ETV Bharat / state

हिंगोलीत 'सुरक्षा किट'चे वाटपच असुरक्षित; कामगारांना फटका

कामगारांची नोंदणी करून त्यांना सुरक्षा किटचे वितरण केले जात आहे. नोंदणीमध्ये जवळपास 25 हजारापेक्षा जास्त कामगारांची नोंदणी झाली आहे.

author img

By

Published : Aug 25, 2019, 8:28 AM IST

हिंगोलीत 'सुरक्षा किट'चे वाटपच असुरक्षित

हिंगोली - कामगारांची नोंदणी करून त्यांना सुरक्षा किटचे वितरण केले जात आहे. नोंदणीमध्ये जवळपास 25 हजारापेक्षा जास्त कामगारांची नोंदणी झाली आहे. या नोंदणी झालेल्या कामगारांना 3 महिन्यांपासून सुरक्षा किटचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, यामध्ये कामगार नसणाऱ्या लोकांना किटचे वाटप होत आहे. तसेच किट देण्यासाठी कामगारांकडून पैशांचीही मागणी होत आहे. त्यामुळे खरे कामगार सुरक्षा किटपासून वंचित आहेत.

हिंगोलीत 'सुरक्षा किट'चे वाटपच असुरक्षित

हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आणि न्यायालयाच्या इमारत बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षा किट मिळल्याची चौकशी केली असता, खऱ्या कामगारांना सुरक्षा किट मिळाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लिंबाळा मक्ता भागात एका खासगी जागेत किट वाटपाचे काम सुरू आहे. येथे कामगार नसलेले लोकच खोटे दाखले देऊन किट मिळवत आहेत. तर कामगारांकडे पैश्यांची मागणी केल्यामुळे कामगारांनी किट घेणे अवघड झाले आहे.

त्यामुळे जे कधी मजूर नव्हते ते या सुरक्षा किटमुळे स्वतःला मजूर म्हणवून घेत आहेत. तर खरे मजूर, कामगार सुरक्षा किट विनाच काम करत आहेत. आतापर्यंत 25 हजारच्यावर मजुरांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले आहे. आणखी किट वाटपाचे काम सुरू आहे. मात्र, यामध्ये लवकरच प्रशासनाने लक्ष घातले तर खऱ्या कामगारांना किट मिळेल. त्यामुळे प्रशासनाने या सर्व प्रकारावर लक्ष देऊन खऱ्या कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

हिंगोली - कामगारांची नोंदणी करून त्यांना सुरक्षा किटचे वितरण केले जात आहे. नोंदणीमध्ये जवळपास 25 हजारापेक्षा जास्त कामगारांची नोंदणी झाली आहे. या नोंदणी झालेल्या कामगारांना 3 महिन्यांपासून सुरक्षा किटचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, यामध्ये कामगार नसणाऱ्या लोकांना किटचे वाटप होत आहे. तसेच किट देण्यासाठी कामगारांकडून पैशांचीही मागणी होत आहे. त्यामुळे खरे कामगार सुरक्षा किटपासून वंचित आहेत.

हिंगोलीत 'सुरक्षा किट'चे वाटपच असुरक्षित

हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आणि न्यायालयाच्या इमारत बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षा किट मिळल्याची चौकशी केली असता, खऱ्या कामगारांना सुरक्षा किट मिळाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लिंबाळा मक्ता भागात एका खासगी जागेत किट वाटपाचे काम सुरू आहे. येथे कामगार नसलेले लोकच खोटे दाखले देऊन किट मिळवत आहेत. तर कामगारांकडे पैश्यांची मागणी केल्यामुळे कामगारांनी किट घेणे अवघड झाले आहे.

त्यामुळे जे कधी मजूर नव्हते ते या सुरक्षा किटमुळे स्वतःला मजूर म्हणवून घेत आहेत. तर खरे मजूर, कामगार सुरक्षा किट विनाच काम करत आहेत. आतापर्यंत 25 हजारच्यावर मजुरांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले आहे. आणखी किट वाटपाचे काम सुरू आहे. मात्र, यामध्ये लवकरच प्रशासनाने लक्ष घातले तर खऱ्या कामगारांना किट मिळेल. त्यामुळे प्रशासनाने या सर्व प्रकारावर लक्ष देऊन खऱ्या कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

