ETV Bharat / state

जिल्ह्यातील सर्व जागा महायुतीच जिंकेल; पंकजा मुंडेंना विश्वास

author img

By

Published : Oct 2, 2019, 4:39 PM IST

मागील 15  वर्षे राष्ट्रवादीने सत्ता असूनही जिल्ह्यासाठी काहीच केले नाही. विकासाची कोणतीही योजना आणली नाही, इथली जनता पारतंत्र्यात असल्यासारखी होती. परंतु, मी गेल्या 5 वर्षात परळी मतदारसंघ व जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून जिल्ह्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून दिले, असे मुंडे यांनी सांगितले.

पंकजा मुंडे

बीड - मागील 15 वर्षे राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता असताना बीड जिल्ह्याने पारतंत्र्य भोगले. पण, गेल्या 5 वर्षात सत्तेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून जी विकासाची कामे मी केली. त्यातून हा जिल्हा विकासाच्या बाबतीत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याला परत पारतंत्र्यात टाकू नका. जातीपातीच्या पलिकडे जाऊन काम करणारे स्वाभिमानी नेतृत्व जपा, असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री व भाजप महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले. त्यांनी जिल्ह्यातील सर्व जागांवर पुन्हा भाजप महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा - मतदारांना उल्लू बनवू नका - विजयसिंह पंडित

परळी मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील बुथ प्रमुख व विविध समित्यांच्या प्रमुखांचा मेळावा आज शहरातील साधना मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला, यावेळी मुंडे बोलत होत्या.

पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, परळी विधानसभेची निवडणूक मतदारसंघाच्या अस्तित्वाची व भवितव्य ठरविणारी आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस आपल्यासाठी महत्वाचे आहेत. कार्यकर्त्यांनी सजग राहून काम करावे. बुथ यंत्रणेतील कार्यकर्त्यांनी आपापली जबाबदारी नियोजनबध्द रितीने पार पाडावी, असे मुंडे यांनी सांगितले.

हेही वाचा - अप्रत्यक्ष भाजपला मदत करणारे प्रत्यक्ष मदतीसाठी भाजपात गेले -धनंजय मुंडे

मागील 15 वर्षे राष्ट्रवादीने सत्ता असूनही जिल्ह्यासाठी काहीच केले नाही. विकासाची कोणतीही योजना आणली नाही, येथील जनता पारतंत्र्यात असल्यासारखी होती. परंतु, मी गेल्या 5 वर्षात परळी मतदारसंघ व जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून जिल्ह्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून दिले. माझ्या चांगल्या कामामुळे राष्ट्रवादीची बोगसगिरी देखील बंद झाली. चांगले नेतृत्व टिकले तरच त्या भागाचे भविष्य उज्वल असते, त्यामुळे चांगले काम करणाऱ्या नेतृत्वाला जपा, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राह, असे आवाहन मुंडे यांनी केले.

राष्ट्रवादीचे राजाभाऊ औताडे भाजपत-

राष्ट्रवादी काँग्रेसचे सेलू अंबा येथील राजाभाऊ औताडे, घाटनांदूरचे पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र वालेकर, सायगावचे ग्रामपंचायत सदस्य रफीक कुरेशी तसेच वाघाळा, पिंपळा धायगुडा येथील ग्रामपंचायत सदस्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या सर्वांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी बोलतांना औताडे यांनी पंकजा मुंडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा - 'आईचा शब्द न पाळणारे मतदारांशी काय प्रामाणिक राहणार?'

यावेळी महिला आयोगाच्या सदस्या गयाताई कराड, भाजपचे तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख, प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी, अच्यूत गंगणे, शामराव आपेट, सुनील लोमटे, जीवनराव किर्दंत, गणेश कराड, कमलाकर कोपले, दिलीप काळे, अविनाश मोरे, संजय गिराम, विलास जगताप, नारायणराव केंद्रे, प्रदीप गंगणे, वैजनाथ आप्पा गारठे, बिभीषण गिते, अण्णासाहेब लोमटे आदी यावेळी उपस्थित होते.

बीड - मागील 15 वर्षे राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता असताना बीड जिल्ह्याने पारतंत्र्य भोगले. पण, गेल्या 5 वर्षात सत्तेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून जी विकासाची कामे मी केली. त्यातून हा जिल्हा विकासाच्या बाबतीत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याला परत पारतंत्र्यात टाकू नका. जातीपातीच्या पलिकडे जाऊन काम करणारे स्वाभिमानी नेतृत्व जपा, असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री व भाजप महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले. त्यांनी जिल्ह्यातील सर्व जागांवर पुन्हा भाजप महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा - मतदारांना उल्लू बनवू नका - विजयसिंह पंडित

परळी मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील बुथ प्रमुख व विविध समित्यांच्या प्रमुखांचा मेळावा आज शहरातील साधना मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला, यावेळी मुंडे बोलत होत्या.

पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, परळी विधानसभेची निवडणूक मतदारसंघाच्या अस्तित्वाची व भवितव्य ठरविणारी आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस आपल्यासाठी महत्वाचे आहेत. कार्यकर्त्यांनी सजग राहून काम करावे. बुथ यंत्रणेतील कार्यकर्त्यांनी आपापली जबाबदारी नियोजनबध्द रितीने पार पाडावी, असे मुंडे यांनी सांगितले.

