ETV Bharat / city

'मनसे' करणार का 'राज'कीय सीमोल्लंघन?

author img

By

Published : Oct 8, 2019, 5:33 PM IST

स्वतः जन्मास घातलेल्या आपल्या पक्षाचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राज ठाकरेंसाठी ही विधानसभा निवडणूक अतिशय महत्वाची असणार आहे. पक्षाचा कमी होत असलेला जनाधार आणि पक्षाची होणारी पडझड थांबवण्यासाठी एक नवी रणनीती आणि उमेद घेऊन राज ठाकरेंना निवडणुकीच्या रणांगणात उतरावे लागणार आहे.

मनसे राज ठाकरे

मुंबई - लोकसभा निवडणुकीत तटस्थ भूमिका घेणारे मनसे प्रमुख राज ठाकरे हे सुरुवातीला विधानसभा निवडणुका लढवण्यास उत्सुक असल्याचे दिसले नाहीत. मात्र, पदाधिकारी आणि निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले पक्षातील नेते यांच्या आग्रहामुळे मनसे आता विधानसभेच्या रणांगणात उतरलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे विधानसभा निवडणुकीतून आपल्या पक्षात आलेली मरगळ दुर करत राजकीय सीमोल्लंघन करणार का, हे पहावे लागणार आहे.

हेही वाचा... शेवटी व्हायचं तेच झालं! भाजप-सेना युती तुटली? आता आमने-सामने लढाई

राष्ट्रवादी आणि मनसे छुपी युती ?

2014 ला नरेंद्र मोदी पर्यायाने भाजपला पाठिंबा देत प्रचार करणाऱ्या राज ठाकरेंनी, २०१९ च्या निवडणुकीत स्वपक्षाचा एकही उमेदवार नसताना फक्त भाजप विरोधात प्रचार केला. यासाठी राज्यभर सभा घेतल्या. या सर्व कालखंडात राज ठाकरे आणि शरद पवार यांची वाढती जवळीक हा सर्वांच्या चर्चेचा विषय बनला होता. यानंतर या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला आघाडीत घेण्याबाबत राष्ट्रवादीचा आग्रह होता, मात्र काँग्रेसच्या विरोधामुळे त्यांचा हा विचार बारगळला. यानंतर काही दिवसांत मनसेनेही 'एकला चलो रे'ची भुमिका घेतली.

raj Thackeray mns
'मनसे' करणार का 'राज'कीय सीमोल्लंघन ?

राष्ट्रवादी आणि मनसेमधील स्नेह गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे अनेक जागांवर राष्ट्रवादी आणि मनसेचे परस्पर सामंज्यस्य झालेले दिसते. त्याचा थेट फायदा दोन्ही पक्षांना होवू शकतो. ठाणे शहर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे सुहास देसाई निवडणूक लढवणार होते. मात्र, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. इथे राष्ट्रवादीची पूर्ण ताकद मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्या मागे उभी रहाणार आहे. त्याची परतफेड मुंब्रा-कळवा मतदारसंघात मनसेने उमेदवार न देता केली आहे. हाच पॅटर्न कल्याण ग्रामीणमध्येही पाहायला मिळाला आहे. या मतदार संघात राष्ट्रवादीने आपला उमेदवारच उभा केलेला नाही. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला असून शिवसेनेकडून रमेश म्हात्रे यांना तिकीट देण्यात आलंय तर मनसेकडून राजू पाटील यांना उमेदवारी मिळालीय.

हेही वाचा... कणकवलीत राणेंना भिडणारे काँग्रेसचे राणे आहेत तरी कोण?

पुण्यातही कोथरूडमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कडवे आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी मनसेचे अधिकृत उमेदवार किशोर शिंदेंना पाठिंबा दिला आहे. नाशिकमध्येही या दोन्ही पक्षात तडजोड झाल्याचे स्पष्ट जाणवते. मनसेने नाशिकमध्ये आपला उमेदवार मागे घेतला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. या ठिकाणी मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली असून भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या बाळासाहेब सानप यांना पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा... राजकीय वारसा लाभलेले 'हे' चेहरे पहिल्यांदाच विधानसभेच्या रणांगणात!

ठरावीक मतदारसंघात उमेदवार देण्याची मनसेची रणनीती

या निवडणुकीत मनसेने निवडक मतदारसंघात उमेदवार देण्याचे सुत्र स्विकारले आहे. मनसेच्या या रणनीतीचा फायदा पक्षाला होईल, असे बोलले जात आहे. त्यात प्रचाराची धुरा ही राज ठाकरेंवरच असणार आहे. राज यांचा करिश्मा आजही कायम आहे. त्याचा फायदाही पक्षाला होवू शकतो.

