ETV Bharat / state

मुंबई तुंबली, रस्ते वाहतूक कोलमडली

मुंबईमत पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. आज तिसऱ्या दिवशीही मुंबईला पावसाने झोडपले. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत २४९.७ मिमीची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईची तुंबई झाल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला.

author img

By

Published : Sep 4, 2019, 2:07 PM IST

Updated : Sep 4, 2019, 2:53 PM IST

मुंबई तुंबल्याचे बोलके छायाचित्र

मुंबई - मागील महिनाभरापासून गायब असलेल्या पावसाने मुंबईमध्ये पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. आज तिसऱ्या दिवशीही मुंबईला पावसाने झोडपले. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत २४९.७ मिमीची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईची तुंबई झाल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला.

मुंबई तुंबली

सोमवारी गणपती आगमनासह मुसळधार पावसाने पुन्हा श्री गणेशा केला. मुंबईत सोमवारी दिवसभरात १३१.४ मिमी पाऊस पडला. तर मंगळवारी ११८.३ मिमी पाऊस पडला. मुंबईत आजही पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात कुलाबा येथे १२२, तर सांताक्रूझ येथे ११८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे माटुंगा, किंग सर्कल, दादर, हिंदमाता, सायन, प्रतीक्षा नगर, दादर, अंधेरी, वांद्रे, कुर्ला, गोरेगाव, कांदिवली, घाटकोपर आदी सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. याठिकाणची वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली.

गरज असेल तरच घराबाहेर पडा


मुंबईत मुसळधार पाऊस राहील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. यामुळे पालिकेने खबरदारी म्हणून मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. याचबरोबर लोकांनी समुद्र किनाऱ्यांपासून लांब राहावे, असे आवाहनही केले आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचेही आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

तेराशे लोकांना सुरक्षित स्थळी हलवले


२६ जुलै २००५ ला मिठी नदीने मुंबईत हाहाकार उडवला होता. मुंबईत पाऊस पडू लागल्यावर आजही सर्वात जास्त भीती असते त्या मिठी नदीचीच. गेले दोन दिवस पाऊस पडत आहे. आज सकाळीही पावसाचा जोर कायम राहिला आहे. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे एनडीआरएफच्या मदतीने कुर्ल्यातील क्रांतीनगर परिसरातून १३०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

मुंबई - मागील महिनाभरापासून गायब असलेल्या पावसाने मुंबईमध्ये पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. आज तिसऱ्या दिवशीही मुंबईला पावसाने झोडपले. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत २४९.७ मिमीची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईची तुंबई झाल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला.

मुंबई तुंबली

सोमवारी गणपती आगमनासह मुसळधार पावसाने पुन्हा श्री गणेशा केला. मुंबईत सोमवारी दिवसभरात १३१.४ मिमी पाऊस पडला. तर मंगळवारी ११८.३ मिमी पाऊस पडला. मुंबईत आजही पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात कुलाबा येथे १२२, तर सांताक्रूझ येथे ११८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे माटुंगा, किंग सर्कल, दादर, हिंदमाता, सायन, प्रतीक्षा नगर, दादर, अंधेरी, वांद्रे, कुर्ला, गोरेगाव, कांदिवली, घाटकोपर आदी सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. याठिकाणची वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली.

गरज असेल तरच घराबाहेर पडा


मुंबईत मुसळधार पाऊस राहील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. यामुळे पालिकेने खबरदारी म्हणून मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. याचबरोबर लोकांनी समुद्र किनाऱ्यांपासून लांब राहावे, असे आवाहनही केले आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचेही आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

तेराशे लोकांना सुरक्षित स्थळी हलवले


२६ जुलै २००५ ला मिठी नदीने मुंबईत हाहाकार उडवला होता. मुंबईत पाऊस पडू लागल्यावर आजही सर्वात जास्त भीती असते त्या मिठी नदीचीच. गेले दोन दिवस पाऊस पडत आहे. आज सकाळीही पावसाचा जोर कायम राहिला आहे. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे एनडीआरएफच्या मदतीने कुर्ल्यातील क्रांतीनगर परिसरातून १३०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

Intro:मुंबई - गेले महिनाभर गायब असलेल्या पावसाने मुंबईमध्ये पुन्हा हजेरी लावली आहे. आज तिसऱ्या दिवशीही मुंबईला पावसाने झोडपले. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत 249.7 मिमीची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईची तुंबई झाल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. Body:सोमवारी गणपती आगमनासह मुसळधार पावसाने पुन्हा श्री गणेशा केला. मुंबईत सोमवारी दिवसभरात 131.4 मिमी पाऊस पडला तर मंगळवारी 118.3 मिमी पाऊस पडला. मुंबईत आजही पावसा हा जोर कायम आहे. आज सकाळी 8.30 पर्यंत गेल्या 24 तासात कुलाबा येथे 122, तर सांताक्रूझ येथे 118 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे माटुंगा किंग सर्कल, दादर हिंदमाता, सायन प्रतीक्षा नगर, दादर, अंधेरी, वांद्रे, कुर्ला, गोरेगाव, कांदिवली, घाटकोपर आदी सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. याठिकाणची वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली.

गरज असेल तरच घराबाहेर पडा -
आजही सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस राहील,असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. यामुळे पालिकेने खबरदारी म्हणून मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. याचबरोबर लोकांनी समुद्र किनाऱ्यांपासून लांब राहावे अस आवाहन ही केले आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

1300 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले -
26 जुलै 2005 ला याच मिठी नदीने मुंबईत हाहाकार उडवला होता. मुंबईत पाऊस पडायला लागल्यावर आजही सर्वात जास्त भीती असते त्या मिठी नदीची. गेले दोन दिवस पाऊस पडत आहे. आज सकाळीही पावसाचा जोर कायम राहिला आहे. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, यामुळे एनडीआरएफच्या मदतीने कुर्ला करांतीनगर परिसरातून 1300 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

बातमीसाठी पाणी भरल्याचे visConclusion:
Last Updated : Sep 4, 2019, 2:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.