ETV Bharat / sports

वानखडेवरील भारत-विंडीज टी-२० सामन्यावर अनिश्चततेचे सावट, 'हे' आहे कारण

author img

By

Published : Nov 21, 2019, 2:45 PM IST

Updated : Nov 21, 2019, 4:01 PM IST

मुंबई पोलिसांनी क्रिकेट सामन्याला सुरक्षा पुरवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनला सांगितले आहे. हा सामना ६ डिसेंबरला होणार आहे. या तारखेला बाबरी मशीद पाडली होती. त्यानंतर आता अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यात ६ डिसेंबरला 'महापरिनिर्वाण दिवस' असल्याने पोलिसांवर प्रचंड ताण असणार आहे.

वानखडेवरिल भारत-विंडीज टी-२० सामन्यावर अनिश्चततेचे सावट

मुंबई - बांगलादेश विरुध्दच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज विरुध्द टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठीची आज भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वी टी-२० मालिकेतील मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर होणारा पहिला सामना होईल की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी क्रिकेट सामन्याला सुरक्षा पुरवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनला सांगितले आहे. हा सामना ६ डिसेंबरला होणार आहे. या तारखेला बाबरी मशीद पाडली होती. त्यानंतर आता अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यात ६ डिसेंबरला 'महापरिनिर्वाण दिवस' असल्याने पोलिसांवर प्रचंड ताण असणार आहे.

या कारणाने मुंबई पोलिसांनी भारत-विडींज सामन्याला सुरक्षा देण्यास नकार दिला आहे. याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'मुंबई पोलिसांच्या प्रतिनिधिंनी आम्हाला या विषयाची कल्पना दिली आहे. पण, आम्ही पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेणार आहोत. या भेटीनंतर सामना होईल की नाही, हे स्पष्ट होईल.'

बांगलादेश मालिकेनंतर वेस्ट इंडीजचा संघ ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. या दौऱ्याला ६ डिसेंबरपासून टी-२० सामन्याने सुरुवात होणार आहे.

मुंबई - बांगलादेश विरुध्दच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज विरुध्द टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठीची आज भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वी टी-२० मालिकेतील मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर होणारा पहिला सामना होईल की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी क्रिकेट सामन्याला सुरक्षा पुरवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनला सांगितले आहे. हा सामना ६ डिसेंबरला होणार आहे. या तारखेला बाबरी मशीद पाडली होती. त्यानंतर आता अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यात ६ डिसेंबरला 'महापरिनिर्वाण दिवस' असल्याने पोलिसांवर प्रचंड ताण असणार आहे.

या कारणाने मुंबई पोलिसांनी भारत-विडींज सामन्याला सुरक्षा देण्यास नकार दिला आहे. याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'मुंबई पोलिसांच्या प्रतिनिधिंनी आम्हाला या विषयाची कल्पना दिली आहे. पण, आम्ही पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेणार आहोत. या भेटीनंतर सामना होईल की नाही, हे स्पष्ट होईल.'

बांगलादेश मालिकेनंतर वेस्ट इंडीजचा संघ ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. या दौऱ्याला ६ डिसेंबरपासून टी-२० सामन्याने सुरुवात होणार आहे.

हेही वाचा - IND VS BAN: ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामन्याची तिकिटं ब्लॅकने विकताना ६ जण अटकेत

हेही वाचा - भारतीय महिला संघाचे निर्भेळ यश, वेस्ट इंडीजविरुध्दची टी-२० मालिका ५-० ने जिंकली

हेही वाचा - IND Vs WI : भारताला त्यांच्याच देशात धुळ चारू, विडींजच्या स्फोटक फलंदाजाचा इशारा

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Nov 21, 2019, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.