवळपास चाळीस घरात शिरले.

स्थानिकांनी बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. मात्र, यावर कोणताही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त झालेले नागरिक रस्त्यावर उतरले. महामार्गावर जाळपोळ करून शेकडो नागरिकांनी ठिय्या मांडला. आंदोलनामुळे या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

जाळपोळ करीत गावकऱ्यांनी रोखला नागपूर-तुळजापूर महामार्ग

घटनेची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी बंदोबस्त लावला. मात्र, जोपर्यंत या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठीचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत रस्त्यावर जाळपोळ करून महामार्ग रोखून धरण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला.

हेही वाचा - कार्गो सेवेमुळे जिनोमिक सिक्वेन्सिंगचे यंत्र अडकले परदेशात, मुंबईत केल्या जाणाऱ्या चाचण्यांना होणार उशीर

हेही वाचा - आषाढी एकादशी सोहळा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 19 जुलै रोजी पंढरीत मुक्कामी

यवतमाळ - नागपूर-तुळजापूर या महामार्गाचे काम सुरू असून यामुळे या महामार्गावरिल पाणी घरात शिरत असल्याने संतप्त झालेल्या भांबराजा येथील नागरिकांनी जाळपोळ करून रास्ता रोको आंदोलन करत महामार्ग रोखून धरला. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा आठ ते दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

नागपूर-तुळजापूर मार्गावर भांबराजा हे गाव आहे. या महामार्गाच्या कामामुळे पावसाळ्यातील पाणी जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. हे पाणी गावालगत असलेल्या नाल्यात जाऊन ते पाणी गावात शिरत आहे. संततधार पावसामुळे गावाशेजारील असलेल्या नाल्यात महामार्गचे पाणी जाऊन गावातील जवळपास चाळीस घरात शिरले.

स्थानिकांनी बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. मात्र, यावर कोणताही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त झालेले नागरिक रस्त्यावर उतरले. महामार्गावर जाळपोळ करून शेकडो नागरिकांनी ठिय्या मांडला. आंदोलनामुळे या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

जाळपोळ करीत गावकऱ्यांनी रोखला नागपूर-तुळजापूर महामार्ग

घटनेची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी बंदोबस्त लावला. मात्र, जोपर्यंत या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठीचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत रस्त्यावर जाळपोळ करून महामार्ग रोखून धरण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला.

हेही वाचा - कार्गो सेवेमुळे जिनोमिक सिक्वेन्सिंगचे यंत्र अडकले परदेशात, मुंबईत केल्या जाणाऱ्या चाचण्यांना होणार उशीर

हेही वाचा - आषाढी एकादशी सोहळा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 19 जुलै रोजी पंढरीत मुक्कामी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.