ETV Bharat / state

'पारदर्शक' हा मुख्यमंत्र्यांचा लाडका 'शब्द', त्यामुळे पारदर्शकपणे त्यांनी सगळं सांगितलं पाहिजे - सुप्रिया सुळे

author img

By

Published : Aug 13, 2019, 6:47 PM IST

Updated : Aug 13, 2019, 9:08 PM IST

'पारदर्शक' हा मुख्यमंत्र्यांचा लाडका शब्द आहे. त्यामुळे, पूरग्रस्त जिल्ह्यात काय परिस्थिती आहे हे पारदर्शकपणे त्यांनी सगळ्यांना सांगण्याची गरज आहे. नुसते घर दिले, बिस्किटचा पुडा दिला की, आपली जबाबदारी संपणार नाही. तर, तिथे जावून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याची आपली जबाबदारी आहे, असेही खासदार सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे

मुंबई - 'पारदर्शक' हा मुख्यमंत्र्यांचा लाडका शब्द आहे. त्यामुळे पूरग्रस्त जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, हे पारदर्शकपणे त्यांनी सगळ्यांना सांगण्याची गरज आहे. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयीन वार्ताहर कक्षात पत्रकारांशी संवाद साधताना लगावला.


पूरग्रस्त भागातील जिल्ह्यात सध्या मदतीची गरज आहे. याबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. हे कशामुळे झाले हे शोधण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत पोचवणे, त्यांना औषधांचा साठा पुरवणे आणि त्यांची घरे तत्काळ कशी उभी करता येतील हे पाहणे गरजेचे आहे. हा एक भावनिक विषय आहे, नुसते घर दिले, बिस्किटचा पुडा दिला की आपली जबाबदारी संपणार नाही. तर, तिथे जावून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याची आपली जबाबदारी आहे, असेही खासदार सुळे म्हणाल्या.

शरद पवार मुख्यमंत्री असताना लातूरचा भूकंप झाला होता. त्यावेळी सलग १५ दिवस प्रशासन घेऊन ते लीड करत होते, अशी आठवणही खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितली. जेव्हा असे प्रसंग येतात त्यावेळी तिथे जावून मांडी घालून बसलंच पाहिजे आणि लोकांना वेळ दिला पाहिजे, असेही खासदार सुळे यांनी सांगितले.


पवार साहेब आजही कराडला जात आहेत. आमचे सगळे नेते विशेषतः दादा, धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हसन मुश्रीफ आदींसह सगळेच नेते आपापल्या क्षेत्रात जावून अंग झटकून काम करत आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही खासदार सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुंबई - 'पारदर्शक' हा मुख्यमंत्र्यांचा लाडका शब्द आहे. त्यामुळे पूरग्रस्त जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, हे पारदर्शकपणे त्यांनी सगळ्यांना सांगण्याची गरज आहे. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयीन वार्ताहर कक्षात पत्रकारांशी संवाद साधताना लगावला.


पूरग्रस्त भागातील जिल्ह्यात सध्या मदतीची गरज आहे. याबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. हे कशामुळे झाले हे शोधण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत पोचवणे, त्यांना औषधांचा साठा पुरवणे आणि त्यांची घरे तत्काळ कशी उभी करता येतील हे पाहणे गरजेचे आहे. हा एक भावनिक विषय आहे, नुसते घर दिले, बिस्किटचा पुडा दिला की आपली जबाबदारी संपणार नाही. तर, तिथे जावून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याची आपली जबाबदारी आहे, असेही खासदार सुळे म्हणाल्या.

शरद पवार मुख्यमंत्री असताना लातूरचा भूकंप झाला होता. त्यावेळी सलग १५ दिवस प्रशासन घेऊन ते लीड करत होते, अशी आठवणही खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितली. जेव्हा असे प्रसंग येतात त्यावेळी तिथे जावून मांडी घालून बसलंच पाहिजे आणि लोकांना वेळ दिला पाहिजे, असेही खासदार सुळे यांनी सांगितले.


पवार साहेब आजही कराडला जात आहेत. आमचे सगळे नेते विशेषतः दादा, धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हसन मुश्रीफ आदींसह सगळेच नेते आपापल्या क्षेत्रात जावून अंग झटकून काम करत आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही खासदार सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Intro:*पारदर्शक' हा मुख्यमंत्र्यांचा लाडका 'शब्द' आहे त्यामुळे पारदर्शकपणे त्यांनी सगळं सांगितलं पाहिजे - खासदार सुप्रिया सुळे


mh-mum-01-ncp-supriyasule-byte-7201153
(Mojovar byte पाठवला आहे)


मुंबई ता. १३ :

'पारदर्शक' हा मुख्यमंत्र्यांचा लाडका शब्द आहे त्यामुळे पुरग्रस्त जिल्हयात काय परिस्थिती आहे हे पारदर्शकपणे सगळ्यांना सांगण्याची गरज आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मंत्रालयीन वार्ताहर कक्षात पत्रकारांशी संवाद साधताना लगावला.
पुरग्रस्त भागातील जिल्हयात सध्या मदतीची गरज आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली.
हे कशामुळे झाले आहे असा प्रयत्न आमचा असणार आहे. पुरग्रस्तांना तातडीची मदत पोचवणं, त्यांना औषधांचा साठा देणं आणि त्यांची घरं तात्काळ कशी उभी करता येतील हे पाहणं गरजेचं आहे. हे भावनिक विषय आहेत. नुसतं घर दिलं, बिस्किटचा पुडा दिला की आपली जबाबदारी संपणार नाही. आपल्याला तिथे सगळ्यांना जावून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी आपली आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
शरद पवारसाहेब मुख्यमंत्री असताना लातुरचा भूकंप झाला होता. त्यावेळी सलग १५ दिवस प्रशासन घेवून ते लीड करत होते अशी आठवणही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी सांगितली
जेव्हा असे प्रसंग येतात त्यावेळी तिथे जावून मांडी घालून बसलंच पाहिजे आणि लोकांना वेळ दिला पाहिजे असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले
पवार साहेब आजही कराडला जात आहेत. आमचे सगळे नेते विशेषतः दादा, धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हसन मुश्रीफ आदींसह सगळेच नेते फिल्डवर जावून अंग झटकून काम करत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.Body:*पारदर्शक' हा मुख्यमंत्र्यांचा लाडका 'शब्द' आहे त्यामुळे पारदर्शकपणे त्यांनी सगळं सांगितलं पाहिजे - खासदार सुप्रिया सुळे
Conclusion:
Last Updated : Aug 13, 2019, 9:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.