ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक दोन तासानंतर पूर्वपदावर

author img

By

Published : Jul 12, 2019, 12:18 PM IST

खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शुक्रवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला होता. मात्र, आता नदीची पाणी पातळी कमी झाल्यानंतर ही वाहतूक २ तासानंतर सुरू करण्यात आली आहे.

वाहतूक

रत्नागिरी - जिल्ह्यात पावसाचे थैमान माजल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गाला याचा फटका बसला. शुक्रवारी सकाळी पावणे सातच्या वाजण्याच्या सुमारास नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने नदीवरील ब्रिटीशकालीन पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. पाणीपातळी कमी झाल्यानंतर ही वाहतूक २ तासानंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यावेळी खेड येथील मदत ग्रुपचे सहकारी पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत करत होते.

दोन तासानंतर पुर्ववत


मुंबई-गोवा महामार्ग या आठवड्यात तिसऱ्यांदा ठप्प झाला आहे. दक्षिण रत्नागिरीत पावसाचा जोर मंदावला असला तरी उत्तर रत्नागिरीत मात्र पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीने शुक्रवारी सकाळी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे सकाळी ६:४५ पासून नदीवरील पुलावरून वाहतूक बंद होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, आता नदीची पाणीपातळी कमी झाल्याने २ तासांनंतर या मार्गावरील वाहतूक हळुहळू पूर्ववत करण्यात आली. तर खेड येथील मदत ग्रुपचे सहकारी पोलिसांसोबत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते.

रत्नागिरी - जिल्ह्यात पावसाचे थैमान माजल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गाला याचा फटका बसला. शुक्रवारी सकाळी पावणे सातच्या वाजण्याच्या सुमारास नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने नदीवरील ब्रिटीशकालीन पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. पाणीपातळी कमी झाल्यानंतर ही वाहतूक २ तासानंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यावेळी खेड येथील मदत ग्रुपचे सहकारी पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत करत होते.

दोन तासानंतर पुर्ववत


मुंबई-गोवा महामार्ग या आठवड्यात तिसऱ्यांदा ठप्प झाला आहे. दक्षिण रत्नागिरीत पावसाचा जोर मंदावला असला तरी उत्तर रत्नागिरीत मात्र पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीने शुक्रवारी सकाळी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे सकाळी ६:४५ पासून नदीवरील पुलावरून वाहतूक बंद होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, आता नदीची पाणीपातळी कमी झाल्याने २ तासांनंतर या मार्गावरील वाहतूक हळुहळू पूर्ववत करण्यात आली. तर खेड येथील मदत ग्रुपचे सहकारी पोलिसांसोबत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते.

Intro:जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्ग दोन तास ठप्प

दोन तासानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

रत्नागिरी, प्रतिनिधी

मुसळधार पावसाचा फटका पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गाला बसला आहे. कारण शुक्रवारी सकाळी जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मुंबई-गोवा महामार्ग आज पुन्हा एकदा ठप्प झाला होता.. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे जगबुडी नदीवरील ब्रिटीशकालीन पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली. सकाळी पावणे सातच्या सुमारास ही वाहतूक बंद करण्यात आली होती. नदीची पाणीपातळी कमी झाल्यानंतर ही वाहतूक पुन्हा दोन तासानंतर सुरू करण्यात आली.
मुंबई-गोवा महामार्ग या आठवड्यात तिसऱ्यांदा ठप्प झाला आहे. दक्षिण रत्नागिरीत आज पावसाचा जोर मंदावला असला तरी उत्तर रत्नागिरीत मात्र पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीने आज सकाळी धोक्याची पातळी ओलांडली त्यामुळे नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली. सकाळी 6:45 वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्ग बंद होता. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान नदीची पाणीपातळी कमी झाल्याने 2 तासांनी वाहतूक सुरू करण्यात आली.
सकाळी 8:45 वाजल्यापासून जगबुडी पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.
खेड येथील मदत ग्रुपचे सहकारी पोलिसांच्या सोबत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते...Body:जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्ग दोन तास ठप्प

दोन तासानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावरConclusion:जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्ग दोन तास ठप्प

दोन तासानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.