ETV Bharat / state

प्रेमसंबंधातून महिलेसह 2 वर्षीय चिमुकल्याची गळा चिरून हत्या, कुजलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह

प्रेमसंबंधातून महिलेसह दोन वर्षाच्या मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना कराडजवळच्या वारुंजी गावात घडली आहे. दोन्ही मृतदेह कुजल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे हत्येचा प्रकार समोर आला.

author img

By

Published : Aug 25, 2021, 10:32 AM IST

महिलेसह 2 वर्षीय चिमुकल्याची गळा चिरून हत्या
महिलेसह 2 वर्षीय चिमुकल्याची गळा चिरून हत्या

कराड (सातारा) - प्रेमसंबंधातून महिलेसह दोन वर्षाच्या मुलाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना कराडजवळच्या वारुंजी गावात घडली आहे. दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे या हत्येचा प्रकार समोर आला. प्रेमसंबंधातून हे हत्याकांड झाले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस आता या हत्या प्रकरणातील संशयित आरोपीचा शोध घेत आहेत.

महिलेसह 2 वर्षीय चिमुकल्याची गळा चिरून हत्या
प्रेमसंबंधातून हत्या झाल्याचा संशय-सुशीला सुनील शिंदे (वय 35) आणि विराज निवास गायकवाड (वय 2 वर्षे), अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. तर अरविंद सुरवसे (रा. सोलापूर), असे संशयित आरोपी प्रियकराचे नाव आहे. घटनेनंतर तो फरार झाला आहे. याप्रकरणी जया मनोहर सोनवले यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मुंढे-विमानतळ (ता. कराड) येथील जिजामातानगर परिसरात त्या आपला मावस भाऊ शैलेश रमेश धनवे आणि मुलगी सुशीला सुनील शिंदे यांच्या समवेत राहत होत्या. त्यांची दुसरी मुलगी प्रियांका निवास गायकवाड ही पुण्यात नोकरी करत असल्यामुळे तिचा मुलगा आज्जी जया सोनवले यांच्याकडे पाच महिन्यांपासून राहत होता.

विराज हा मृत महिलेच्या बहिणीचा मुलगा-

सुशीला हिचा दहा वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता. सुशीला ही वारूंजी फाट्यावरील प्यासा ढाब्यावर कामाला होती. त्याठिकाणी कामाला असणार्‍या अरविंद सुरवसे बरोबर तिचे प्रेमसंबंध होते. मात्र, सुशीला आणि विराज हे दोघेही अचानक बेपत्ता झाल्याने विराजची आज्जी सोनवले यांनी 21 ऑगस्ट रोजी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीत त्यांनी नातू विराज याला सुशीला आणि अरविंद यांनी पळवून नेल्याचा आरोप केला होता.

खून करून संशयित फरार-

मुलाच्या अपहरणाच्या तक्रारीवरून पोलीस तपास करत असताना वारूंजी गावातील लक्ष्मी कॉलनीत राहणार्‍या अरविंद सुरवसे याच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारीच राहणाार्‍या सुनिता कांबळे यांनी सुरवसेच्या खोलीचे कुलूप तोडून पाहिले. त्यावेळी सुशीला आणि विराज यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. संशयित आरोपीने खोलीला बाहेरून कुलूप लावून घटनास्थळावरून फरार झाला होता. या घटनेची माहिती कराड शहर पोलिसांना देण्यात आल्यानंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

जया सोनवले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयिताच्या तपासासाठी पथके रवाना केली आहेत. कराडचे डीवायएसपी डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारूती सराटे हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

कराड (सातारा) - प्रेमसंबंधातून महिलेसह दोन वर्षाच्या मुलाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना कराडजवळच्या वारुंजी गावात घडली आहे. दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे या हत्येचा प्रकार समोर आला. प्रेमसंबंधातून हे हत्याकांड झाले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस आता या हत्या प्रकरणातील संशयित आरोपीचा शोध घेत आहेत.

महिलेसह 2 वर्षीय चिमुकल्याची गळा चिरून हत्या
प्रेमसंबंधातून हत्या झाल्याचा संशय-सुशीला सुनील शिंदे (वय 35) आणि विराज निवास गायकवाड (वय 2 वर्षे), अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. तर अरविंद सुरवसे (रा. सोलापूर), असे संशयित आरोपी प्रियकराचे नाव आहे. घटनेनंतर तो फरार झाला आहे. याप्रकरणी जया मनोहर सोनवले यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मुंढे-विमानतळ (ता. कराड) येथील जिजामातानगर परिसरात त्या आपला मावस भाऊ शैलेश रमेश धनवे आणि मुलगी सुशीला सुनील शिंदे यांच्या समवेत राहत होत्या. त्यांची दुसरी मुलगी प्रियांका निवास गायकवाड ही पुण्यात नोकरी करत असल्यामुळे तिचा मुलगा आज्जी जया सोनवले यांच्याकडे पाच महिन्यांपासून राहत होता.

विराज हा मृत महिलेच्या बहिणीचा मुलगा-

सुशीला हिचा दहा वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता. सुशीला ही वारूंजी फाट्यावरील प्यासा ढाब्यावर कामाला होती. त्याठिकाणी कामाला असणार्‍या अरविंद सुरवसे बरोबर तिचे प्रेमसंबंध होते. मात्र, सुशीला आणि विराज हे दोघेही अचानक बेपत्ता झाल्याने विराजची आज्जी सोनवले यांनी 21 ऑगस्ट रोजी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीत त्यांनी नातू विराज याला सुशीला आणि अरविंद यांनी पळवून नेल्याचा आरोप केला होता.

खून करून संशयित फरार-

मुलाच्या अपहरणाच्या तक्रारीवरून पोलीस तपास करत असताना वारूंजी गावातील लक्ष्मी कॉलनीत राहणार्‍या अरविंद सुरवसे याच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारीच राहणाार्‍या सुनिता कांबळे यांनी सुरवसेच्या खोलीचे कुलूप तोडून पाहिले. त्यावेळी सुशीला आणि विराज यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. संशयित आरोपीने खोलीला बाहेरून कुलूप लावून घटनास्थळावरून फरार झाला होता. या घटनेची माहिती कराड शहर पोलिसांना देण्यात आल्यानंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

जया सोनवले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयिताच्या तपासासाठी पथके रवाना केली आहेत. कराडचे डीवायएसपी डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारूती सराटे हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.