ETV Bharat / state

कथा कारवीच्या जंगलाची...

author img

By

Published : Sep 4, 2019, 6:46 PM IST

Updated : Sep 4, 2019, 8:10 PM IST

निसर्गाच्या अद्भूत देणगीनी नटलेलं असे कारवीचे जंगल. अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी असलेले हे जंगल घनदाट झाडी, ओसंडून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे, ओढे, नदी, आभाळाच्या दिशेने निघालेले उंच वृक्ष तर कुठे उन्मळून पडलेले शेकडो वृक्ष, असे हे कारवीचे जंगल...प्रचंड मोठ्या शिळा, त्यावर साचलेले हिरवेगर्द शेवाळाचे गालिचे, हिरवा रंग त्याला जणू जन्मजातच मिळालाय..पक्षांची किलबिल, भरदिवसा रातकिड्यांची किरकिर...आणि टपोरा पाऊस अशा देखण्या रूपाने सजलेले हे जंगल...

कारवीचे जंगल

पुणे - निसर्गाच्या अद्भूत देणगीनी नटलेलं असे कारवीचे जंगल. अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी असलेले हे जंगल... घनदाट झाडी, ओसंडून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे, ओढे, नदी, आभाळाच्या दिशेने निघालेले उंच वृक्ष तर कुठे उन्मळून पडलेले शेकडो वृक्ष, असे हे कारवीचे जंगल...प्रचंड मोठ्या शिळा, त्यावर साचलेले हिरवेगर्द शेवाळाचे गालिचे, हिरवा रंग त्याला जणू जन्मजातच मिळालाय..पक्षांची किलबिल, भरदिवसा रातकिड्यांची किरकिर...आणि टपोरा पाऊस अशा देखण्या रूपाने सजलेले हे जंगल...

pune
कारवीचे जंगल


हरिश्चंद्र गडाचा पायथा असलेल्या खिरेश्वर गावातून निघालेली पायवाट या जंगलात घेऊन जाते. या वाटेने काही अंतर प्रवास केल्यानंतर नजरेस पडतात काही वीरगळ. या वीरगळ पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण करून देतात. येथूनच काही अंतरावरच एक प्राचीन लेणी आहे. या लेणीपासून जवळच एक प्राचीन असे नागेश्वराचे शिवमंदिर आहे. नवव्या शतकात झंझ राजाने हे शिवमंदिर उभारल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.


या मंदिराची अवस्था मात्र दयनीय झाली आहे. मंदिरावराचे दगड निखळले आहेत. आतील गाभाऱ्यात एक शिवलिंग आहे. एका कमंडलूतुन यावर सतत पाणी पडत राहतं. गाभाऱ्याच्या वरील भागात अतिशय सुंदर असे नक्षीकाम आहे पण, अपुऱ्या प्रकाशामुळे त्याच्याकडे लक्षच जात नाही. मंदिरात प्रवेश करताना वरील बाजूच्या दगडात अतिशय सुंदर मूर्ती कोरल्या आहेत. हे सुंदर कोरीवकाम पाहत असताना त्या काळातील वैभव नजरेसमोर येते.

pune
नागेश्वर शिवमंदिर


हरिश्चंद्रगडावरून उजव्या बाजूला दिसणारे खोलवर पसरलेले घनदाट जंगल म्हणजेच आडराईचे जंगल. आडवाटेला असल्यामुळे याला आडराईच जंगल असे नाव आहे. पट्टीचे ट्रेकर सोडले तर या वाटेला सहसा कुणी फिरकतही नाही. या जंगलातून अनेक ओढे, धबधबे वाहतात. माळशेज घाटातून दिसणाऱ्या बहुतांश धबधब्याच्या उगम याच जंगलातील डोंगररांगात आहे. येथून वाहणारे छोटे-मोठे धबधबे पुढे जाऊन रौद्र रूप धारण करतात, आणि काळू नदीत विलीन होतात.
अशा प्रकारे इतिहासाची साक्ष देत उभ्या असलेल्या या जंगलाची एक वेगळीच ओळख आहे. शांत, सुंदर आणि मनोहर शब्दात वर्णन करावे तितके कमीच असे या जंगलाचे रूप. काळाच्या कितीतरी घटना, आठवणींना आपल्या पोटात घेवून दिमाखात उभे आहे. तर, एकदा नक्की या जंगलाची सफर करावी आणि हा देखावा प्रत्येकानी आपल्या डोळ्यात साठवावा अशीच येथील दृष्ये... तर मग वाट कसली बघताय.... उचला बॅग आणि निघा या अद्भूत दुनियेची सैर करायला.. त्याचे मनमोहक देखावे नजरेत कैद करायला...