हेही वाचा - अप्रत्यक्ष भाजपला मदत करणारे प्रत्यक्ष मदतीसाठी भाजपात गेले -धनंजय मुंडे

मागील 15 वर्षे राष्ट्रवादीने सत्ता असूनही जिल्ह्यासाठी काहीच केले नाही. विकासाची कोणतीही योजना आणली नाही, येथील जनता पारतंत्र्यात असल्यासारखी होती. परंतु, मी गेल्या 5 वर्षात परळी मतदारसंघ व जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून जिल्ह्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून दिले. माझ्या चांगल्या कामामुळे राष्ट्रवादीची बोगसगिरी देखील बंद झाली. चांगले नेतृत्व टिकले तरच त्या भागाचे भविष्य उज्वल असते, त्यामुळे चांगले काम करणाऱ्या नेतृत्वाला जपा, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राह, असे आवाहन मुंडे यांनी केले.

राष्ट्रवादीचे राजाभाऊ औताडे भाजपत-

राष्ट्रवादी काँग्रेसचे सेलू अंबा येथील राजाभाऊ औताडे, घाटनांदूरचे पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र वालेकर, सायगावचे ग्रामपंचायत सदस्य रफीक कुरेशी तसेच वाघाळा, पिंपळा धायगुडा येथील ग्रामपंचायत सदस्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या सर्वांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी बोलतांना औताडे यांनी पंकजा मुंडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा - 'आईचा शब्द न पाळणारे मतदारांशी काय प्रामाणिक राहणार?'

यावेळी महिला आयोगाच्या सदस्या गयाताई कराड, भाजपचे तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख, प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी, अच्यूत गंगणे, शामराव आपेट, सुनील लोमटे, जीवनराव किर्दंत, गणेश कराड, कमलाकर कोपले, दिलीप काळे, अविनाश मोरे, संजय गिराम, विलास जगताप, नारायणराव केंद्रे, प्रदीप गंगणे, वैजनाथ आप्पा गारठे, बिभीषण गिते, अण्णासाहेब लोमटे आदी यावेळी उपस्थित होते.

Intro:
जिल्हयातील सर्व जागा पुन्हा भाजपा महायुतीच जिंकेल; पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला विश्वास

बीड- मागील पंधरा वर्षे राष्ट्रवादी व काॅग्रेसची सत्ता असतांना बीड जिल्हयाने पारतंत्र्य भोगले पण गेल्या पांच वर्षात सत्तेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून मी जी विकासाची कामे मी केली, त्यातून हा जिल्हा विकासाच्या बाबतीत ख-या अर्थाने स्वतंत्र झाला त्यामुळे पुन्हा याला पारतंत्र्यात ढकलू नका, जातीपातीच्या पलिकडे जाऊन काम करणारे स्वाभिमानी नेतृत्व जपा असे आवाहन करत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री व भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी जिल्हयातील सर्व जागांवर पुन्हा भाजपा महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास आज येथे व्यक्त केला.

परळी मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील बुथ प्रमुख व विविध समित्यांच्या प्रमुखांचा मेळावा आज शहरातील साधना मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या.महिला आयोगाच्या सदस्या गयाताई कराड, भाजपचे तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख, प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी, अच्यूत गंगणे, शामराव आपेट, सुनील लोमटे, जीवनराव किर्दंत, गणेश कराड, कमलाकर कोपले, दिलीप काळे, अविनाश मोरे, संजय गिराम, विलास जगताप, नारायणराव केंद्रे, प्रदीप गंगणे, वैजनाथ आप्पा गारठे, बिभीषण गिते, अण्णासाहेब लोमटे आदी यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, परळी विधानसभेची निवडणूक मतदारसंघाच्या अस्तित्वाची व भवितव्य ठरविणारी आहे, त्यामुळे पुढचे काही दिवस आपल्यासाठी महत्वाची आहेत, कार्यकर्त्यांनी सजग राहून काम करावे. बुथ यंत्रणेतील कार्यकर्त्यांनी आपापली जबाबदारी नियोजनबध्द रितीने पार पाडावी.

मागील पंधरा वर्षे राष्ट्रवादीने सत्ता असूनही जिल्हयासाठी कांहीच केले नाही, विकासाची कोणतीही योजना आणली नाही, इथली जनता पारतंत्र्यात असल्यासारखी होती परंतु मी गेल्या पांच वर्षात परळी मतदारसंघ व जिल्हयात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून जिल्हयाला ख-या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून दिले. माझ्या चांगल्या कामामुळे राष्ट्रवादीची बोगसगिरी देखील बंद झाली. चांगले नेतृत्व टिकले तरच त्या भागाचे भविष्य उज्वल असते, त्यामुळे चांगले काम करणा-या नेतृत्वाला जपा, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहा असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रवादीचे राजाभाऊ औताडे असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात-
राष्ट्रवादी काँग्रेसचे सेलू अंबा येथील राजाभाऊ औताडे, घाटनांदूरचे प.स. सदस्य मच्छिंद्र वालेकर, सायगावचे ग्रा.प.सदस्य रफीक कुरेशी तसेच वाघाळा, पिंपळा धायगुडा येथील ग्रामपंचायत सदस्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी या सर्वांचे भाजपात स्वागत केले. यावेळी बोलतांना औताडे यांनी ना. पंकजाताई मुंडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचलन शिवाजी गिते यांनी केले तर विलास जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.