ETV Bharat / state

इगतपुरी रेल्वेस्थानकात पुष्पक एक्स्प्रेसचा डब्बा रूळावरून घसरला

मुंबई-लखनऊ पुष्पक एक्सप्रेसचा एक कोच (डबा) रुळावरुन घसरला. रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.

author img

By

Published : Oct 26, 2019, 1:33 PM IST

रूळावरून घसरलेले चाक

नाशिक - मुंबई-लखनऊ पुष्पक एक्सप्रेसचा एक कोच (डबा) रुळावरुन घसरला. इगतपुरी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक तीनवर आज (शनिवारी) ही घटना घडली.

इगतपुरी रेल्वे स्थानकात पुष्पक एक्सप्रेस आली असता जनरल कोच (सामान्य डबा) रुळावरून घसरला. यावेळी एक्स्प्रेसचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, यामुळे मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिवाळीच्या गर्दीमध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून डब्यातील प्रवाशांना खाली उतरविण्यात आले आहे. तसेच दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मुंबईकडून नाशिकच्या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान दीड ते दोन तास लागेल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नाशिक - मुंबई-लखनऊ पुष्पक एक्सप्रेसचा एक कोच (डबा) रुळावरुन घसरला. इगतपुरी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक तीनवर आज (शनिवारी) ही घटना घडली.

इगतपुरी रेल्वे स्थानकात पुष्पक एक्सप्रेस आली असता जनरल कोच (सामान्य डबा) रुळावरून घसरला. यावेळी एक्स्प्रेसचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, यामुळे मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिवाळीच्या गर्दीमध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून डब्यातील प्रवाशांना खाली उतरविण्यात आले आहे. तसेच दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मुंबईकडून नाशिकच्या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान दीड ते दोन तास लागेल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Intro:इगतपुरी रेल्वेस्थानकावर पुष्पक एक्स्प्रेसचा डब्बा रूळावरून घसरला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला..


Body:मुंबई -लखनऊ पुष्पक एक्सप्रेस चा एक कोच( डबा) रुळावरुन घसरला,इगतपुरी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर शनिवारी ही घटना घडली ,रेल्वे इगतपुरी स्टेशन वर पुष्पक एक्सप्रेस आली असता जनरल कॉच रुळावरून घसरला, यावेळी एक्स्प्रेसचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला,मात्र ह्या मुळे तमुंबईकडून नाशिक कडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे, दिवाळीच्या गर्दीमध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय, रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून कोच मधील प्रवाशांना खाली उतरविण्यात आले आहे, तसेच दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, मुंबईकडून नाशिक मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान दीड ते दोन तास लागेल अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे...


तसेच ठाणे- डोंबिवली स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे,मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल कडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे,दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे, यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम झाला असून लांब पल्ल्याच्या गाड्या ठाणे आणि दादर स्थानकात काही काळ रखडल्या आहेत...


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.