ETV Bharat / sports

८७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच होणार नाही रणजी करंडकाचे आयोजन, बीसीसीआयचा निर्णय

बीसीसीआयने यंदाच्या वर्षी रणजी करंडक स्पर्धा न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

author img

By

Published : Jan 30, 2021, 12:39 PM IST

no ranji trophy for first time in 87 years bcci to host 50 over vijay hazare womens and u-19 tournaments
८७ वर्षाच्या इतिहासात प्रथमच होणार नाही रणजी करंडकाचे आयोजन, बीसीसीआयचा निर्णय

मुंबई - बीसीसीआयने यंदाच्या वर्षी रणजी करंडक स्पर्धा न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ८७ वर्षाच्या इतिहासात प्रथमच रणजी करंडकाचे आयोजन केले जाणार नाही. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेनंतर, बीसीसीआयने विजय हजारे करंडक स्पर्धेचे, आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी भारताचा माजी सलामीवीर आणि स्थानिक क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू वसीम जाफरने कोविडच्या प्रादुर्भावामुळे विजय हजारे, दुलिप आणि देवधर करंडक या स्पर्धा रद्द कराव्या आणि त्याच्याऐवजी रणजी करंडकाचे आयोजन करावे, अशी मागणी केली होती. पण बीसीसीआयने आता रणजी करंडकाऐवजी विजय हजारे करंडकाच्या आयोजनाचा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआय ५० षटकांची विजय हजारे क्रिकेट स्पर्धेसह, वरिष्ठ महिला क्रिकेट स्पर्धा आणि अंडर-१९ क्रिकेटमध्ये विनू मांकड एकदिवसीय ट्रॉफीचे आयोजन करणार आहे. यासंदर्भात बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितले की, 'आम्ही विजय हजारे करंडकासोबत वरिष्ठ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणार आहोत. यानंतर विनू मांकड ट्रॉफी अंडर-१९ चे आयोजन करण्यात येईल.'

दरम्यान, कोरोनाच्या महामारीत फेब्रुवारीमध्ये प्रथमच देशात आंतरराष्ट्रीय मालिकेला सुरूवात होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्याची मालिका यात खेळवली जाणार आहे. उभय संघातील या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे.

हेही वाचा - क्वारंटाइन कालावधी पूर्ण : स्टोक्स, आर्चर आणि बर्न्सची ट्रेनिंग सुरू

हेही वाचा - कसोटी मालिकेत वरचढ कोण? भारत की इंग्लंड, जाणून घ्या आकडेवारी

मुंबई - बीसीसीआयने यंदाच्या वर्षी रणजी करंडक स्पर्धा न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ८७ वर्षाच्या इतिहासात प्रथमच रणजी करंडकाचे आयोजन केले जाणार नाही. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेनंतर, बीसीसीआयने विजय हजारे करंडक स्पर्धेचे, आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी भारताचा माजी सलामीवीर आणि स्थानिक क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू वसीम जाफरने कोविडच्या प्रादुर्भावामुळे विजय हजारे, दुलिप आणि देवधर करंडक या स्पर्धा रद्द कराव्या आणि त्याच्याऐवजी रणजी करंडकाचे आयोजन करावे, अशी मागणी केली होती. पण बीसीसीआयने आता रणजी करंडकाऐवजी विजय हजारे करंडकाच्या आयोजनाचा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआय ५० षटकांची विजय हजारे क्रिकेट स्पर्धेसह, वरिष्ठ महिला क्रिकेट स्पर्धा आणि अंडर-१९ क्रिकेटमध्ये विनू मांकड एकदिवसीय ट्रॉफीचे आयोजन करणार आहे. यासंदर्भात बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितले की, 'आम्ही विजय हजारे करंडकासोबत वरिष्ठ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणार आहोत. यानंतर विनू मांकड ट्रॉफी अंडर-१९ चे आयोजन करण्यात येईल.'

दरम्यान, कोरोनाच्या महामारीत फेब्रुवारीमध्ये प्रथमच देशात आंतरराष्ट्रीय मालिकेला सुरूवात होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्याची मालिका यात खेळवली जाणार आहे. उभय संघातील या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे.

हेही वाचा - क्वारंटाइन कालावधी पूर्ण : स्टोक्स, आर्चर आणि बर्न्सची ट्रेनिंग सुरू

हेही वाचा - कसोटी मालिकेत वरचढ कोण? भारत की इंग्लंड, जाणून घ्या आकडेवारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.