ETV Bharat / state

झाडे लावा, झाडे जगवा; पालकमंत्री विजय देशमुख यांचे वृक्षलागवडीचे आव्हान

author img

By

Published : Jul 4, 2019, 5:36 PM IST

राज्य सरकारने यावर्षी ३३ कोटी झाडे लावण्याचा निरधार केला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सिध्देश्वर वनविहार येथे आज पालकमंत्री विजय देशमुख यांनी वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ केला आहे.

पालकमंत्री देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले वृक्षारोपन करताना

सोलापूर - पर्यावरण संरक्षणासाठी राज्य सरकारने यावर्षी ३३ कोटी झाडे लावण्याचा निरधार केला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सिध्देश्वर वनविहार येथे आज पालकमंत्री विजय देशमुख यांनी वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी लोकांना ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश दिला आहे.


सोलापूर शहरातील सिध्देश्वर वनविहार येथे वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला सहकार मंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी. व्ही. घुटे, उपवनसंरक्षक प्रवीणकुमार बडगे, विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने यांची उपस्थिती होती.


यावेळी पालकमंत्री देशमुख म्हणाले कि, झाडे केवळ लावू नका, तर ती नीट वाढवा. त्याची मुलाप्रमाणे काळजी घ्या. कारण आपले जीवन नीट ठेवण्यासाठी झाडांची गरज आहे. राज्य शासनाचे यंदा ३३ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी सर्व यंत्रणानी काम करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन देशमुख यांनी केले.


कार्यक्रमादरम्यान, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले कि, प्रत्येक नागरिकांनी आपल्या आयुष्यात किमान पाच झाडे लावायला हवीत. सोलापूर जिल्ह्यात झाडे लावण्याची गरज आहे. झाडे लावण्याच्या अभियानात विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले पाहिजे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी वृक्षारोपन केले. या कार्यक्रमाप्रसंगी सुयश गुरुकुल शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

सोलापूर - पर्यावरण संरक्षणासाठी राज्य सरकारने यावर्षी ३३ कोटी झाडे लावण्याचा निरधार केला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सिध्देश्वर वनविहार येथे आज पालकमंत्री विजय देशमुख यांनी वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी लोकांना ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश दिला आहे.


सोलापूर शहरातील सिध्देश्वर वनविहार येथे वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला सहकार मंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी. व्ही. घुटे, उपवनसंरक्षक प्रवीणकुमार बडगे, विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने यांची उपस्थिती होती.


यावेळी पालकमंत्री देशमुख म्हणाले कि, झाडे केवळ लावू नका, तर ती नीट वाढवा. त्याची मुलाप्रमाणे काळजी घ्या. कारण आपले जीवन नीट ठेवण्यासाठी झाडांची गरज आहे. राज्य शासनाचे यंदा ३३ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी सर्व यंत्रणानी काम करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन देशमुख यांनी केले.


कार्यक्रमादरम्यान, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले कि, प्रत्येक नागरिकांनी आपल्या आयुष्यात किमान पाच झाडे लावायला हवीत. सोलापूर जिल्ह्यात झाडे लावण्याची गरज आहे. झाडे लावण्याच्या अभियानात विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले पाहिजे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी वृक्षारोपन केले. या कार्यक्रमाप्रसंगी सुयश गुरुकुल शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

Intro:mh_sol_05_plantation_program_7201168
झाडे लावा, झाडे जगवा …
पालकमंत्री विजय देशमुख यांचे आवाहन
वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ
सोलापूर, - ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असे आवाहन पालकमंत्री विजय देशमुख यांनी केले आहे. तेहतीस कोटी झाडे लावण्याच्या अभियानातील सोलापूर जिल्ह्यातील शुभारंभ आज पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. Body:सोलापूर शहरातील सिध्देश्वर वनविहार येथे वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला सहकार मंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.बी.व्ही.घुटे, उपवनसंरक्षक प्रवीणकुमार बडगे, विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री देशमुख म्हणाले, ‘झाडे केवळ लावू नका. तर ती नीट वाढवा, त्याची मुलांप्रमाणे काळजी घ्या. कारण आपले जीवन नीट ठेवण्यासाठी झाडांची गरज आहे. राज्य शासनाचे यंदा तेहतीस कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी सर्व यंत्रणानी काम करावे. जिल्ह्यातील प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभागी व्हावे’.असे आवाहनही देशमुख यांनी केले.
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले की, ‘प्रत्येक नागरिकांनी आपल्या आयुष्यात किमान पाच झाडे लावायला हवीत. सोलापूर जिल्ह्यात झाडं लावण्याची गरज आहे. झाडे लावण्याच्या अभियानात विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले पाहिजे’. यावेळी पालकमंत्री देशमुख आणि सहकारमंत्री देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी वृक्षारोपन केले. यावेळी सुयश गुरुकुल शाळेचे विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, उपसंचालक रवींद्र माने, वन विभागातील संध्याराणी बंडगर, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमिता गव्हाणे यांनी केले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.