नाशिक - जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 5 हजार 463 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 4 हजार 268 जागांवर प्रत्यक्षात निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने आता खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंग आला आहे.
हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणाचा ‘ड्राय रन’ उद्याापासून - जिल्हाधिकारी
जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 16 हजार 668 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननीत 443 अर्ज बाद झाले, तर 5 हजार 563 जणांनी माघार घेतली असून त्यामुळे आता 11 हजार 105 अर्ज शिल्लक राहिले असून त्यातील 1 हजार 727 जागा अविरोध झाल्या, तर सध्यास्थितीत 4 हजार 268 जागांवर प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. त्यामुळे, गावखेड्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
नांदगाव मधून सर्वाधिक माघार
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत येवला तालुक्यातून 573, तर नांदगाव तालुक्यातून सर्वाधिक 654 जणांनी माघार घेतली. त्यामुळे, सध्यास्थितीत येवल्यातील 69 ग्रामपंचायतींच्या 653 जागांसाठी 1 हजार 252 उमेदवार रिंगणात आहेत. तर, नांदगाव मधील 59 ग्रामपंचायतींच्या 527 जागांसाठी 1 हजार 14 उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढवणार आहे.
तालुकानिहाय अविरोध जागा
इगतपुरी - 11
येवला - 189
कळवण - 102
दिंडोरी - 163
निफाड - 148
त्र्यंबकेश्वर - 8
बागलाण - 163
देवळा - 61
नांदगाव - 144
मालेगाव - 210
नाशिक - 52
सिन्नर - 238
चांदवड - 138
एकूण - 1627
हेही वाचा - नाशिकच्या दुडगाव शिवारात बिबट्या जेरबंद, आणखी बिबटे असण्याची शक्यता