ETV Bharat / city

नागपूर शहरावर पाणी टंचाईचे गंभीर संकट ओढवणार, केवळ ४० दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा शिल्लक

author img

By

Published : Jun 4, 2019, 12:03 PM IST

नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणातील उपयुक्त जलसाठा संपलेला असून मृतसाठ्यापर्यंत पाण्याने तळ गाठला आहे. सध्या शहराला नावेगावखैरी धरणातून पाणी पुरवठा सुरू झाला आहे. या धरणात ३०६ दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा शिल्लक असला तरी तो केवळ ४० दिवस पुरणार आहे.

सिंचन सेवा भवन

नागपूर - शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणाचे पाणी मृतसाठ्यापर्यंत पोहोचले आहे. तर नावेगावखैरी धरणात ३०६ दशलक्ष घनमीटर पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे मान्सूनला विलंब झाल्यास नागपूर शहरावर पाणी टंचाईचे गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाणी टंचाईची माहिती देताना अधिकारी

शहरासह जिल्ह्यात पाण्याचे मुबलक स्रोत असतानादेखील भविष्यात नागपूर शहरावर पाणी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणातील उपयुक्त जलसाठा संपलेला असून मृतसाठ्यापर्यंत पाण्याने तळ गाठला आहे. सध्या शहराला नावेगावखैरी धरणातून पाणी पुरवठा सुरू झाला आहे. या धरणात ३०६ दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा शिल्लक असला तरी तो केवळ ४० दिवस पुरणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करताना कपात करण्याची सूचना महापालिकेला देण्यात आली आहे.

महापालिकेने पाणी कपातीसंदर्भात अद्यापही कोणत्याही सूचना केलेल्या नाहीत. मात्र, नागपूरकरांनी भविष्याचा वेध घेऊनच पाण्याचे नियोजन करावे, अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

नागपूर - शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणाचे पाणी मृतसाठ्यापर्यंत पोहोचले आहे. तर नावेगावखैरी धरणात ३०६ दशलक्ष घनमीटर पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे मान्सूनला विलंब झाल्यास नागपूर शहरावर पाणी टंचाईचे गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाणी टंचाईची माहिती देताना अधिकारी

शहरासह जिल्ह्यात पाण्याचे मुबलक स्रोत असतानादेखील भविष्यात नागपूर शहरावर पाणी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणातील उपयुक्त जलसाठा संपलेला असून मृतसाठ्यापर्यंत पाण्याने तळ गाठला आहे. सध्या शहराला नावेगावखैरी धरणातून पाणी पुरवठा सुरू झाला आहे. या धरणात ३०६ दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा शिल्लक असला तरी तो केवळ ४० दिवस पुरणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करताना कपात करण्याची सूचना महापालिकेला देण्यात आली आहे.

महापालिकेने पाणी कपातीसंदर्भात अद्यापही कोणत्याही सूचना केलेल्या नाहीत. मात्र, नागपूरकरांनी भविष्याचा वेध घेऊनच पाण्याचे नियोजन करावे, अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

Intro:मान्सूनला विलंब झाल्यास नागपूर शहरावर पाणी टंचाईचे गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे...तोतलाढोह धरणाचे पाणी मृतसाठ्या पर्यंत पोहचले असले तरी नावेगावखैरी धरणात 306 दशलक्ष घनमीटर पाणी साठा शिल्लक असून पुढील दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याचा दावा सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलाय


Body:नागपूर शहरासह जिल्ह्यात पाण्याचे मुबलक स्रोत असताना देखील भविष्यात नागपूर शहरावर पाणी संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही...नागपूर शहाराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोटलाडोह धरणातील उपयुक्त जलसाठा संपेलेला असून मृतसाठ्या पर्यंत तळ पाण्याने गाठला आहे....सध्या नागपूर शहराला नावेगावखैरी खैरी धरणातून पाणी पुरवठा सुरू झाला आहे...नावेगावखैरी धरणात 306 दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा शिल्लक असला तरी तो केवळ 40 दिवस पुरणार आहे...त्यामुळे पाणीपुरवठा करताना कपात करण्याची सुचना महानगर पालिकेला देण्यात आली आहे...नागपूर महानगर पालिकेने पाणी कपाती संदर्भात अद्यापही कोणत्याही सूचना केलेल्या नसल्याने नागपूरकर सध्या पाण्याच्या बाबतीत चिंतीत दिसत नसला तरी भविष्याचा वेध घेऊनच पाण्याचे नियोजन प्रत्येक नागरिकाने करण्याची गरज निर्माण झाली आहे
BYTE- ए .चितळे- अधिकारी सिंचन विभाग
BYTE- विजय (पिंटू) झलके- सभापती पाणी पुरवठा विभाग ,महानगर पालिका


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.