पुणे - निसर्गाच्या अद्भूत देणगीनी नटलेलं असे कारवीचे जंगल. अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी असलेले हे जंगल... घनदाट झाडी, ओसंडून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे, ओढे, नदी, आभाळाच्या दिशेने निघालेले उंच वृक्ष तर कुठे उन्मळून पडलेले शेकडो वृक्ष, असे हे कारवीचे जंगल...प्रचंड मोठ्या शिळा, त्यावर साचलेले हिरवेगर्द शेवाळाचे गालिचे, हिरवा रंग त्याला जणू जन्मजातच मिळालाय..पक्षांची किलबिल, भरदिवसा रातकिड्यांची किरकिर...आणि टपोरा पाऊस अशा देखण्या रूपाने सजलेले हे जंगल...

pune
कारवीचे जंगल


हरिश्चंद्र गडाचा पायथा असलेल्या खिरेश्वर गावातून निघालेली पायवाट या जंगलात घेऊन जाते. या वाटेने काही अंतर प्रवास केल्यानंतर नजरेस पडतात काही वीरगळ. या वीरगळ पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण करून देतात. येथूनच काही अंतरावरच एक प्राचीन लेणी आहे. या लेणीपासून जवळच एक प्राचीन असे नागेश्वराचे शिवमंदिर आहे. नवव्या शतकात झंझ राजाने हे शिवमंदिर उभारल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.


या मंदिराची अवस्था मात्र दयनीय झाली आहे. मंदिरावराचे दगड निखळले आहेत. आतील गाभाऱ्यात एक शिवलिंग आहे. एका कमंडलूतुन यावर सतत पाणी पडत राहतं. गाभाऱ्याच्या वरील भागात अतिशय सुंदर असे नक्षीकाम आहे पण, अपुऱ्या प्रकाशामुळे त्याच्याकडे लक्षच जात नाही. मंदिरात प्रवेश करताना वरील बाजूच्या दगडात अतिशय सुंदर मूर्ती कोरल्या आहेत. हे सुंदर कोरीवकाम पाहत असताना त्या काळातील वैभव नजरेसमोर येते.

pune
नागेश्वर शिवमंदिर


हरिश्चंद्रगडावरून उजव्या बाजूला दिसणारे खोलवर पसरलेले घनदाट जंगल म्हणजेच आडराईचे जंगल. आडवाटेला असल्यामुळे याला आडराईच जंगल असे नाव आहे. पट्टीचे ट्रेकर सोडले तर या वाटेला सहसा कुणी फिरकतही नाही. या जंगलातून अनेक ओढे, धबधबे वाहतात. माळशेज घाटातून दिसणाऱ्या बहुतांश धबधब्याच्या उगम याच जंगलातील डोंगररांगात आहे. येथून वाहणारे छोटे-मोठे धबधबे पुढे जाऊन रौद्र रूप धारण करतात, आणि काळू नदीत विलीन होतात.
अशा प्रकारे इतिहासाची साक्ष देत उभ्या असलेल्या या जंगलाची एक वेगळीच ओळख आहे. शांत, सुंदर आणि मनोहर शब्दात वर्णन करावे तितके कमीच असे या जंगलाचे रूप. काळाच्या कितीतरी घटना, आठवणींना आपल्या पोटात घेवून दिमाखात उभे आहे. तर, एकदा नक्की या जंगलाची सफर करावी आणि हा देखावा प्रत्येकानी आपल्या डोळ्यात साठवावा अशीच येथील दृष्ये... तर मग वाट कसली बघताय.... उचला बॅग आणि निघा या अद्भूत दुनियेची सैर करायला.. त्याचे मनमोहक देखावे नजरेत कैद करायला...

Intro:हो...महाराष्ट्राचं अ‍ॅमेझॉन म्हणावं अशीच ख्याती आहे या आडराईच्या जंगलाची...काय नाही या जंगलात.. घनदाट झाडी..ओसंडून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे...ओढे...नदी..आभाळाच्या दिशेने निघालेले उंच वृक्ष..उन्मळून पडलेले शेकडो वृक्ष...भला मोठा बुंधा पण आतून वाळविणे पोखरलेले वृक्ष..कारवीचं जंगल...प्रचंड मोठ्या शिळा..त्यावर साचलेलं हिरवगर्द शेवाळ..हिरवा रंग त्याला जणू जन्मजातच मिळालाय..पक्षांची किलबिल..भर दिवसा रातकिड्यांची किरकिर...आणि टपोरा पाऊस...

