ETV Bharat / state

राज्यात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार, फडणवीसांनी आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला विश्वास

author img

By

Published : Nov 14, 2019, 11:50 PM IST

राज्यात ३ पक्षांचे सरकार चालूच शकत नाही. त्यामुळे राज्यात  भाजप वगळता कोणतेही सरकार स्थापन होऊ शकत नाही, असं वक्तव्य भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती आहे.

फडणवीस

मुंबई - राज्यात ३ पक्षांचे सरकार चालूच शकत नाही. त्यामुळे राज्यात भाजप वगळता कोणतेही सरकार स्थापन होऊ शकत नाही, असं वक्तव्य भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजपच्या आणि भाजप समर्थक आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांनी संबोधीत केले.


राज्यात 3 पक्षांचे सरकार बनणार नाही. जर बनलेच तर ते 6 महिनेदेखील टिकणार नाही. त्यामुळे आपलेच सरकार येणार असा विश्वास आमदारांना संबोधीत करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


जेव्हा सत्ता स्थापन होईल तेव्हा तुम्हाल मुंबईत बोलावण्यात येईल. मात्र, आता आपल्या मतदारसंघातील लोकांमध्ये जाऊन काम करा आणि शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना दिलासा द्या, असा सल्ला फडणवीस यांनी आमदारांना दिला. याचबरोबर बैठकीत प्रेझेंटेशनद्वारे विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले.

मुंबई - राज्यात ३ पक्षांचे सरकार चालूच शकत नाही. त्यामुळे राज्यात भाजप वगळता कोणतेही सरकार स्थापन होऊ शकत नाही, असं वक्तव्य भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजपच्या आणि भाजप समर्थक आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांनी संबोधीत केले.


राज्यात 3 पक्षांचे सरकार बनणार नाही. जर बनलेच तर ते 6 महिनेदेखील टिकणार नाही. त्यामुळे आपलेच सरकार येणार असा विश्वास आमदारांना संबोधीत करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


जेव्हा सत्ता स्थापन होईल तेव्हा तुम्हाल मुंबईत बोलावण्यात येईल. मात्र, आता आपल्या मतदारसंघातील लोकांमध्ये जाऊन काम करा आणि शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना दिलासा द्या, असा सल्ला फडणवीस यांनी आमदारांना दिला. याचबरोबर बैठकीत प्रेझेंटेशनद्वारे विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले.

Intro:
३ पक्षांचे सरकार चालूच शकत नाही. त्यामुळे आपलेच सरकार येईल. हे सरकार तयार होणार नाही आणि झाले तरी ६ महिने टिकणार नाही. त्यामुळे आपलेच सरकार येणार: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा आमदारांच्या बैठकीत मोठे विधान देखील करण्यात आले अशी माहिती बैठकीतील आमदारांनी दिली

Body:

- राज्यात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येणार, देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला विश्वास
- राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही, बैठकीत व्यक्त करण्यात आला आत्मविश्वास
- सत्ता स्थापनेवेळी मुंबईत बोलावू पण आता लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा नेत्यांना सल्ला
- आजच्या बैठकीत आमदारांचं मनोधैर्य वाढवण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न
- प्रेझेंटेशनद्वारे विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचे करण्यात आलं विश्लेषणConclusion:या बातमी साठी व्हिज्युअल कॅमेरा मॅन सरांनी लाईव्ह फीड07वरून पाठवले आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.