ETV Bharat / city

'गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि आकर्षण पॅकेजिंगवर जोर द्या'

author img

By

Published : Feb 3, 2020, 6:33 AM IST

आपल्या देशाच्या विकासात 29 टक्के वाटा हा लघू आणि छोट्या उद्योगांचा आहे. देशातील 48 टक्के एक्स्पोर्टसुद्धा छोट्या उद्योगांमधूनच होतो. त्यामुळे उद्योग करताना गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि आकर्षण पॅकिजिंगवर जोर दिला पाहिजे, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी उद्योजकांना दिला.

minister nitin gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर - आपल्या देशाच्या विकासात 29 टक्के वाटा हा लघू आणि छोट्या उद्योगांचा आहे. देशातील 48 टक्के एक्स्पोर्टसुद्धा छोट्या उद्योगांमधूनच होतो. त्यामुळे उद्योग करताना गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि आकर्षण पॅकिजिंगवर जोर दिला पाहिजे, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी उद्योजकांना दिला. नागपुरात आयोजित सहकार भारती संघाच्या महिला विंगतर्फे देशभरातील 1 हजार 200 महिलांचा मेळावा भरवण्यात आला होता. त्यावेळी गडकरी बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

दरम्यान, उद्योग क्षेत्राने 11 कोटी रोजगार दिले आहेत. त्यामुळे 48 टक्के एक्स्पोर्टचा आकडा हा 60 टक्क्यांवर नेण्याचे लक्ष केंद्र सरकारने निर्धारित केले आहे. तसेच 11 कोटी रोजगार निर्माण झाले असून, तिथे आणखी 5 कोटी रोजगारांची निर्मिती करण्याचे निश्चित झाल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

देशाच्या वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण उद्योग आहेत. त्याला वाढवता आले पाहिजे. पण, तुम्ही चांगल्या क्वालिटीवर लक्ष केंद्रीत करा, चांगली क्वालिटी दिली नाही तर व्यवसाय संपतो. त्याचबरोबर गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि आकर्षक पॅकेजिंग यावर भर दिला तर तुमचे प्रॉडक्ट्स हातो-हात विकले जातील. यासाठी मदर डेअरीने तयार केलेल्या संत्रा बर्फीचे उदाहरण नितीन गडकरींनी उद्योजकांना दिले.

नागपूर - आपल्या देशाच्या विकासात 29 टक्के वाटा हा लघू आणि छोट्या उद्योगांचा आहे. देशातील 48 टक्के एक्स्पोर्टसुद्धा छोट्या उद्योगांमधूनच होतो. त्यामुळे उद्योग करताना गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि आकर्षण पॅकिजिंगवर जोर दिला पाहिजे, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी उद्योजकांना दिला. नागपुरात आयोजित सहकार भारती संघाच्या महिला विंगतर्फे देशभरातील 1 हजार 200 महिलांचा मेळावा भरवण्यात आला होता. त्यावेळी गडकरी बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

दरम्यान, उद्योग क्षेत्राने 11 कोटी रोजगार दिले आहेत. त्यामुळे 48 टक्के एक्स्पोर्टचा आकडा हा 60 टक्क्यांवर नेण्याचे लक्ष केंद्र सरकारने निर्धारित केले आहे. तसेच 11 कोटी रोजगार निर्माण झाले असून, तिथे आणखी 5 कोटी रोजगारांची निर्मिती करण्याचे निश्चित झाल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

देशाच्या वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण उद्योग आहेत. त्याला वाढवता आले पाहिजे. पण, तुम्ही चांगल्या क्वालिटीवर लक्ष केंद्रीत करा, चांगली क्वालिटी दिली नाही तर व्यवसाय संपतो. त्याचबरोबर गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि आकर्षक पॅकेजिंग यावर भर दिला तर तुमचे प्रॉडक्ट्स हातो-हात विकले जातील. यासाठी मदर डेअरीने तयार केलेल्या संत्रा बर्फीचे उदाहरण नितीन गडकरींनी उद्योजकांना दिले.

Intro:आपल्या देशाच्या विकासात 29 टक्के वाटा हा लघु आणि छोट्या उद्योगांचा आहे,देशातील 48 टक्के एक्स्पोर्ट सुद्धा छोट्या उद्योगांमधूनच होतं...या क्षेत्राने 11 कोटी रोजगार दिले आहे...त्यामुळे केंद्र सरकारने हे ठरवलं आहे की 29 टक्याला 50 टक्यांपर्यंत न्यायचे आहे तर 48 टक्के एक्स्पोर्टचा आकडा हा 60 टक्क्यांवर नेण्याचे लक्ष निर्धारित केले आहे आणि 11 कोटी रोजगार निर्माण झाले आहेत तिथे आणखी 5 कोटी रोजगाराची निर्मिती करण्याचे निश्चित झाल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत,ते नागपुरात आयोजित सहकार भारती या संघाच्या महिला विंग तर्फे देशभरातील 1200 महिलांचा मेळावा भरविण्यात आला होता त्याच समापन सोहळ्यात बोलत होते
Body:देशाच्या वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे वैशिष्ठ पूर्ण उद्योग आहे त्याला वाढविता आलं पाहिजे , पण तुम्ही चांगल्या क्वालिटीवर लक्ष केंद्रित करा चांगली क्वालिटी दिली नाही तर व्यवसाय संपतो...व्यवसाय करताना तीन बाबींवर प्रकर्षाने लक्ष केंद्रित करायला हवं ते म्हणजे गुणवत्ता,वेळेचे नियोजन आणि आकर्षक पॅकेजिंग यावर भर दिला तर तुमचे प्रॉडक्ट्स हातो-हात विकले जातील,या करीता त्यांनी मदर डेअरी ने तयार केलेल्या संत्रा बर्फीचे उदाहरण दिले.

बाईट - नितीन गडकरी , केंद्रीय मंत्रीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.