ETV Bharat / state

Sanjay Raut on BJP : हा राजकीय हिंसाचार! राऊतांची भाजपसह निवडणूक आयोगावर जोरदार टिका

author img

By

Published : Feb 18, 2023, 11:17 AM IST

Updated : Feb 18, 2023, 11:26 AM IST

कितीही घुसखोर घुसले आणि काहीही चोरले, तरी आम्ही जिवंत आहोत असे म्हणत हे दिल्लीतील महाशक्तीने सगळे फिक्स केले होते असे संजय राऊत म्हणाले आहेत. हा शिवसेना फोडण्याचा निर्णय घेतला असा खळबळजनक दावा करत केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी जोरदार टिका केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Sanjay Raut Criticize BJP
राऊतांची भाजपवर जोरदार टिका

मुंबई : ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर टीका केली विरोधी पक्षांनी एकत्र येत निवडणूक आयोगाला जाब विचारण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. तुम्हाला अधिकार दिले मग तुम्ही असे निर्णय कसे घेऊ शकता असाही प्रश्न राऊतांनी विचारला आहे. याचवेळी लोक आमच्यासोबत आहेत असा दावाही त्यांनी केला आहे. बोलताना त्यांनी राणे यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली दुसऱ्याच्या लग्नात अब्दुल्ला दिवाना असे म्हटले.

हा राजकीय हिंसाचार : आज जे काही होत आहे, तो राजकीय हिंसाचार आहे असे म्हणत राऊत यांनी जोरदार टिका केली आहे. याचवेळी जे आमच्यातून गेले ते पुन्हा निवडणून येणार नाहीत. कोणतेही नाव आणि कोणतेही चिन्ह घेऊद्या हे लोक तुम्हाला कोणत्याच सभागृहात दिसणार नाहीत, असेही राऊत म्हणाले आहेत.

पश्चिम बंगालसारखी परिस्थिती : मोदी आणि शाहा यांनी पंश्चिम बंगालमध्ये जो काही हैदोस घातला, त्याला जनतेने नाकारले आणि पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी निवडणून आल्या असा दाखला देत राऊत यांनी आम्हालाच पुन्हा बहुमत मिळेल असा दावा त्यांनी यावेळी बोलतना केला आहे.

आता ही लढाई शिंदे विरुद्ध ठाकरे नाही : आता ही लढाई शिंदे विरुद्ध ठाकरे नसून ठाकरेंची शिवसेना वुरुद्ध महाशक्ती अशी आहे असे म्हणत राऊत यांनी यावेळी भाजपवरही जोरदार घणाघात केला आहे. तसेच, ज्यांनी या लोकांना वापरून घेतले त्यांच्या जिवावर हे लोक आमच्याशी लढत आहेत असे म्हणत राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

समता पक्ष नाही : समता परिषदेने मशाल चिन्हाची मागणी केली आहे असा प्रश्न विचारताच काट्याने काटा काढण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, समता परिषद हा पक्ष नाही. असे म्हणत त्यांचे आम्हाला आव्हान नाही. तसेच, ४० आमदार आणि काही खासदार घेऊन तुम्ही पक्ष म्हणता असे कसे होते असे म्हणत राऊत यांनी निवडणुक आयोगावरही टीका केली आहे.

हे निवडणूक आयोग ठरवणार नाही : बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख निवडले होते. ते निवडणूक आयोग ठरवणार नाही म्हणत उद्धव ठाकरेच आमचे सेनापती आहेत आणि तेच आमचे पक्षप्रमुख आहेत. तसेच, शिवसेना भवनासह शिवसेनेच्या शाखा या अशाच राहतील असा दावा राऊत यांनी केला.

दावा कसा खरा ठरला : हा निर्णय अगोदरच घेतला आणि नंतर शिवसेना पक्ष फोडला असा खळबळजनक दावा करत दिल्लीतील महाशक्तीने हे फिक्स केले होते असे म्हणत हाऊत यांनी केंद्रावर जोरदार टिका केली. याचवेळी कोकणात जसे माकड येता तसेच हत्तीही येतात असे म्हणत राऊत यांनी राणे यांना अप्रत्यक्ष टीका केली आहे.

