ETV Bharat / state

Border Dispute : सीमेवरील वातावरण निवळेपर्यंत लालपरी कर्नाटकात जाणार नाही

author img

By

Published : Dec 6, 2022, 6:24 PM IST

कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवरील (Karnataka and Maharashtra border disputes) दोन्ही बाजूच्या पोलिसांनी सुरक्षेच्या (instructions of police) कारणास्तव आपापल्या बस सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या (Lalpari not go to Karnataka until matter clears) आहेत. एस टी महामंडळ आयुक्त शेखर चन्ने यांनी लाल परी काही काळ बंद केल्याचे सांगितले. तर सीमा भागातील लाल परी बंद झाल्याने सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. Border Disputes

Border Disputes
लालपरी कर्नाटकात जाणार नाही

मुंबई : कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोंम्मई यांनी महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील (Karnataka and Maharashtra border disputes) काही खेड्यावर दावा केला, त्यावर अनेक विधाने केली. त्यानंतर सांगली जिल्ह्यात कर्नाटकचे पाटाचे पाणी देखील सोडले. राज्याच्या सरकारकडून समजुतीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न दिसतो. मात्र वातावरण काही मिटता मिटत नाही. याचा परिणाम सीमेवरील भागात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ह्या पार्श्वभूमीवर पोलीसांच्या सुचनेनुसार (instructions of police) महाराष्ट्र एस टी महामंडळच्या वतीने देखील बस पाठवणे (Lalpari not go to Karnataka until matter clears) काही काळ स्थगित केलं. Border Disputes


महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला : राज्यातील राजकारण सध्या वेगवेगळ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत विधान केले. त्याचा राग शांत होत नाही तोच, आता कर्नाटक महाराष्ट्र असा वाद पेटला आहे. कर्नाटक मुख्यमंत्री बोंम्मई यांच्या चिथावणीखोर विधानानंतर मविआचे मार्गदर्शक जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील कणखर भूमिका घेतली. राज्यभर कर्नाटक विरोधात निदर्शनं होताना दिसून येत आहे. पुण्यातही त्या घटनेचे जोरदार पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला.



कर्नाटकाच्या बसेसला फासले काळे : महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला आहे. त्याला उत्तर देण्याची तयारी देखील महाराष्ट्र सीमा भागातील जनतेने केली आहे. हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर देखील महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा वाद दिसून आला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकाच्या बसेसला काळे फासले.

लाल परी बंद झाली : महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान अत्यंत निषेधार्ह आहे. कुणीही कुणालाही कुठेही जाण्यापासून रोखू शकत नाही. त्यामुळे आम्हाला कर्नाटकात जाण्यापासून त्यांना रोखता येणार नाही. मात्र, आम्ही तिथे गेल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. म्हणून आम्ही गेलो नाही, असा त्यांनी दावा केला आहे. आणि या वादाचा परिणाम म्हणजे लाल परी बंद झाली.



अनेक प्रश्न उपस्थित : वादाचा फटका मात्र दोन्ही राज्यातील सामान्य जनतेला बसला. कारण हजारो महाराष्ट्रातील लोकांचे कर्नाटकात नातेवाईक राहतात. त्यांचे नेहमी जाणे येणे असते. त्या शिवाय उद्योग काम धंदा बाबत देखील हजारो लोकं रोज बस ने ये जा करतात. ह्या बाबत महाराष्ट्र एस टी महामंडळ आयुक्त शेखर चन्ने यांना विचारले असता त्यांनी सांगितले, 'कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. दोन्ही बाजूचे लोक आणि कार्यकर्ते यांच्यात तणावाची स्थिती असताना पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे नमूद केले'. तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात महाराष्ट्रीयन नागरिक रामचंद्र गोणी म्हणाले, 'आम्ही शेतीचे कामासाठी कर्नाटक हद्दीमधून जातो. आता बघा हे काय एस टी बंद केली आहे. सांगा आम्ही शेतीला कस जायचं. बेळगावचा दवाखाना आम्हाला जवळ पडतो, पण एसटी बंद हाय तर दवा पाणी कसं करणार'. Border Disputes

मुंबई : कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोंम्मई यांनी महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील (Karnataka and Maharashtra border disputes) काही खेड्यावर दावा केला, त्यावर अनेक विधाने केली. त्यानंतर सांगली जिल्ह्यात कर्नाटकचे पाटाचे पाणी देखील सोडले. राज्याच्या सरकारकडून समजुतीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न दिसतो. मात्र वातावरण काही मिटता मिटत नाही. याचा परिणाम सीमेवरील भागात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ह्या पार्श्वभूमीवर पोलीसांच्या सुचनेनुसार (instructions of police) महाराष्ट्र एस टी महामंडळच्या वतीने देखील बस पाठवणे (Lalpari not go to Karnataka until matter clears) काही काळ स्थगित केलं. Border Disputes


महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला : राज्यातील राजकारण सध्या वेगवेगळ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत विधान केले. त्याचा राग शांत होत नाही तोच, आता कर्नाटक महाराष्ट्र असा वाद पेटला आहे. कर्नाटक मुख्यमंत्री बोंम्मई यांच्या चिथावणीखोर विधानानंतर मविआचे मार्गदर्शक जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील कणखर भूमिका घेतली. राज्यभर कर्नाटक विरोधात निदर्शनं होताना दिसून येत आहे. पुण्यातही त्या घटनेचे जोरदार पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला.



कर्नाटकाच्या बसेसला फासले काळे : महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला आहे. त्याला उत्तर देण्याची तयारी देखील महाराष्ट्र सीमा भागातील जनतेने केली आहे. हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर देखील महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा वाद दिसून आला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकाच्या बसेसला काळे फासले.

लाल परी बंद झाली : महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान अत्यंत निषेधार्ह आहे. कुणीही कुणालाही कुठेही जाण्यापासून रोखू शकत नाही. त्यामुळे आम्हाला कर्नाटकात जाण्यापासून त्यांना रोखता येणार नाही. मात्र, आम्ही तिथे गेल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. म्हणून आम्ही गेलो नाही, असा त्यांनी दावा केला आहे. आणि या वादाचा परिणाम म्हणजे लाल परी बंद झाली.



अनेक प्रश्न उपस्थित : वादाचा फटका मात्र दोन्ही राज्यातील सामान्य जनतेला बसला. कारण हजारो महाराष्ट्रातील लोकांचे कर्नाटकात नातेवाईक राहतात. त्यांचे नेहमी जाणे येणे असते. त्या शिवाय उद्योग काम धंदा बाबत देखील हजारो लोकं रोज बस ने ये जा करतात. ह्या बाबत महाराष्ट्र एस टी महामंडळ आयुक्त शेखर चन्ने यांना विचारले असता त्यांनी सांगितले, 'कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. दोन्ही बाजूचे लोक आणि कार्यकर्ते यांच्यात तणावाची स्थिती असताना पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे नमूद केले'. तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात महाराष्ट्रीयन नागरिक रामचंद्र गोणी म्हणाले, 'आम्ही शेतीचे कामासाठी कर्नाटक हद्दीमधून जातो. आता बघा हे काय एस टी बंद केली आहे. सांगा आम्ही शेतीला कस जायचं. बेळगावचा दवाखाना आम्हाला जवळ पडतो, पण एसटी बंद हाय तर दवा पाणी कसं करणार'. Border Disputes

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.