ETV Bharat / state

गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरण : पालघरचे पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर

author img

By

Published : May 8, 2020, 8:41 AM IST

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे घटनास्थळी भेट दिली. तसेच हत्या प्रकरणाची सखोल माहिती जाणून घेतली. तसेच घटनास्थळाचे प्रत्यक्ष साक्षीदार गावातील सरपंच व जिल्हा परिषद सदस्य यांच्यासोबत चर्चा करून नेमकी घटना कशी घडली? हे जाणून घेतले. त्या घटनेच्या दिवशी व यापूर्वी घडलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती त्यांनी घेतली. याच पार्श्वभूमीवर पालघरच्या पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

पालघर - गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरणात राज्य शासनाने मोठी कारवाई केली असून पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी हा कार्यभार जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या निर्णयाबाबतची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरण : पालघरचे पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे घटनास्थळी भेट दिली. तसेच हत्या प्रकरणाची सखोल माहिती जाणून घेतली. तसेच घटनास्थळाचे प्रत्यक्ष साक्षीदार गावातील सरपंच व जिल्हा परिषद सदस्य यांच्यासोबत चर्चा करून नेमकी घटना कशी घडली? हे जाणून घेतले. त्या घटनेच्या दिवशी व यापूर्वी घडलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती त्यांनी घेतली. याच पार्श्वभूमीवर पालघरच्या पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

काय आहे प्रकरण? -

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे १६ एप्रिलला चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक, अशा तिघांची हत्या केली होती. यामध्ये कासा पोलिसांनी याआधी 115 आरोपींना अटक केली असून यातील 9 जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. तिहेरी हत्याप्रकरण देशभर गाजले असून, विरोधकांनी देखील सरकारला धारेवर धरले. तसेच हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याप्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी व 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यातील अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे.

पालघर - गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरणात राज्य शासनाने मोठी कारवाई केली असून पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी हा कार्यभार जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या निर्णयाबाबतची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरण : पालघरचे पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे घटनास्थळी भेट दिली. तसेच हत्या प्रकरणाची सखोल माहिती जाणून घेतली. तसेच घटनास्थळाचे प्रत्यक्ष साक्षीदार गावातील सरपंच व जिल्हा परिषद सदस्य यांच्यासोबत चर्चा करून नेमकी घटना कशी घडली? हे जाणून घेतले. त्या घटनेच्या दिवशी व यापूर्वी घडलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती त्यांनी घेतली. याच पार्श्वभूमीवर पालघरच्या पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

काय आहे प्रकरण? -

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे १६ एप्रिलला चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक, अशा तिघांची हत्या केली होती. यामध्ये कासा पोलिसांनी याआधी 115 आरोपींना अटक केली असून यातील 9 जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. तिहेरी हत्याप्रकरण देशभर गाजले असून, विरोधकांनी देखील सरकारला धारेवर धरले. तसेच हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याप्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी व 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यातील अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.