ETV Bharat / state

कौतुकास्पद..! 'ग्रीन रिव्होल्यूशन'ने 150 वटवृक्षांची लागवड करुन साजरी केली वटपौर्णिमा

नाशिकमधील 'ग्रीन रिव्होल्यूशन' या संस्थेने 150 वटवृक्ष लावून वटपौर्णिमा साजरी केली आहे.

author img

By

Published : Jun 16, 2019, 5:25 PM IST

कौतुकास्पद..! 'ग्रीन रिव्होल्यूशन'ने 150 वटवृक्षांची लागवड करुन साजरी केली वटपौर्णिमा

नाशिक - भारतीय परंपरेतील वटपौर्णिमा हा महत्त्वाचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. सर्व सुवासिनी स्त्रिया आजच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून हा सण साजरा करतात. मात्र, नाशिकमधील 'ग्रीन रिव्होल्यूशन' या संस्थेने 150 वटवृक्ष लावून वटपौर्णिमा साजरी केली आहे. त्यामुळे त्यांच्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

वटपौर्णिमा हा सण स्त्रियांसाठी जिव्हाळ्याचा असला तरी पर्यावरणप्रेमींसाठी मन विषण्ण करणारा अनुभव असतो. पौर्णिमेनंतर शहरी भागात 2-3 दिवस रस्त्यावर वडाच्या फांद्या पायदळी तुडवल्या जातात. त्यामुळे धार्मिक महत्त्व असलेल्या वृक्षाच्या फांद्या न तोडता या वृक्षाची लागवड करावी, यासाठी ग्रीन रिव्होल्यूशनच्या वतीने 150 वटवृक्षांची लागवड करण्यात आली.

ग्रीन रिव्होल्यूशन टिमने मागील वर्षी 51 वटवृक्ष लावून वर्षभर त्याचे संगोपन केले आहे. तसेच यावर्षीही त्यांनी वटवृक्षांची लागवड केली आहे. यावेळी पुरुष, महिला, लहान मुलींनी सहभाग नोंदविला.

नाशिक - भारतीय परंपरेतील वटपौर्णिमा हा महत्त्वाचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. सर्व सुवासिनी स्त्रिया आजच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून हा सण साजरा करतात. मात्र, नाशिकमधील 'ग्रीन रिव्होल्यूशन' या संस्थेने 150 वटवृक्ष लावून वटपौर्णिमा साजरी केली आहे. त्यामुळे त्यांच्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

वटपौर्णिमा हा सण स्त्रियांसाठी जिव्हाळ्याचा असला तरी पर्यावरणप्रेमींसाठी मन विषण्ण करणारा अनुभव असतो. पौर्णिमेनंतर शहरी भागात 2-3 दिवस रस्त्यावर वडाच्या फांद्या पायदळी तुडवल्या जातात. त्यामुळे धार्मिक महत्त्व असलेल्या वृक्षाच्या फांद्या न तोडता या वृक्षाची लागवड करावी, यासाठी ग्रीन रिव्होल्यूशनच्या वतीने 150 वटवृक्षांची लागवड करण्यात आली.

ग्रीन रिव्होल्यूशन टिमने मागील वर्षी 51 वटवृक्ष लावून वर्षभर त्याचे संगोपन केले आहे. तसेच यावर्षीही त्यांनी वटवृक्षांची लागवड केली आहे. यावेळी पुरुष, महिला, लहान मुलींनी सहभाग नोंदविला.

Intro:भारतीय परंपरेतील महत्त्वाचा सण असणारा वटपौर्णिमा आज सर्वत्र साजरा होत आहे वडाच्या झाडाची पूजा करून हा सण साजरा करतात परंतु नाशिक मधील ग्रीन रिव्होल्यूशन या संस्थेने दीडशे वटवृक्ष चुंचाळे येथील टेकडीवर लावून वटपौर्णिमा सण साजरा केलाय


Body:वटपौर्णिमा हा सण स्त्रियांसाठी जरी जिव्हाळ्याचा असला तरी पर्यावरणप्रेमींसाठी मात्र तो मन विषण्ण करणारा अनुभव असतो
पौर्णिमेनंतर शहरी भागात दोन-तीन दिवस रस्त्यावर पडलेल्या फांद्या पायदळी तुडवल्या जातात यामुळे धार्मिक महत्त्व असलेल्या वृक्षाच्या फांद्या न तोडता या वृक्षाची लागवड करावी याकरता ग्रीन रिव्होल्यूशन टिमच्या वतीने दीडशे वटवृक्षांची लागवड करून हे व्रत साजरं करण्यात आलेय..


Conclusion:मागील वर्षी ग्रीन रिव्होल्यूशन टिमने 51 वटवृक्ष लावून वर्षभर त्याचे संगोपन केले आहे हे वटवृक्ष लावत असताना पुरुष तसेच लहान मुली ,महिला यांच्या सहभागाने वृक्ष लावण्याचे व त्यांच्या संगोपनाचे काम वर्षभर रिव्होल्यूशन संस्था आनंदाने करत असते
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.