ETV Bharat / sports

WTC Final : केएल राहुल, मयांक अगरवाल यांना विश्रांती तर या 15 शिलेदारांची निवड

भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

author img

By

Published : Jun 15, 2021, 7:11 PM IST

Updated : Jun 15, 2021, 7:35 PM IST

India Announce 15-Member Squad for WTC Final: Shardul Thakur, Mayank Agarwal Left Out
WTC Final : टीम इंडियाचे 'महामुकाबल्या'साठी निवडले 15 शिलेदार

मुंबई - भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी 20 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. त्यामधील 15 जणांची निवड ही 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या महामुकाबल्यासाठी करण्यात आली आहे.

भारताने रोहित शर्मासह सलामीला शुबमन गिलला संधी दिली आहे. तसेच ऋषभ पंत व वृद्धीमान साहा या दोन्ही यष्टिरक्षकांचा समावेश 15 खेळाडूंमध्ये करण्यात आला आहे. तर केएल राहुल आणि मयांक अगरवाल यांना वगळण्यात आले आहे. मधल्या फळीत विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे व्यतिरिक्त आधारस्तंभ चेतेश्वर पुजाराचा समावेश आहे. यात हनुमा विहारीलाही संधी मिळाली आहे.

जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव व मोहम्मद सिराज या पाच जलदगती गोलंदाजांचा संघात समावेश आहे. तसेच आर अश्विन व रवींद्र जडेजा ही फिरकी जोडी संघात कायम आहे. तर अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान मिळालेले नाही.

दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरूवात होण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. भारत आणि न्यूझीलंड या देशासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. साउथम्पटन येथे या सामन्याला 18 जूनपासून सुरूवात होणार आहे.

असा आहे अंतिम सामन्यासाठी भारताचा 15 सदस्यीय संघ -

रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्घीमान साहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.

हेही वाचा - WTC Final बाबत सचिनची भविष्यवाणी, सांगितलं कोणाचे पारडं जड

हेही वाचा - WTC FINAL: टीम इंडियाला 'विराट' चिंता, १८ वर्षांपासून न्यूझीलंड अजेय

मुंबई - भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी 20 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. त्यामधील 15 जणांची निवड ही 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या महामुकाबल्यासाठी करण्यात आली आहे.

भारताने रोहित शर्मासह सलामीला शुबमन गिलला संधी दिली आहे. तसेच ऋषभ पंत व वृद्धीमान साहा या दोन्ही यष्टिरक्षकांचा समावेश 15 खेळाडूंमध्ये करण्यात आला आहे. तर केएल राहुल आणि मयांक अगरवाल यांना वगळण्यात आले आहे. मधल्या फळीत विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे व्यतिरिक्त आधारस्तंभ चेतेश्वर पुजाराचा समावेश आहे. यात हनुमा विहारीलाही संधी मिळाली आहे.

जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव व मोहम्मद सिराज या पाच जलदगती गोलंदाजांचा संघात समावेश आहे. तसेच आर अश्विन व रवींद्र जडेजा ही फिरकी जोडी संघात कायम आहे. तर अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान मिळालेले नाही.

दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरूवात होण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. भारत आणि न्यूझीलंड या देशासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. साउथम्पटन येथे या सामन्याला 18 जूनपासून सुरूवात होणार आहे.

असा आहे अंतिम सामन्यासाठी भारताचा 15 सदस्यीय संघ -

रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्घीमान साहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.

हेही वाचा - WTC Final बाबत सचिनची भविष्यवाणी, सांगितलं कोणाचे पारडं जड

हेही वाचा - WTC FINAL: टीम इंडियाला 'विराट' चिंता, १८ वर्षांपासून न्यूझीलंड अजेय

Last Updated : Jun 15, 2021, 7:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.