ETV Bharat / state

मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात..! संदीप देशपांडेंचा टोला

author img

By

Published : Mar 18, 2021, 1:49 PM IST

सचिन वाझेंना एनआयएने अटक केल्यानंतर ठाकरे सरकारने मुंबई पोलीस आयुक्त परबिरसिंह यांची बदली केली. त्यावरून मनसे नेते संदिप देशपांडे यांनी टीका केली आहे.

राजकारणात प्यादीच मरतात..!  संदीप देशपांडेंचा टोला
राजकारणात प्यादीच मरतात..! संदीप देशपांडेंचा टोला

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणामुळे सत्ताधारी शिवसेना अडचणीत सापडली आहे. विरोधकांकडून शिवसेनेला घेरण्याची कोणतीही संधी सोडली जात नाही, असे असतानाच या प्रकरणावरून आता मनसेनेही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे. या व्हिडिओद्वारे मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात, असा टोला संदीप देशपांडे यांनी सरकारला लगावला आहे.

संदीप देशपांडेंचा टोला
संदीप देशपांडेंचा टोला
काय आहे संपूर्ण प्रकरण-

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओ कारचे प्रकरण दिवसेंदिवस गाजत आहे. या प्रकरणामध्ये मुंबई पोलीस सीआयूचे अधिकारी सचिन वाझेचे देखील नाव समोर आल्याने सर्वांना धक्का बसला. सचिन वाझे यांना या प्रकरणी निलंबित देखील करण्यात आले. एनआयएकडून सचिन वाझेंची सध्या चौकशी सुरू आहे. मात्र या प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचेही नाव वादात सापडले. त्यानंतर बुधवारी राज्य सरकारकडून त्यांची बदली करण्यात आली होती. यावरूनच संदीप देशपांडे यांनी राजकारणात प्यादीच मरतात असा टोला लगावला आहे.

कोरोनावरूनही साधला होता निशाणा-

संदीप देशपांडे यांनी याआधी देखील कोरोनावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. महाराष्ट्राला लागून असलेली राज्य गोवा, गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश इथे कोरोना वाढत नाही. 'कोरोनाचे महाराष्ट्रावर प्रेम आहे, की महाराष्ट्र सरकारचे कोरोनावर प्रेम आहे? स्वतःचे अपयश झाकण्यासाठी टाळे बंदी आणि कोरोनाचा वापर होतो? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला होता.

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणामुळे सत्ताधारी शिवसेना अडचणीत सापडली आहे. विरोधकांकडून शिवसेनेला घेरण्याची कोणतीही संधी सोडली जात नाही, असे असतानाच या प्रकरणावरून आता मनसेनेही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे. या व्हिडिओद्वारे मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात, असा टोला संदीप देशपांडे यांनी सरकारला लगावला आहे.

संदीप देशपांडेंचा टोला
संदीप देशपांडेंचा टोला
काय आहे संपूर्ण प्रकरण-

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओ कारचे प्रकरण दिवसेंदिवस गाजत आहे. या प्रकरणामध्ये मुंबई पोलीस सीआयूचे अधिकारी सचिन वाझेचे देखील नाव समोर आल्याने सर्वांना धक्का बसला. सचिन वाझे यांना या प्रकरणी निलंबित देखील करण्यात आले. एनआयएकडून सचिन वाझेंची सध्या चौकशी सुरू आहे. मात्र या प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचेही नाव वादात सापडले. त्यानंतर बुधवारी राज्य सरकारकडून त्यांची बदली करण्यात आली होती. यावरूनच संदीप देशपांडे यांनी राजकारणात प्यादीच मरतात असा टोला लगावला आहे.

कोरोनावरूनही साधला होता निशाणा-

संदीप देशपांडे यांनी याआधी देखील कोरोनावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. महाराष्ट्राला लागून असलेली राज्य गोवा, गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश इथे कोरोना वाढत नाही. 'कोरोनाचे महाराष्ट्रावर प्रेम आहे, की महाराष्ट्र सरकारचे कोरोनावर प्रेम आहे? स्वतःचे अपयश झाकण्यासाठी टाळे बंदी आणि कोरोनाचा वापर होतो? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.