ETV Bharat / state

'माय बाप सरकार माझा परिवार विकत घ्या पण, माझी शेती जगवा'

author img

By

Published : Dec 21, 2019, 2:49 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई हेक्टरी 25 हजार रुपये देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अजून मिळाली नाही. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील कोळगाव येथील विजय शेंडगे या शेतकरी पुत्राने आपल्या शेतात फलक लावून चक्क आपले कुटुंब विक्रीला काढले आहे.

washim news
'माय बाप सरकार माझा परिवार विकत घ्या पण, माझी शेती जगवा'

वाशिम - मागील तीन वर्षांपासून सततची नापिकीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. मागील सरकारने कर्जमाफी करणार असल्याचे सांगितले, पण ती झाली नाही. आता नव्याने महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई हेक्टरी 25 हजार रुपये देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अजून मिळाली नाही. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील कोळगाव येथील विजय शेंडगे या शेतकरी पुत्राने आपल्या शेतात फलक लावून चक्क आपले कुटुंब विक्रीला काढले आहे. 'माझा परिवार विकत घ्या मात्र, माझी शेती वाचावा' अशी आर्त याचना फलक लावून सरकारला केली आहे.

'माय बाप सरकार माझा परिवार विकत घ्या पण, माझी शेती जगवा'

हेही वाचा - #FASTAG : फास्टॅग वापराबाबत वाहनधारकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

शेतकरी पुत्र विजय शेंडगे हे मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या आजोबांच्या नावावर् सात एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीवर चार लाख 50 हजार रुपये कर्ज आहे. मागील तीन वर्षांपासून दुष्काळ आहे. या परिस्थितीत पीक विमा भरूनही अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे हाताश होऊन शेती जगवण्यासाठी परिवार विक्रीला काढला असल्याचे विजय शेंडगे यांनी सांगितले.

अधिवेशनात हे सरकार शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावतील असे वाटत असताना, या सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून जगावं कसे या चिंतेत आम्ही परिवार विक्रीला काढला असल्याचे विजय यांनी सांगितले.

हेही वाचा - नाशिक : दिंडोरी येथे डॉक्टराची विषारी औषध घेऊन आत्महत्या

सततच्या नापिकीने आलेला कर्जबाजारीपणा, त्यामुळे जीवन जगणे कठिण झाल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यातच राज्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सर्वच पीक वाहून गेल्याने प्रपंचाचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे सरकारने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

वाशिम - मागील तीन वर्षांपासून सततची नापिकीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. मागील सरकारने कर्जमाफी करणार असल्याचे सांगितले, पण ती झाली नाही. आता नव्याने महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई हेक्टरी 25 हजार रुपये देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अजून मिळाली नाही. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील कोळगाव येथील विजय शेंडगे या शेतकरी पुत्राने आपल्या शेतात फलक लावून चक्क आपले कुटुंब विक्रीला काढले आहे. 'माझा परिवार विकत घ्या मात्र, माझी शेती वाचावा' अशी आर्त याचना फलक लावून सरकारला केली आहे.

'माय बाप सरकार माझा परिवार विकत घ्या पण, माझी शेती जगवा'

हेही वाचा - #FASTAG : फास्टॅग वापराबाबत वाहनधारकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

शेतकरी पुत्र विजय शेंडगे हे मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या आजोबांच्या नावावर् सात एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीवर चार लाख 50 हजार रुपये कर्ज आहे. मागील तीन वर्षांपासून दुष्काळ आहे. या परिस्थितीत पीक विमा भरूनही अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे हाताश होऊन शेती जगवण्यासाठी परिवार विक्रीला काढला असल्याचे विजय शेंडगे यांनी सांगितले.

अधिवेशनात हे सरकार शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावतील असे वाटत असताना, या सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून जगावं कसे या चिंतेत आम्ही परिवार विक्रीला काढला असल्याचे विजय यांनी सांगितले.

हेही वाचा - नाशिक : दिंडोरी येथे डॉक्टराची विषारी औषध घेऊन आत्महत्या

सततच्या नापिकीने आलेला कर्जबाजारीपणा, त्यामुळे जीवन जगणे कठिण झाल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यातच राज्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सर्वच पीक वाहून गेल्याने प्रपंचाचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे सरकारने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Intro:माय बाप सरकार माझा परिवार विकत घ्या.... पण माझी शेती जगवा...

अँकर: मागील तीन वर्षांपासून सततची नापिकी त्यामुळं शेतकरी हैराण झाला आहे.मागील सरकारने कर्जमाफी करणार सांगितलं पण झाली नाही. आता नव्यानं महाविकास आघाडीचे सरकार आलं आहे.उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाई हेक्टरी 25 हजार देणार म्हणून सांगितलं होतं मात्र अजून मिळाली नाही. त्यामुळं वाशीम जिल्ह्यातील कोळगाव येथील विजय शेडगे या शेतकरी पुत्राने आपल्या शेतात फलक लावून चक्क आपले कुटुंब विक्रीला काढले आहे.माझा परिवार विकत घ्या मात्र माझी शेती वाचावा अशी आर्त याचना फलक लावून सरकारला केली आहे....

व्हिओ : मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील हे आहेत शेतकरी पुत्र विजय शेंडगे यांच्या आजोबांच्या नावावर् 7 एकर कोरडवाहू शेती आहे.या शेतीवर चार लाख पन्नास हजार रुपये कर्ज आहे.मागील तीन वर्षांपासून दुष्काळ आहे. या परिस्थितीत पीक विमा भरूनही अद्याप मदत मिळाली नसल्याने हातास होऊन शेती जगविण्यासाठी परिवार विक्रीला काढला असल्याचं विजय शेंडगे सांगतोय....

व्हीओ: अधिवेशनात हे सरकार शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावतील असे वाटत असताना, या सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही त्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून जगावं कसे या चिंतेत आम्ही परिवार विक्री ला काढला आहे.

व्हीओ : सततच्या नापिकीने आलेला कर्जबाजारीपणा त्यामुळे जीवन जगणे असाह्य झाल्याने शेतकरी आत्महत्येचा करीत आहेत.त्यातच राज्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सर्वस्व वाहून गेल्याने प्रपंच्याचा गाडा कसा चालवावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.त्यामुळं सरकारने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.....

बाईट : विजय शेंडगे,शेतकरी पुत्र

बाईट : अंकुशराव शेंडगे,काकाBody:माय बाप सरकार माझा परिवार विकत घ्या.... पण माझी शेती जगवा...Conclusion:माय बाप सरकार माझा परिवार विकत घ्या.... पण माझी शेती जगवा...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.