ETV Bharat / state

उजनीने अखेर गाठली शंभरी; पुणे, सोलापूर जिल्ह्याची चिंता मिटली

author img

By

Published : Sep 1, 2020, 5:14 PM IST

यावर्षी झालेल्या पावसामुळे उजनी धरण 102 टक्के भरले असून धरणात येणारी आवक पाहता कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. तीन महिन्यात हे धरण हळूहळू टक्केवारीच्या शंभरीजवळ पोहोचले आहे. आता धरणातून मुख्य कालव्यात 800 क्युसेकने पाणी सोडण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला आहे.

सोलापूर जिल्ह्याची चिंता मिटली
सोलापूर जिल्ह्याची चिंता मिटली

सोलापूर : पंढरपूर पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेले उजनी धरण हे यंदा झालेल्या पावसाने 100 टक्के भरले आहे. सलग तिसऱ्या वर्षी धरण 100 टक्के भरले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उजनी धरणात 117 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 27 ऑगस्ट 2018, यानंतर 7 ऑगस्ट 2019 व आज 31 ऑगस्ट 2020 ला उजनी धरण शंभर टक्के भरले आहे.

सोलापूर जिल्ह्याची चिंता आता मिटली आहे. सोमवारी उजनी 102 टक्के भरला असून धरणात येणारी आवक पाहता कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. तीन महिन्यात हे धरण हळूहळू टक्केवारीच्या शंभरीजवळ पोहोचले आहे. आता धरणातून मुख्य कालव्यात 800 क्युसेकने पाणी सोडण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. याच बरोबर भीमा, सीना बोगदा व सीना माढा उपसा सिंचन योजनेत ही पाणी सोडले जात आहे.

खडकवासला, मुळशी, पवना यासारख्या धरणातून पाणी सोडले जात असल्याने पाणी जलाशयात मिसळत होते. तर, प्रकल्प 102 टक्के भरला आहे. धरणात आता एकूण साठा हा 118 टीएमसी इतका झाला आहे. यात 58.50 टीएमसी पाणी उपयुक्त पातळीत आहे. धरण भरल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. हा प्रकल्प क्षमतेने भरल्याने पुढील वर्षापर्यंतची चिंता आता मिटली आहे. यातच लाभक्षेत्र असणार्‍या जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे.

हेही वाचा - मागण्या मान्य करा अन्यथा परिणामांना सामोरे जा; परिचारिकांचा सरकारला इशारा

सोलापूर : पंढरपूर पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेले उजनी धरण हे यंदा झालेल्या पावसाने 100 टक्के भरले आहे. सलग तिसऱ्या वर्षी धरण 100 टक्के भरले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उजनी धरणात 117 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 27 ऑगस्ट 2018, यानंतर 7 ऑगस्ट 2019 व आज 31 ऑगस्ट 2020 ला उजनी धरण शंभर टक्के भरले आहे.

सोलापूर जिल्ह्याची चिंता आता मिटली आहे. सोमवारी उजनी 102 टक्के भरला असून धरणात येणारी आवक पाहता कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. तीन महिन्यात हे धरण हळूहळू टक्केवारीच्या शंभरीजवळ पोहोचले आहे. आता धरणातून मुख्य कालव्यात 800 क्युसेकने पाणी सोडण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. याच बरोबर भीमा, सीना बोगदा व सीना माढा उपसा सिंचन योजनेत ही पाणी सोडले जात आहे.

खडकवासला, मुळशी, पवना यासारख्या धरणातून पाणी सोडले जात असल्याने पाणी जलाशयात मिसळत होते. तर, प्रकल्प 102 टक्के भरला आहे. धरणात आता एकूण साठा हा 118 टीएमसी इतका झाला आहे. यात 58.50 टीएमसी पाणी उपयुक्त पातळीत आहे. धरण भरल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. हा प्रकल्प क्षमतेने भरल्याने पुढील वर्षापर्यंतची चिंता आता मिटली आहे. यातच लाभक्षेत्र असणार्‍या जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे.

हेही वाचा - मागण्या मान्य करा अन्यथा परिणामांना सामोरे जा; परिचारिकांचा सरकारला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.