ETV Bharat / sports

IND VS ENG : 'बुमराह दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात नको', जाणून घ्या अस का म्हणाला दिग्गज भारतीय

'जसप्रीत बुमराहला दुसऱ्या कसोटीत खेळवतील की नाही याबाबत खात्री नाही. पण, भारतीय संघाने त्याला विश्रांती द्यायला हवी. पिंक बॉल कसोटीसाठी तो संघात असायला हवा. तिसऱ्या कसोटीत तो एक्स फॅक्टर ठरू शकतो, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे.

author img

By

Published : Feb 7, 2021, 4:43 PM IST

ind vs eng thats why jasprit bumrah should be kept out of the second test says gautam gambhir
IND VS ENG : 'बुमराह दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात नको', जाणून घ्या अस का म्हणाला दिग्गज भारतीय

मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह याला अंतिम संघात खेळवू नये असे, मत भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून या दौऱ्यात उभय संघात ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे.

गंभीरने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा कालावधी पाहून बुमराहवर ताण पडू नये, असे सांगत आपले मत व्यक्त केले आहे. गंभीर म्हणाला, ,'जसप्रीत बुमराहला दुसऱ्या कसोटीत खेळवतील की नाही याबाबत खात्री नाही. पण, भारतीय संघाने त्याला विश्रांती द्यायला हवी. पिंक बॉल कसोटीसाठी तो संघात असायला हवा. तिसऱ्या कसोटीत तो एक्स फॅक्टर ठरू शकतो.'

'बुमराहला तुम्ही दीर्घ स्पेल टाकायला लावू नका. त्याला सातत्याने गोलंदाजी करायला लावल्यास, त्याच्यावरील ताण वाढत जाईल. या मालिकेचा कालावधी लक्षात घेता, त्याला विश्रांती द्यायला हवी. अन्यथा भारतीय संघासमोरील अडचणीत वाढ होईल, असेही गंभीर म्हणाला.

भारताकडे मोहम्मद सिराज व शार्दुल ठाकूर हे दोन पर्याय दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे बुमराहला दुसऱ्या कसोटीत विश्रांती देण्यास हरकत नाही, असे गंभीरला वाटते.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बुमराहला दुखापत झाली होती. या दुखापतीतून सावरल्यानंतर बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले आहे. चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत तो भारतीय संघाचा सदस्य आहे.

हेही वाचा - भारतीय संघासाठी आनंदाची बातमी; मोहम्मद शमीची सरावाला सुरुवात

हेही वाचा - India vs England : जो रुटने टिपला अविश्वसनीय झेल, पाहा व्हिडिओ

मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह याला अंतिम संघात खेळवू नये असे, मत भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून या दौऱ्यात उभय संघात ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे.

गंभीरने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा कालावधी पाहून बुमराहवर ताण पडू नये, असे सांगत आपले मत व्यक्त केले आहे. गंभीर म्हणाला, ,'जसप्रीत बुमराहला दुसऱ्या कसोटीत खेळवतील की नाही याबाबत खात्री नाही. पण, भारतीय संघाने त्याला विश्रांती द्यायला हवी. पिंक बॉल कसोटीसाठी तो संघात असायला हवा. तिसऱ्या कसोटीत तो एक्स फॅक्टर ठरू शकतो.'

'बुमराहला तुम्ही दीर्घ स्पेल टाकायला लावू नका. त्याला सातत्याने गोलंदाजी करायला लावल्यास, त्याच्यावरील ताण वाढत जाईल. या मालिकेचा कालावधी लक्षात घेता, त्याला विश्रांती द्यायला हवी. अन्यथा भारतीय संघासमोरील अडचणीत वाढ होईल, असेही गंभीर म्हणाला.

भारताकडे मोहम्मद सिराज व शार्दुल ठाकूर हे दोन पर्याय दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे बुमराहला दुसऱ्या कसोटीत विश्रांती देण्यास हरकत नाही, असे गंभीरला वाटते.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बुमराहला दुखापत झाली होती. या दुखापतीतून सावरल्यानंतर बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले आहे. चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत तो भारतीय संघाचा सदस्य आहे.

हेही वाचा - भारतीय संघासाठी आनंदाची बातमी; मोहम्मद शमीची सरावाला सुरुवात

हेही वाचा - India vs England : जो रुटने टिपला अविश्वसनीय झेल, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.