ETV Bharat / state

गोष्ट एका लग्नाची! लग्न पंगतीत बसले... घरी आले... अन् क्वांरटाईन झाले!

author img

By

Published : May 25, 2020, 8:57 PM IST

सरकारने चौथ्या लाॅकडाऊनमध्ये लग्न सोहळ्यांना काही अटींवर परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयावर लग्नाळू लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण, एकाला कोरोनाच्या संकटात लग्न करणे चांगलेच महागात पडले आहे. कारण, त्या लग्नात कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील एका व्यक्तीने पंगत वाढली. यामुळे वधुवरासह त्या लग्नाला उपस्थित राहिलेल्या नातेवाईकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

All People who attended a wedding in chandrapur were quarantined as one of the attendees found positive for COVID-19
गोष्ट एका लग्नाची..! लग्न पंगतीत बसले...घरी आले... अन् क्वांरटाईन झाले

चंद्रपूर - सरकारने चौथ्या लाॅकडाऊनमध्ये लग्न सोहळ्यांना काही अटींवर परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयावर लग्नाळू लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण, एकाला कोरोनाच्या संकटात लग्न करणे चांगलेच महागात पडले आहे. कारण, त्या लग्नात कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील एका व्यक्तीने पंगत वाढली. यामुळे वधुवरासह त्या लग्नाला उपस्थित राहिलेल्या नातेवाईकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून नवदाम्पत्यांसह लग्नातील उपस्थित सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

घडलं असे की, गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी गावाच्या एका तरूणाचा विवाह बल्लारपूरच्या विसापूर येथील तरूणीसोबत ठरला होता. पण, कोरोनाचे संकट आले आणि हा विवाह पुढे ढकलावा लागला. चौथ्या लॉकडाऊनमध्ये सरकारने मोजक्या लोकांसह लग्नाला परवानगी दिली. ही संधी साधत वधुवरच्या कुटुंबियांनी १९ मे रोजी विवाह करण्याचे ठरविले. लग्नाची रितसर परवानगी घेण्यात आली. यानंतर आपल्या जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत नवरदेव विसापूर येथे गेला. सामाजिक रितीरिवाजानुसार त्यांचं लग्न शांततेत पार पडलं. लग्नानंतर व-हाडयांना जेवण देण्यात आलं.

हेही वाचा - रोज शंभर शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करा; चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा ठराव

कोरोनाच्या काळात लग्न संपन्न झाल्याच्या आनंदात, 'दुल्हन हम ले जायेगे' म्हणत वधूला घेत नवरदेव आणि व-हाडी चेकपिपरीला परतले. यानंतर दोनच दिवसात चंद्रपूरात ९ कोरोना बाधीत रुग्ण आढळले. यात विसापूरच्या एकाचा समावेश होता. प्रशासनाकडून त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू झाला. तेव्हा विसापूरच्या कोरोना बाधीताच्या संपर्कातील व्यक्ती १९ मे रोजी झालेल्या लग्नात पंगत वाढल्याचे समोर आले.

चेकपिपरीत ही माहिती समजताच लग्नाला हजर असलेल्या लोकांचे धाबे दणाणले. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत लग्नात गेलेल्या वऱ्हाडींना होम क्वांरटाईन केले. तसेच चेकपिपरीतही नवदाम्पत्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. तसेच पंगत वाढणाऱ्या व्यक्तीलाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.

विसापूर येथील लग्नात कोरोनाबाधीतांच्या संपर्कात असलेला व्यक्ती उपस्थित होता. याची माहिती कळताच या लग्नात गेलेल्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. नवदाम्पत्यांनादेखील क्वारंटाईन केलेले आहे, अशी माहिती गोंडपिपरीच्या तहसीलदार सीमा गजभिये यांनी दिली आहे.

धाबा चेकपिपरीकडे लक्ष -

दोन दिवसापुर्वी गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेला व्यक्ती सापडला होता. यामुळे आता धाबा व विसापूर येथील कोरोना बाधीतांच्या संपर्कात आलेल्यांचा रिपोर्ट काय येतो, याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष आहे.

हेही वाचा - चिमूर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह; दारू तस्करांशी संगनमत केल्याचा आरोप

चंद्रपूर - सरकारने चौथ्या लाॅकडाऊनमध्ये लग्न सोहळ्यांना काही अटींवर परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयावर लग्नाळू लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण, एकाला कोरोनाच्या संकटात लग्न करणे चांगलेच महागात पडले आहे. कारण, त्या लग्नात कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील एका व्यक्तीने पंगत वाढली. यामुळे वधुवरासह त्या लग्नाला उपस्थित राहिलेल्या नातेवाईकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून नवदाम्पत्यांसह लग्नातील उपस्थित सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

घडलं असे की, गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी गावाच्या एका तरूणाचा विवाह बल्लारपूरच्या विसापूर येथील तरूणीसोबत ठरला होता. पण, कोरोनाचे संकट आले आणि हा विवाह पुढे ढकलावा लागला. चौथ्या लॉकडाऊनमध्ये सरकारने मोजक्या लोकांसह लग्नाला परवानगी दिली. ही संधी साधत वधुवरच्या कुटुंबियांनी १९ मे रोजी विवाह करण्याचे ठरविले. लग्नाची रितसर परवानगी घेण्यात आली. यानंतर आपल्या जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत नवरदेव विसापूर येथे गेला. सामाजिक रितीरिवाजानुसार त्यांचं लग्न शांततेत पार पडलं. लग्नानंतर व-हाडयांना जेवण देण्यात आलं.

हेही वाचा - रोज शंभर शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करा; चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा ठराव

कोरोनाच्या काळात लग्न संपन्न झाल्याच्या आनंदात, 'दुल्हन हम ले जायेगे' म्हणत वधूला घेत नवरदेव आणि व-हाडी चेकपिपरीला परतले. यानंतर दोनच दिवसात चंद्रपूरात ९ कोरोना बाधीत रुग्ण आढळले. यात विसापूरच्या एकाचा समावेश होता. प्रशासनाकडून त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू झाला. तेव्हा विसापूरच्या कोरोना बाधीताच्या संपर्कातील व्यक्ती १९ मे रोजी झालेल्या लग्नात पंगत वाढल्याचे समोर आले.

चेकपिपरीत ही माहिती समजताच लग्नाला हजर असलेल्या लोकांचे धाबे दणाणले. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत लग्नात गेलेल्या वऱ्हाडींना होम क्वांरटाईन केले. तसेच चेकपिपरीतही नवदाम्पत्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. तसेच पंगत वाढणाऱ्या व्यक्तीलाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.

विसापूर येथील लग्नात कोरोनाबाधीतांच्या संपर्कात असलेला व्यक्ती उपस्थित होता. याची माहिती कळताच या लग्नात गेलेल्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. नवदाम्पत्यांनादेखील क्वारंटाईन केलेले आहे, अशी माहिती गोंडपिपरीच्या तहसीलदार सीमा गजभिये यांनी दिली आहे.

धाबा चेकपिपरीकडे लक्ष -

दोन दिवसापुर्वी गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेला व्यक्ती सापडला होता. यामुळे आता धाबा व विसापूर येथील कोरोना बाधीतांच्या संपर्कात आलेल्यांचा रिपोर्ट काय येतो, याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष आहे.

हेही वाचा - चिमूर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह; दारू तस्करांशी संगनमत केल्याचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.