हेही वाचा :Amit Shah Pune Visit : अमित शाह यांचा आज पुणे दौरा, गिरीश बापट यांची घेणार भेट

मुंबई : ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर टीका केली विरोधी पक्षांनी एकत्र येत निवडणूक आयोगाला जाब विचारण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. तुम्हाला अधिकार दिले मग तुम्ही असे निर्णय कसे घेऊ शकता असाही प्रश्न राऊतांनी विचारला आहे. याचवेळी लोक आमच्यासोबत आहेत असा दावाही त्यांनी केला आहे. बोलताना त्यांनी राणे यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली दुसऱ्याच्या लग्नात अब्दुल्ला दिवाना असे म्हटले.

हा राजकीय हिंसाचार : आज जे काही होत आहे, तो राजकीय हिंसाचार आहे असे म्हणत राऊत यांनी जोरदार टिका केली आहे. याचवेळी जे आमच्यातून गेले ते पुन्हा निवडणून येणार नाहीत. कोणतेही नाव आणि कोणतेही चिन्ह घेऊद्या हे लोक तुम्हाला कोणत्याच सभागृहात दिसणार नाहीत, असेही राऊत म्हणाले आहेत.

पश्चिम बंगालसारखी परिस्थिती : मोदी आणि शाहा यांनी पंश्चिम बंगालमध्ये जो काही हैदोस घातला, त्याला जनतेने नाकारले आणि पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी निवडणून आल्या असा दाखला देत राऊत यांनी आम्हालाच पुन्हा बहुमत मिळेल असा दावा त्यांनी यावेळी बोलतना केला आहे.

आता ही लढाई शिंदे विरुद्ध ठाकरे नाही : आता ही लढाई शिंदे विरुद्ध ठाकरे नसून ठाकरेंची शिवसेना वुरुद्ध महाशक्ती अशी आहे असे म्हणत राऊत यांनी यावेळी भाजपवरही जोरदार घणाघात केला आहे. तसेच, ज्यांनी या लोकांना वापरून घेतले त्यांच्या जिवावर हे लोक आमच्याशी लढत आहेत असे म्हणत राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

समता पक्ष नाही : समता परिषदेने मशाल चिन्हाची मागणी केली आहे असा प्रश्न विचारताच काट्याने काटा काढण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, समता परिषद हा पक्ष नाही. असे म्हणत त्यांचे आम्हाला आव्हान नाही. तसेच, ४० आमदार आणि काही खासदार घेऊन तुम्ही पक्ष म्हणता असे कसे होते असे म्हणत राऊत यांनी निवडणुक आयोगावरही टीका केली आहे.

हे निवडणूक आयोग ठरवणार नाही : बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख निवडले होते. ते निवडणूक आयोग ठरवणार नाही म्हणत उद्धव ठाकरेच आमचे सेनापती आहेत आणि तेच आमचे पक्षप्रमुख आहेत. तसेच, शिवसेना भवनासह शिवसेनेच्या शाखा या अशाच राहतील असा दावा राऊत यांनी केला.

दावा कसा खरा ठरला : हा निर्णय अगोदरच घेतला आणि नंतर शिवसेना पक्ष फोडला असा खळबळजनक दावा करत दिल्लीतील महाशक्तीने हे फिक्स केले होते असे म्हणत हाऊत यांनी केंद्रावर जोरदार टिका केली. याचवेळी कोकणात जसे माकड येता तसेच हत्तीही येतात असे म्हणत राऊत यांनी राणे यांना अप्रत्यक्ष टीका केली आहे.

हेही वाचा :Amit Shah Pune Visit : अमित शाह यांचा आज पुणे दौरा, गिरीश बापट यांची घेणार भेट

Last Updated : Feb 18, 2023, 11:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.