ETV Bharat / state

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

author img

By

Published : Feb 17, 2021, 8:38 PM IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी जिल्ह्यात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात आली होती. त्यांची जिल्ह्यातल्या विविध कोविड सेंटरमध्ये नियुक्ती करण्यात आली, त्यांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. मात्र अचानक त्यांना आता सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पालघर - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी जिल्ह्यात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात आली होती. त्यांची जिल्ह्यातल्या विविध कोविड सेंटरमध्ये नियुक्ती करण्यात आली, त्यांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. मात्र अचानक त्यांना आता सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. तसेच त्यांचे वेतनही थकवले असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी आज या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान अचानक कामावरून काढून टाकण्यात आल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी त्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, तसेच थकीत वेतन तातडीने मिळावे यासाठी महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन, योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले होते, मात्र महिनाभरानंतरही काहीच कारवाई न झाल्याने, संतप्त झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

कोरोना रुग्णांच्या सेवेत बजावली महत्त्वाची भूमीका

देशात गेल्या मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत होती. दरम्यान त्यासाठी शासनाकडून कंत्राटी तत्त्वावर आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. मात्र कोरोनाचा प्रदुर्भाव कमी होताच, त्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांच्या सोबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर कोविड सेंटरमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून न काढता आरोग्य विभागाच्या रिक्त जागांवर त्यांची नियुक्ती करावी असे आदेश दिल्याचा दावा संघर्ष समितीने केला आहे. मात्र आरोग्य यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

या आहेत प्रमुख मागण्या

1 जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना सरळ सेवा भरतीद्वारे आरोग्य विभागात नोकरीत सामावून घेणे
2 कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करावे, त्यांना शासकीय अनुभवाचे प्रमाणपत्र द्यावे

3 जिल्ह्यातील रखडलेली शासकीय नोकर भरती तातडीने सुरू करून, त्यामध्ये स्थानिक भूमीपुत्रांना स्थान द्यावे

4 फेब्रुवारी 2019 साली आरोग्य खात्यांतर्गत झालेली महापोर्टल ऑनलाइन भरती प्रक्रिया रद्द करावी

पालघर - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी जिल्ह्यात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात आली होती. त्यांची जिल्ह्यातल्या विविध कोविड सेंटरमध्ये नियुक्ती करण्यात आली, त्यांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. मात्र अचानक त्यांना आता सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. तसेच त्यांचे वेतनही थकवले असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी आज या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान अचानक कामावरून काढून टाकण्यात आल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी त्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, तसेच थकीत वेतन तातडीने मिळावे यासाठी महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन, योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले होते, मात्र महिनाभरानंतरही काहीच कारवाई न झाल्याने, संतप्त झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

कोरोना रुग्णांच्या सेवेत बजावली महत्त्वाची भूमीका

देशात गेल्या मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत होती. दरम्यान त्यासाठी शासनाकडून कंत्राटी तत्त्वावर आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. मात्र कोरोनाचा प्रदुर्भाव कमी होताच, त्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांच्या सोबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर कोविड सेंटरमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून न काढता आरोग्य विभागाच्या रिक्त जागांवर त्यांची नियुक्ती करावी असे आदेश दिल्याचा दावा संघर्ष समितीने केला आहे. मात्र आरोग्य यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

या आहेत प्रमुख मागण्या

1 जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना सरळ सेवा भरतीद्वारे आरोग्य विभागात नोकरीत सामावून घेणे
2 कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करावे, त्यांना शासकीय अनुभवाचे प्रमाणपत्र द्यावे

3 जिल्ह्यातील रखडलेली शासकीय नोकर भरती तातडीने सुरू करून, त्यामध्ये स्थानिक भूमीपुत्रांना स्थान द्यावे

4 फेब्रुवारी 2019 साली आरोग्य खात्यांतर्गत झालेली महापोर्टल ऑनलाइन भरती प्रक्रिया रद्द करावी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.