ETV Bharat / state

आषाढी वारीसाठी दिंडीत गेलेल्या हिंगोलीच्या वारकऱ्याचा साताऱ्यात मृत्यू

author img

By

Published : Jul 6, 2019, 9:45 AM IST

पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. नारायण जाधव असे मृत वारकऱ्याचे नाव आहे. ते सेनगाव तालुक्यातील कडती येथील रहिवासी आहे.

मृत नारायण जाधव

हिंगोली- आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीतील एका वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. नारायण जाधव असे मृत वारकऱ्याचे नाव आहे. ते सेनगाव तालुक्यातील कडती येथील रहिवासी आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ते पायी दिंडीसोबत देवदर्शनाला निघाले होते. मात्र, यावेळेस त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि उपचारादरम्या त्यांचा मृत्यू झाला.


नारायण जाधव हे पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या दिंडीमध्ये एका आठवड्यापूर्वीच दाखल झाले होते. जाधव हे तब्बल पंधरा वर्षापासून या दिंडीमध्ये सहभागी होत होते. दिंडी सातारा जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर जाधव यांना अचानक चक्कर आली आणि काही समजण्याच्या आतच ते जमिनीवर कोसळले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब नजीकच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच जाधव यांची प्राणज्योत मालवली.


जाधव हे अल्पभूधारक असून ते देवाचा धावा करत दरवर्षी न चुकता आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीमध्ये सहभागी व्हायचे. यावर्षीही जाधव यांच्या कुटुंबीयांनी त्यांना पायी दिंडीसोबत रवाना होताना मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला होता. मात्र, अचानक ही भयंकर घटना घडल्याने कडती या गावा बरोबरच संपूर्ण जिल्ह्यावरच शोककळा पसरली आहे.

हिंगोली- आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीतील एका वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. नारायण जाधव असे मृत वारकऱ्याचे नाव आहे. ते सेनगाव तालुक्यातील कडती येथील रहिवासी आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ते पायी दिंडीसोबत देवदर्शनाला निघाले होते. मात्र, यावेळेस त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि उपचारादरम्या त्यांचा मृत्यू झाला.


नारायण जाधव हे पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या दिंडीमध्ये एका आठवड्यापूर्वीच दाखल झाले होते. जाधव हे तब्बल पंधरा वर्षापासून या दिंडीमध्ये सहभागी होत होते. दिंडी सातारा जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर जाधव यांना अचानक चक्कर आली आणि काही समजण्याच्या आतच ते जमिनीवर कोसळले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब नजीकच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच जाधव यांची प्राणज्योत मालवली.


जाधव हे अल्पभूधारक असून ते देवाचा धावा करत दरवर्षी न चुकता आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीमध्ये सहभागी व्हायचे. यावर्षीही जाधव यांच्या कुटुंबीयांनी त्यांना पायी दिंडीसोबत रवाना होताना मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला होता. मात्र, अचानक ही भयंकर घटना घडल्याने कडती या गावा बरोबरच संपूर्ण जिल्ह्यावरच शोककळा पसरली आहे.

Intro:सेनगाव तालुक्यातील कडती येथील वारकरी पंढरपूर कडे जाणाऱ्या पायी दिंडी सोबत याही वर्षी रवाना झाले होते. दिंडी सातारा जिल्ह्यात पोहोचली होती. दरम्यान, वारकरी जाधव यांना अचानक चक्कर आली अन ते जाग्यावरच कोसळले, त्यांना दिंडीतील सहकाऱ्यांनी तात्काळ फलटण येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान जाधव यांच्या मृत्यू झाला. या घटनेने हिंगोली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.


Body:नारायण जाधव हे पंढरपूर कडे रवाना होणाऱ्या दिंडी मध्ये एका आठवड्यापूर्वीच दाखल झाले होते जाधव हे तब्बल पंधरा वर्षापासून या दिंडीमध्ये सहभागी होतात दिंडी सातारा जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर जाधव यांना अचानक चक्कर आली आणि काही समजण्याच्या आतच ते जमिनीवर जोराने कोसळले. त्यांना सहकाऱ्यांनी ताबडतोब नजीकच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र उपचार सुरू असतानाच जाधव यांची प्राणज्योत मालवली. जाधव हे अल्पभूधारक असून ते देवाचा धावा करत दरवर्षी न चुकता पायी दिंडी मध्ये सहभागी होत असत. याही वर्षी जाधव यांच्या कुटुंबीयांनी जाधव यांना पायी दिंडी सोबत रवाना होताना मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला होता. मात्र अचानक ही भयंकर घटना घडल्याने कडती या गावा बरोबरच संपूर्ण जिल्ह्यावरच शोककळा पसरली आहे. विशेष बाब म्हणजे अद्याप जाधव यांच्या मृत्यूची माहिती ग्रामस्थांनी त्यांच्या कुटुंबियांना समजू दिली नाही.


Conclusion:वारकरी जाधव यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी आणण्यात येत असल्याची माहिती कडती येथील काही ग्रामस्थांनी दिली. सदरील शेतकऱ्यावर बडोदा बँकेचे पाच लाख रुपये कर्ज आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.