Intro:सुरक्षे विना दिवस-रात्र कामावर राब राब राबणाऱ्या कामगारांची कामगार कार्यालयाच्यावतीने अभियान राबवून नोंदणी केलेली आहे. अभियान सुरू असताना जवळपास 16 हजाराच्या वर कामगार कार्यालयाकडे नोंदणी झाली होती. नोंदणी झालेल्या कामगारांना तीन महिन्यांपासून सुरक्षा किट वाटप सुरू आहे. यामध्ये मात्र कंत्राट दराने ठेवलेल्या व्यक्तींची चांदीच सुरू आहे. जे जुगाड लावून सुरक्षा किट घेताहेत. त्यांच्याकडूनही अन जे खरे कामगार आहेत त्यांच्याकडुनबी शे पाचशे रुपये घेण्याचा सपाटाच लावलाय. यात बी खरे कामगार अजूनही सुरक्षा किट पासून दुरावलेलेच आहेत. त्याना तारीख पे तारीख देणे सुरू आहे. तर ज्यांना सुरक्षा किट दिलीय ते वापरण्याकडे ही दुर्लक्ष करीत असल्याचे ही समोर आलेय.


Body:हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अन न्यालायच्या इमारत बांधकामावर दिवस रात्र काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षा किट मिळल्याची चोकशी केली असता खऱ्या कामगारांनाच सुरक्षा किट न मिळाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. दिवस रात्र कामगार साहित्य घेण्यासाठी लिंबाळा मक्ता भागात एका खाजगी जागेत वाटप सुरू आसलेल्या पेट्यासाठी कधी कागद पत्र दाखल करण्यासाठी तर कधी पेट्या घेण्यासाठी ग्रामीण - शहरी भागातून येणारे कामगार रांगा लावत असल्याचे पहावयास मिळत आहे. कधी मजूर म्हणून कामच न केलेले बहुतांश कामगार कशी बशी ग्रामसेवक कडून कागदपत्रावर स्वाक्षरी करून कागदाची जुळवाजुळ करत कामगार कार्यालयाकडे तर कधी कागद पत्र दाखल करण्याच्या तर केव्हा पेट्या वाटपाच्या ठिकाणी एकच गर्दी करीत आहेत. आपलाला कशी लवकर पेटी मिळविता येईल यासाठी मात्र आपली ऐपत नसताना देखील बरेच कामगार पैसे मोजत आहेत. अन वाटप करण्यासाठी असलेले गुत्तेदारांचे चेले चपाटे त्यांचा बिनदिक्कत पणे स्वीकार ही करीत आहेत. अशा सर्व भानगडीत मात्र खरे कामगार आपल्याला दिलेल्या तारीख ची आठवण करत करत सुरक्षेविनाच काम करत आहेत. पेट्या वाटपाचा बेताल कार्यक्रम मस्त शहरापासून अंतरावर सुरू असला तरी या ठिकाणी स्वतंत्र कामगारांकडून पैसे गोळा करण्यासाठी काही खाजगी व्यक्ती देखील ठेवले आहेत. हे मोठ्या उशारीने कामगारांकडून चंदा गोळा करीत असल्याचे ही समोर आले आहे. मात्र रांगेत ताटकळत थांबलेले त्यांच्या या चंदा बद्दल ब्र देखील काढण्यास तयार नाहीत. बोललो तर पुढील तारीख मिळेल ही भीती कामगारांमध्ये असल्याचे पेट्या वाटप करणारांचे चांगभले सुरू आहे. कामगारांसोबत कधी तरी सौजन्याने वागणूक केली जात असेल अरेरावीची तर नेहमीच असते. मात्र हा सर्व अतिरेक कामगार निमूटपणे सहन करीत आहेत.



Conclusion:या बेतालाकडे लक्ष देण्यासाठी कोणी वालीच नसल्याने की काय? यांना रान मोकळे मिळत आहे. ज्यांनी कधीच मजूर म्हणून घेतले नव्हते ते मात्र या सुरक्षा किट मुळे आपल्याला मजूर म्हणवून घेत आहेत. आता पर्यंत 25 हजारच्या वर मजुरांना सुरक्षा किट वाटप केल्या आहेत तर अजूनही सुरूच आहेत. वरिष्ठांनी लक्ष दिलं तर पेटी वाटपासाठी सुरू असलेला चंदा कमी होईल अन खऱ्या लाभार्थ्यांना तारीख पे तारीख न देता वेळेत लाभ मिळण्यास मदत होईल. तर काही कामगारांना वयाचे देखील कारण पुढे करीत सुरक्षा किट पासून दूर ठेवले जात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.