ETV Bharat / city

Smart Pit Poets Conference Nashik नाशिकमध्ये रंगला स्मार्ट खड्डे कवी संमेलन, महापालिका प्रशासनाच्या कारभारावर ओढले संतप्त ताशेरे

author img

By

Published : Aug 22, 2022, 10:49 PM IST

Updated : Aug 22, 2022, 10:59 PM IST

नाशिकमध्ये भाकपने स्मार्ट खड्डे कवी संमेलन Smart Pit Poets Conference Nashik आयोजित केले होते. यात 30 कवींनी उपहास, विनोद तर कधी टीका टिपणीच्या माध्यमातून महानगरपालिका व्यवस्थापनावर Municipal Corporation Nashik संतप्त ताशरे ओढले आहेत. सर आली धावून रस्ता गेला वाहून, डांबर झाले गोळा, खड्डे पडले 16, आयुष्यभर खातच आलो खस्ता, पन्नास वर्षे झाली तरी तसाच आहे आमचा रस्ता, अशा आशयाच्या कविता यावेळी कवींनी सादर केले.

कवी संमेलन
कवी संमेलन

नाशिक - शहरातील रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. सर्व शहर खड्डेमुळे झाले आहे. यामुळे नागरिकांमधून प्रशासना विरोधात तीव्र रोष निर्माण होत आहे. याच माध्यमातून नाशिकमध्ये भाकपने स्मार्ट खड्डे कवी संमेलन Smart Pit Poets Conference Nashik आयोजित केले होते. यात 30 कवींनी उपहास, विनोद तर कधी टीका टिपणीच्या माध्यमातून महानगरपालिका व्यवस्थापनावर Municipal Corporation Nashik संतप्त ताशरे ओढले आहेत. सर आली धावून रस्ता गेला वाहून, डांबर झाले गोळा, खड्डे पडले 16, आयुष्यभर खातच आलो खस्ता, पन्नास वर्षे झाली तरी तसाच आहे आमचा रस्ता, अशा आशयाच्या कविता यावेळी कवींनी सादर केले.

कविता सादर करताना कवी

नाशिकच्या कवींनी रस्त्यावरील खड्ड्यांबाबत कविताच्या माध्यमातून व्यवस्थेवर संतप्त ताशेरे ओढले आहे. शहरात असा एकही रस्ता नाही ज्या ठिकाणी खड्डे नाहीत. महानगरपालिका प्रशासनाने करोडो रुपये खर्च करून सुद्धा सर्व पैसे पाण्यात गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांमधून व रोष व्यक्त होत आहे. याच अनुषंगाने नाशिकच्या आयटक कार्यालयात भाकपने स्मार्ट खड्डे कविसंमेलन आयोजन केले होते. यामध्ये नाशिकच्या कवी, लेखक यांनी उपहास, विनोद तर कधी टीका टिपणीच्या माध्यमातून प्रशासनाच्या व्यवस्थेवर संतप्त ताशेरे ओढत आपली भूमिका मांडली.



...म्हणून कवी संमेलन : आंदोलनाला साहित्यिकांच्या लेखनातून धार येते. खरंतर खड्डे सगळ्यांनाच आवडतात नगरसेवक अधिकाऱ्यांना जरा अधिकच म्हणूनच आम्ही शहरातील खड्ड्यांसंदर्भात निवेदने देऊन थकल्याने आता साहित्यिकांनी आपली भूमिका घ्यावी, या उद्देशाने हे कवी संमेलन आयोजित केले. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. तब्बल 30 कवींनी खड्यांवर आधारित आपल्या कविता सादर करत प्रशासनाच्या व्यवस्थेवर कवितांच्या माध्यमातून ताशेरे ओढल्याचे आयोजक राजू देसले यांनी सांगितले.



