ETV Bharat / state

कांग्रेस-राष्ट्रवादीची आश्वासने म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा - मुख्यमंत्री

सुजय विखेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री विशेष वेळ देत आहे. दरम्यान, ज्यांचे तिकीट कापून सुजय विखेंना उमेदवारी देण्यात आली ते दिलीप गांधीसुध्दा या प्रचार सभांमध्ये सहभागी होताना दिसले.

author img

By

Published : Apr 21, 2019, 7:53 AM IST

कांग्रेस-राष्ट्रवादीची आश्वासने म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा - मुख्यमंत्री

अहमदनगर- काँग्रेसचे घोषणपत्र आणि राष्ट्रवादीचा जाहीरनामा म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा आहे. त्यावर किती विश्वास ठेवायचा हे जनतेने आपापल्या जबाबदारीवर ठरवावे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कर्जत येथे युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, आ.सुरेश धस आणि सुनील साळवे यांच्यासह सेना-भाजप-आरपीआय युतीचे अनेक नेते उपस्थित होते.

कांग्रेस-राष्ट्रवादीची आश्वासने म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचार चरमसीमेला गेलेला होता. मात्र, आमचे सरकार आल्यावर आम्ही जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आणि त्या जनतेपर्यंत पोहचवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर वचक बसवला. स्वच्छ आणि पारदर्शक कारभार केल्याने जनता आज आमच्या पाठीशी आहे. मात्र, आता निवडणुकात काँग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेसची भाषणे म्हणजे एक करमणूक झाली आहे. यांची निम्मी भाषणे ही पंतप्रधान मोदींवर टीकेने भरलेली असतात. यांना जिथे-तिथे मोदी दिसतात. काहीजण तर रात्री मोदींमुळे घाबरून उठतात, अशी परस्थिती आहे. तर यांची निम्मी भाषणे करमणुकीची असतात. आता चॅनेलवर ज्या प्रमाणे एखाद्या कार्यक्रमाबाबत सूचना येते, की या कार्यक्रमातील पात्र, घटना या काल्पनिक असून वास्तविकतेशी याचा काहीही संबंध नाही, अशा सूचना द्यायची वेळ यांच्या भाषणाबाबत आली आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली.

अहमदनगर- काँग्रेसचे घोषणपत्र आणि राष्ट्रवादीचा जाहीरनामा म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा आहे. त्यावर किती विश्वास ठेवायचा हे जनतेने आपापल्या जबाबदारीवर ठरवावे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कर्जत येथे युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, आ.सुरेश धस आणि सुनील साळवे यांच्यासह सेना-भाजप-आरपीआय युतीचे अनेक नेते उपस्थित होते.

कांग्रेस-राष्ट्रवादीची आश्वासने म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचार चरमसीमेला गेलेला होता. मात्र, आमचे सरकार आल्यावर आम्ही जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आणि त्या जनतेपर्यंत पोहचवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर वचक बसवला. स्वच्छ आणि पारदर्शक कारभार केल्याने जनता आज आमच्या पाठीशी आहे. मात्र, आता निवडणुकात काँग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेसची भाषणे म्हणजे एक करमणूक झाली आहे. यांची निम्मी भाषणे ही पंतप्रधान मोदींवर टीकेने भरलेली असतात. यांना जिथे-तिथे मोदी दिसतात. काहीजण तर रात्री मोदींमुळे घाबरून उठतात, अशी परस्थिती आहे. तर यांची निम्मी भाषणे करमणुकीची असतात. आता चॅनेलवर ज्या प्रमाणे एखाद्या कार्यक्रमाबाबत सूचना येते, की या कार्यक्रमातील पात्र, घटना या काल्पनिक असून वास्तविकतेशी याचा काहीही संबंध नाही, अशा सूचना द्यायची वेळ यांच्या भाषणाबाबत आली आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली.

Intro:अहमदनगर- कांग्रेस-राष्ट्रवादीची आश्वासने म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा आहे, जनतेनेआपल्या जबाबदारी वर विश्वास ठेवावा..-मुख्यमंत्री फडणवीसBody:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_21_april_ahm_trimukhe_1_cm_rally_v

अहमदनगर- कांग्रेस-राष्ट्रवादीची आश्वासने म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा आहे, जनतेनेआपल्या जबाबदारी वर विश्वास ठेवावा..-मुख्यमंत्री फडणवीस

अहमदनगर- काँग्रेसचे घोषणपत्र आणि राष्ट्रवादीचा जाहीरनामा म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा आहे. त्यावर किती विश्वास ठेवायचा हे जनतेने आप-आपल्या जबाबदारी वर ठरवावे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कर्जत इथे युतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही टीका केली. पालकमंत्री राम शिंदे, आ.सुरेश धस, सुनील साळवे यांच्यासह सेना-भाजपा-आरपीआयचे नेते यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचार चरणसीमेला गेलेला होता. मात्र आमचे सरकार आल्यावर आम्ही जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आणि त्या जनतेपर्यंत पोहचवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर वचक बसवला. स्वच्छ आणि पारदर्शक कारभार केल्याने जनता आज आमच्या पाठीशी आहे. मात्र आता निवडणुकात काँग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेसची भाषणे म्हणजे एक करमणूक झाली आहे. यांची निम्मी भाषणे ही पंतप्रधान मोदींवर टीकेने भरलेली असतात. यांना जिथे-तिथे मोदी दिसतात. काहीजण तर रात्री मोदींमुळे घाबरून उठतात अशी परस्थिती आहे. तर यांची निम्मी भाषणे करमणुकीची असतात. आता चॅनेलवर ज्या प्रमाणे एखाद्या कार्यक्रमाबाबत सूचना येते की या कार्यक्रमातील पात्र,घटना या काल्पनिक असून वास्तवतेशी याचा काही संबंध नाही, अशा सूचना द्यायची वेळ ही यांच्या भाषणाबाबत आलेली आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- कांग्रेस-राष्ट्रवादीची आश्वासने म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा आहे, जनतेनेआपल्या जबाबदारी वर विश्वास ठेवावा..-मुख्यमंत्री फडणवीस
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.