ETV Bharat / state

जिल्ह्यात 'शिवभोजन' योजनेची सुरुवात, चव न चाखताच परतले पालकमंत्री

author img

By

Published : Jan 27, 2020, 10:04 AM IST

Updated : Jan 27, 2020, 12:17 PM IST

जिल्ह्यात शिवभोजन योजनेची ३ केंद्र उघडण्यात आली आहेत. या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान खासदार बाळू धानोरकर, स्थानिक आमदार किशोर जोरागेवार हे देखील उपस्थित होते. मात्र, यापैकी एकानेही शिवथाळीचा आस्वाद घेतला नाही.

Shivbhojan scheme
चंद्रपुरात शिवभोजन योजना सुरू

चंद्रपूर - राज्य शासनाच्या शिवभोजन योजनेचे रविवारी बसस्थानकातील केंद्रात जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जेवणाची चव न चाखताच वडेट्टीवार परतले. या योजनेच्या माध्यमातून गरिबांना केवळ दहा रुपयांत थाळी मिळणार आहे.

हेही वाचा - तुमचा 'हा' प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल - शरद पवार

जिल्ह्यात शिवभोजन योजनेची ३ केंद्र उघडण्यात आली आहेत. या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान खासदार बाळू धानोरकर, स्थानिक आमदार किशोर जोरगेवार हे देखील उपस्थित होते. मात्र, यापैकी एकानेही शिवथाळीचा आस्वाद घेतला नाही. जवळपास अर्धा तास हे सर्व लोकप्रतिनिधी येथे होते. त्यांनी शिवभोजन केंद्राचा आढावाही घेतला. मात्र, जे जेवण सर्वसामान्य नागरिकांना दिले जाणार आहे, त्याचा दर्जा नेमका कसा आहे, हे जेवण खाण्यायोग्य आहे की नाही? याची चाचपणी एकाही लोकप्रतिनिधीने केली नाही.

हेही वाचा - लंगोट न नेसलेल्याला तुम्ही गदा दिली - अजित पवार

२५ जानेवारीला जिल्हा क्रीडा संकुलातील 'रनिंग ट्रॅक' च्या भूमिपूजनावेळी पाहुण्यांसाठी विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार, खासदार धानोरकर आणि आमदार जोरगेवार एकाच टेबलावर बसून जेवले होते. मात्र, आज सर्वसामान्यांसाठी असलेल्या शिवभोजन योजनेतील जेवणाची साधी चवही या लोकप्रतिनिधींनी घेतली नाही.

चंद्रपूर - राज्य शासनाच्या शिवभोजन योजनेचे रविवारी बसस्थानकातील केंद्रात जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जेवणाची चव न चाखताच वडेट्टीवार परतले. या योजनेच्या माध्यमातून गरिबांना केवळ दहा रुपयांत थाळी मिळणार आहे.

हेही वाचा - तुमचा 'हा' प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल - शरद पवार

जिल्ह्यात शिवभोजन योजनेची ३ केंद्र उघडण्यात आली आहेत. या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान खासदार बाळू धानोरकर, स्थानिक आमदार किशोर जोरगेवार हे देखील उपस्थित होते. मात्र, यापैकी एकानेही शिवथाळीचा आस्वाद घेतला नाही. जवळपास अर्धा तास हे सर्व लोकप्रतिनिधी येथे होते. त्यांनी शिवभोजन केंद्राचा आढावाही घेतला. मात्र, जे जेवण सर्वसामान्य नागरिकांना दिले जाणार आहे, त्याचा दर्जा नेमका कसा आहे, हे जेवण खाण्यायोग्य आहे की नाही? याची चाचपणी एकाही लोकप्रतिनिधीने केली नाही.

हेही वाचा - लंगोट न नेसलेल्याला तुम्ही गदा दिली - अजित पवार

२५ जानेवारीला जिल्हा क्रीडा संकुलातील 'रनिंग ट्रॅक' च्या भूमिपूजनावेळी पाहुण्यांसाठी विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार, खासदार धानोरकर आणि आमदार जोरगेवार एकाच टेबलावर बसून जेवले होते. मात्र, आज सर्वसामान्यांसाठी असलेल्या शिवभोजन योजनेतील जेवणाची साधी चवही या लोकप्रतिनिधींनी घेतली नाही.

Intro:
चंद्रपुर : राज्य शासनाच्या शिवभोजन योजनेचे उद्घाटन आज राज्यभरात झाले. या माध्यमातून गरिबांना केवळ दहा रुपयांत थाळी मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मात्र, जेवणाची चव न चाखताच ते परतले.

जिल्ह्यात शिवभोजनाची तीन केंद्र उघडण्यात आली असून आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी बसस्थानकातिल केंद्राचे उदघाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार बाळू धानोरकर, स्थानिक आमदार किशोर जोरागेवार हे देखील होते. मात्र, यापैकी एकानेही शिवथाळीची चव घेतली नाही. जवळपास अर्धा तास हे सर्व लोकप्रतिनिधी येथे होते. त्यांनी शिवभोजन केंद्राचा आढावाही घेतला. मात्र, जे जेवण सर्वसामान्य लोकांना दिले जाणार आहे त्याचा दर्जा नेमका कसा आहे, हे जेवण खाण्यायोग्य आहे की नाही त्याची चव घेऊन चाचपणी करण्याचे धाडस एकाही लोकप्रतिनिधींनी केले नाही. या उलट 25 जानेवारीला जिल्हा क्रीडा संकुलाच्या धावपट्टीच्या भूमिपूजनाच्या वेळी पाहुण्यांसाठी विशेष भोजनाची व्यवस्था होती. यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार, खासदार धानोरकर आणि आमदार जोरगेवार एकाच टेबलवर बसून जेवले. त्यांनी पनीर मसाला, फ्रुट पंच, काजूकतली, मठ्ठा, पोळी, भात याचा आस्वाद घेतला. तर इकडे महाआघाडीच्या अत्यंत महत्त्वाच्या योजनेचा आज शुभारंभ होता. यात सामान्य लोकांना दहा रुपयांत जेवण उपलब्ध होणार आहे. असे असले तरी यात तुम्ही अत्यंत गरीब असले पाहिजे असा कुठेही उल्लेख नाही, तसा पुरावा सुध्दा देण्याची गरज नाही. मात्र, तरीही अशी रेषा लोकप्रतिनिधींनी आपल्या कृतीतून आपोआप खेचून दिली. म्हणूनच ज्या थाळीने हजारो-लाखोजणांच्या पोटाला आधार मिळणार आहे. ज्यांच्या भरवशावर लोकप्रतिनिधी निवडून येतात त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या भोजनाची साधी चव सुद्धा घ्यावीशी वाटू नये हे दुर्दैवी आहे.
Body:.Conclusion:
Last Updated : Jan 27, 2020, 12:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.