हरिश्चंद्रगडाचा पायथा असलेल्या खिरेश्वर गावातून निघालेली पायवाट या जंगलात घेऊन जाते..या वाटेने काही अंतर प्रवास केल्यानंतर नजरेस पडतात काही वीरगळ..या वीरगळ पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण करून देतात..येथून काही अंतरावरच आहे एक प्राचीन लेणी..आणि या लेणीपासून जवळच आहे एक प्राचीन शिवमंदिर...नागेश्वराचे...नवव्या शतकात झंझराजानं हे शिवमंदिर उभारल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो...
Body:या मंदिराची अवस्था मात्र दयनीय झाली आहे... मंदिरावराचे दगड निखळले आहेत..गाभाऱ्यात एक शिवलिंग आहे...एका कमंडलूतुन यावर सतत पाणी पडत राहतं..गाभाऱ्याच्या वरील भागात अतिशय सुंदर नक्षीकाम..पण अपुऱ्या प्रकाशामुळे त्याच्याकडे लक्ष नाही जात...मंदिरात प्रवेश करताना वरील बाजूच्या दगडात अतिशय सुंदर मूर्ती कोरल्या आहेत..हे कोरीवकाम पाहत असताना त्या काळातील वैभव नजरेसमोर येतं..मंदिराचं हे अनोखं वैभव डोळ्यात साठवून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला...

हा प्रवास किती आणि कसा आहे हे फक्त आमच्यासोबत असलेल्या वाटाड्यालाच माहीत होतं..आम्हाला हा ट्रेक घडवण्यासाठी तो खास पाचनई गावातून आला होता..नागेश्वराचं मंदिर सोडल्यानंतर दगडधोंड्यातुन, खाचखळग्यातून वाट काढत आम्ही आडराईच्या वाटेला लागलो..हरिश्चंद्रगडावरून उजव्या बाजूला दिसणारं खोलवर पसरलेलं घनदाट जंगल म्हणजेच आडराईचं जंगल...आडराई का? तर हे आडवाटेला आहे म्हणून...पट्टीचे ट्रेकर सोडले तर या वाटेला सहसा कुणी फिरकतही नाही..पावसामुळे पायवाट बुजलेली..गवत वाढलेलं..त्यामुळं गवत कापीत, रस्त्याचा अंदाज घेत वाटाड्या चालतं होता..आणि त्याच्यामागे आम्ही...

अखंड पावसात तीन तास पायपीट केल्यानंतर आम्ही घनदाट जंगलात शिरलो...सगळीकडे शांतता...चिडीचूप..जराही आवाज नाही...अपवाद फक्त पावसाचा... झाडांच्या पानापानातून पावसाचे टपोरे थेंब खाली पसरलेल्या पालापाचोळ्यावर टप टप पडत असल्याचा आवाज जंगलभर येत होता...जंगलातील या वाटेवर ठिकठिकाणी झाडं कोसळल्याने वाट बंद झालेली..पावसाळ्यात जंगलाचं हे रूप पाहणं म्हणजे मोठा आनंद मिळवणं...चारही बाजूला हिरव्या रंगाची उधळण...रंग एकच पण छटा अनेक...
Conclusion:मुसळधार पावसामुळे पक्षीही घरट्यात दडून बसलेले...नाही म्हणायला एखादी खारुताई, नाकतोडा, जाळ्यात बसलेला कोळी तेवढा नजरेस पडत होता...या जंगलातून वाहतात अनेक ओढे..धबधबे..माळशेज घाटातून दिसणाऱ्या बहुतांश धबधब्याच्या उगम याच जंगलातील डोंगररांगात आहे..रस्ता चुकू नये यासाठी आम्ही ओढयाच्या, धबधब्यांच्या काठाने भटकत होतो..येथून वाहणारे छोटे-मोठे धबधबे पुढे जाऊन रौद्र रूप धारण करतात..आणि काळू नदीत विलीन होतात..आम्ही यापूर्वीच पावसात ओलेचिंब झालो होतो, पण तरीही धबधब्याचे तुषार अंगावर घेण्याचा मोह आवरत नव्हता..अशाच एका स्वच्छ धबधब्यावर हात धुतले..तेथील कातळावरच बसकण मारली आणि सोबत आणलेल्या भाकरी संपवल्या...खूप पाणी प्यालो...आणि निघालो परतीच्या वाटेला..

सकाळी आठ वाजता सुरू झालेला आमचा प्रवास सायंकाळी सहा वाजता परत खिरेश्वर गावात येऊन संपला...यातील आठ तास आम्ही अखंड पावसात भिजत होतो...या प्रवासात आमच्या सोबतीला होतं घनदाट जंगल..घनदाट धुकं..एका बाजूला खोल दरी...तर दुसऱ्या बाजूला अजस्त्र कातळकडे..या घनदाट जंगलातील घनदाट धुक्यातून आम्ही मार्गक्रमण करत राहिलो..गवत, पाला, पाचोळा, सुकलेल्या झाडाचे ओंडके पायाखाली तुडवत... झुडपं, झाडाच्या फांद्या चुकवत खिरेश्वर गावात पोहोचलो...या प्रवासानं शरीर प्रचंड थकलं होतं पण मन मात्र टवटवीत झालं होतं...एक वेगळीच ऊर्जा मिळाली होती..

किरण शिंदे
---------------------
Last Updated : Sep 4, 2019, 8:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.