'सामाजिक घटनांवर साहित्यिकांच्या भूमिकेची गरज' : कवी समाजाचा भाष्यकार असतो. म्हणून समाजातील खड्डे या घटनेवर त्याची भाष्य करणे अत्यंत औचित्याचे आहे. चळवळीतून त्याकडे लक्ष वेधले जाते. मात्र साहित्यिकांनी कवींनी भूमिका घेण्याच्या दृष्टीने अशी कवी संमेलनेने व्यवस्थेला जागे करू शकतात, असे स्मार्ट खड्डे कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ.शंकर बोऱ्हाडे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -Sanjay Raut संजय राऊतांच्या लेखणीची धार कोठडीतही सुरु, ईडी कारवाईविरुद्ध पुस्तक लिहणार

नाशिक - शहरातील रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. सर्व शहर खड्डेमुळे झाले आहे. यामुळे नागरिकांमधून प्रशासना विरोधात तीव्र रोष निर्माण होत आहे. याच माध्यमातून नाशिकमध्ये भाकपने स्मार्ट खड्डे कवी संमेलन Smart Pit Poets Conference Nashik आयोजित केले होते. यात 30 कवींनी उपहास, विनोद तर कधी टीका टिपणीच्या माध्यमातून महानगरपालिका व्यवस्थापनावर Municipal Corporation Nashik संतप्त ताशरे ओढले आहेत. सर आली धावून रस्ता गेला वाहून, डांबर झाले गोळा, खड्डे पडले 16, आयुष्यभर खातच आलो खस्ता, पन्नास वर्षे झाली तरी तसाच आहे आमचा रस्ता, अशा आशयाच्या कविता यावेळी कवींनी सादर केले.

कविता सादर करताना कवी

नाशिकच्या कवींनी रस्त्यावरील खड्ड्यांबाबत कविताच्या माध्यमातून व्यवस्थेवर संतप्त ताशेरे ओढले आहे. शहरात असा एकही रस्ता नाही ज्या ठिकाणी खड्डे नाहीत. महानगरपालिका प्रशासनाने करोडो रुपये खर्च करून सुद्धा सर्व पैसे पाण्यात गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांमधून व रोष व्यक्त होत आहे. याच अनुषंगाने नाशिकच्या आयटक कार्यालयात भाकपने स्मार्ट खड्डे कविसंमेलन आयोजन केले होते. यामध्ये नाशिकच्या कवी, लेखक यांनी उपहास, विनोद तर कधी टीका टिपणीच्या माध्यमातून प्रशासनाच्या व्यवस्थेवर संतप्त ताशेरे ओढत आपली भूमिका मांडली.



...म्हणून कवी संमेलन : आंदोलनाला साहित्यिकांच्या लेखनातून धार येते. खरंतर खड्डे सगळ्यांनाच आवडतात नगरसेवक अधिकाऱ्यांना जरा अधिकच म्हणूनच आम्ही शहरातील खड्ड्यांसंदर्भात निवेदने देऊन थकल्याने आता साहित्यिकांनी आपली भूमिका घ्यावी, या उद्देशाने हे कवी संमेलन आयोजित केले. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. तब्बल 30 कवींनी खड्यांवर आधारित आपल्या कविता सादर करत प्रशासनाच्या व्यवस्थेवर कवितांच्या माध्यमातून ताशेरे ओढल्याचे आयोजक राजू देसले यांनी सांगितले.



'सामाजिक घटनांवर साहित्यिकांच्या भूमिकेची गरज' : कवी समाजाचा भाष्यकार असतो. म्हणून समाजातील खड्डे या घटनेवर त्याची भाष्य करणे अत्यंत औचित्याचे आहे. चळवळीतून त्याकडे लक्ष वेधले जाते. मात्र साहित्यिकांनी कवींनी भूमिका घेण्याच्या दृष्टीने अशी कवी संमेलनेने व्यवस्थेला जागे करू शकतात, असे स्मार्ट खड्डे कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ.शंकर बोऱ्हाडे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -Sanjay Raut संजय राऊतांच्या लेखणीची धार कोठडीतही सुरु, ईडी कारवाईविरुद्ध पुस्तक लिहणार

Last Updated : Aug 22, 2022, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.