ETV Bharat / state

वाशिष्टी नदीने गाठली धोक्याची पातळी, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

author img

By

Published : Jul 4, 2020, 7:14 PM IST

मागील दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यातील वाशिष्टी व शिव नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. प्रशासनाने या नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

वाशिष्टी नदी
वाशिष्टी नदी

चिपळूण (रत्नागिरी) - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात सतत पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. जिल्हात चिपळूण, गुहागर या दोन तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर दापोली, खेड, मंडणगड या ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे. चिपळूणमध्ये वाशिष्टी नदीची पातळी वाढल्याने बाजार पुलाला पाणी लागले आहे. त्यामुळे नदी पात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अजूनही या भागात पावसाची संततधार चालू आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी

बरसणाऱ्या पावसाचा जोर असल्याने वाशिष्ठी, शिव नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. बाजारपुलाला पाणी टेकायला आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना, व्यापाऱ्यांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाचे पाणी वाशिष्टी पुलावरुन बाजारपेठेत शिरते. त्यामुळे बाजरपेठेत पाणी साचते. तसेच नदी पात्राजवळील घरांमध्ये, शेतात पावासचे पाणी शिरते. अनेक रस्ते पाण्याखाली जातात. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिणाकी पाणी साचले आहे.

हेही वाचा - माजी खासदार निलेश राणे यांची भाजप प्रदेश कार्यकारणीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड

चिपळूण (रत्नागिरी) - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात सतत पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. जिल्हात चिपळूण, गुहागर या दोन तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर दापोली, खेड, मंडणगड या ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे. चिपळूणमध्ये वाशिष्टी नदीची पातळी वाढल्याने बाजार पुलाला पाणी लागले आहे. त्यामुळे नदी पात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अजूनही या भागात पावसाची संततधार चालू आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी

बरसणाऱ्या पावसाचा जोर असल्याने वाशिष्ठी, शिव नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. बाजारपुलाला पाणी टेकायला आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना, व्यापाऱ्यांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाचे पाणी वाशिष्टी पुलावरुन बाजारपेठेत शिरते. त्यामुळे बाजरपेठेत पाणी साचते. तसेच नदी पात्राजवळील घरांमध्ये, शेतात पावासचे पाणी शिरते. अनेक रस्ते पाण्याखाली जातात. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिणाकी पाणी साचले आहे.

हेही वाचा - माजी खासदार निलेश राणे यांची भाजप प्रदेश कार्यकारणीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.