ETV Bharat / state

रत्नागिरीत मुसळधार पाऊस, जगबुडीचा पूल वाहतुकीस बंद

author img

By

Published : Aug 3, 2019, 5:25 PM IST

रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रत्नागिरीत पावसाचा कहर

रत्नागिरी - जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असली तरीही उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर कायम आहे. खेड, दापोली, मंडणगड तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, सुरक्षतेच्या दृष्टीने मुंबई-गोवा महामार्गावरील खेड जगबुडीचा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

रत्नागिरीत पावसाचा कहर

मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खेड दापोली रस्त्यावर पाणी असल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. तर गोळवली करजुवे रस्त्यावरही दरड कोसळली.

गेल्या २४ तासात जिल्ह्यात १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस दापोली, मंडणगड, खेड आणि लांजा तालुक्यांमध्ये पडला आहे. या तालुक्यांमध्ये तब्बल १५० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस मंडणगड तालुक्यात पडला असून येथे तब्बल १७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर दापोली तालुक्यातही १७० मिलिमीटर, लांजा तालुक्यात १६८ मिलिमीटर, तर खेड तालुक्यात १५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल संगमेश्वर तालुक्यात १४४ मिलिमीटर, तर राजापूर तालुक्यात ११८ मिलिमीटर आणि चिपळूणमध्ये ९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरी - जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असली तरीही उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर कायम आहे. खेड, दापोली, मंडणगड तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, सुरक्षतेच्या दृष्टीने मुंबई-गोवा महामार्गावरील खेड जगबुडीचा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

रत्नागिरीत पावसाचा कहर

मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खेड दापोली रस्त्यावर पाणी असल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. तर गोळवली करजुवे रस्त्यावरही दरड कोसळली.

गेल्या २४ तासात जिल्ह्यात १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस दापोली, मंडणगड, खेड आणि लांजा तालुक्यांमध्ये पडला आहे. या तालुक्यांमध्ये तब्बल १५० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस मंडणगड तालुक्यात पडला असून येथे तब्बल १७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर दापोली तालुक्यातही १७० मिलिमीटर, लांजा तालुक्यात १६८ मिलिमीटर, तर खेड तालुक्यात १५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल संगमेश्वर तालुक्यात १४४ मिलिमीटर, तर राजापूर तालुक्यात ११८ मिलिमीटर आणि चिपळूणमध्ये ९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Intro:जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

उत्तर रत्नागिरीत पावसाचा कहर

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. उत्तर रत्नागिरीत तर पावसाने कहर केला आहे.
जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असली तरीही उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर कायम आहे. खेड, दापोली, मंडणगड तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सुरक्षतेच्या दृष्टीने मुंबई गोवा महामार्गावरील खेड जगबुडीचा पुल वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडुन देण्यात आला आहे.
दरम्यान गेल्या 24 तासात 124 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस दापोली, मंडणगड, खेड आणि लांजा तालुक्यांमध्ये पडला आहे. या तालुक्यांमध्ये तब्बल 150 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस मंडणगड तालुक्यात पडला असून मंडणगडमध्ये तब्बल 176 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर दापोली तालुक्यातही 170 मिलिमीटर, लांजा तालुक्यात 168 मिलिमीटर, तर खेड तालुक्यात 155 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल संगमेश्वर तालुक्यात 144 मिलिमीटर, तर राजापूर तालुक्यात 118 मिलिमीटर आणि चिपळूणमध्ये 91 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान खेड दापोली रस्त्यावर पाणी असल्यामुळे वहातूक बंद करण्यात आली होती. तर गोळवली करजुवे रस्त्यावरही दरड कोसळली होती.Body:जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

उत्तर रत्नागिरीत पावसाचा कहरConclusion:जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

उत्तर रत्नागिरीत पावसाचा कहर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.