गेल्या १० वर्षात मनसेला हक्काचा मित्रपक्षा सापडला नाही. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रूपाने का होईना मित्रपक्ष सापडला आहे. राष्ट्रवादीची महाराष्ट्रात चांगली ताकद आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद आणि राज यांचा करिश्मा मनसेला तारण्यास यशस्वी होवू शकतो.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत तटस्थ भूमिका घेणारे मनसे प्रमुख राज ठाकरे हे सुरुवातीला विधानसभा निवडणुका लढवण्यास उत्सुक असल्याचे दिसले नाहीत. मात्र, पदाधिकारी आणि निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले पक्षातील नेते यांच्या आग्रहामुळे मनसे आता विधानसभेच्या रणांगणात उतरलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे विधानसभा निवडणुकीतून आपल्या पक्षात आलेली मरगळ दुर करत राजकीय सीमोल्लंघन करणार का, हे पहावे लागणार आहे.

हेही वाचा... शेवटी व्हायचं तेच झालं! भाजप-सेना युती तुटली? आता आमने-सामने लढाई

राष्ट्रवादी आणि मनसे छुपी युती ?

2014 ला नरेंद्र मोदी पर्यायाने भाजपला पाठिंबा देत प्रचार करणाऱ्या राज ठाकरेंनी, २०१९ च्या निवडणुकीत स्वपक्षाचा एकही उमेदवार नसताना फक्त भाजप विरोधात प्रचार केला. यासाठी राज्यभर सभा घेतल्या. या सर्व कालखंडात राज ठाकरे आणि शरद पवार यांची वाढती जवळीक हा सर्वांच्या चर्चेचा विषय बनला होता. यानंतर या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला आघाडीत घेण्याबाबत राष्ट्रवादीचा आग्रह होता, मात्र काँग्रेसच्या विरोधामुळे त्यांचा हा विचार बारगळला. यानंतर काही दिवसांत मनसेनेही 'एकला चलो रे'ची भुमिका घेतली.

raj Thackeray mns
'मनसे' करणार का 'राज'कीय सीमोल्लंघन ?

राष्ट्रवादी आणि मनसेमधील स्नेह गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे अनेक जागांवर राष्ट्रवादी आणि मनसेचे परस्पर सामंज्यस्य झालेले दिसते. त्याचा थेट फायदा दोन्ही पक्षांना होवू शकतो. ठाणे शहर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे सुहास देसाई निवडणूक लढवणार होते. मात्र, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. इथे राष्ट्रवादीची पूर्ण ताकद मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्या मागे उभी रहाणार आहे. त्याची परतफेड मुंब्रा-कळवा मतदारसंघात मनसेने उमेदवार न देता केली आहे. हाच पॅटर्न कल्याण ग्रामीणमध्येही पाहायला मिळाला आहे. या मतदार संघात राष्ट्रवादीने आपला उमेदवारच उभा केलेला नाही. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला असून शिवसेनेकडून रमेश म्हात्रे यांना तिकीट देण्यात आलंय तर मनसेकडून राजू पाटील यांना उमेदवारी मिळालीय.

हेही वाचा... कणकवलीत राणेंना भिडणारे काँग्रेसचे राणे आहेत तरी कोण?

पुण्यातही कोथरूडमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कडवे आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी मनसेचे अधिकृत उमेदवार किशोर शिंदेंना पाठिंबा दिला आहे. नाशिकमध्येही या दोन्ही पक्षात तडजोड झाल्याचे स्पष्ट जाणवते. मनसेने नाशिकमध्ये आपला उमेदवार मागे घेतला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. या ठिकाणी मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली असून भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या बाळासाहेब सानप यांना पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा... राजकीय वारसा लाभलेले 'हे' चेहरे पहिल्यांदाच विधानसभेच्या रणांगणात!

ठरावीक मतदारसंघात उमेदवार देण्याची मनसेची रणनीती

या निवडणुकीत मनसेने निवडक मतदारसंघात उमेदवार देण्याचे सुत्र स्विकारले आहे. मनसेच्या या रणनीतीचा फायदा पक्षाला होईल, असे बोलले जात आहे. त्यात प्रचाराची धुरा ही राज ठाकरेंवरच असणार आहे. राज यांचा करिश्मा आजही कायम आहे. त्याचा फायदाही पक्षाला होवू शकतो.

गेल्या १० वर्षात मनसेला हक्काचा मित्रपक्षा सापडला नाही. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रूपाने का होईना मित्रपक्ष सापडला आहे. राष्ट्रवादीची महाराष्ट्रात चांगली ताकद आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद आणि राज यांचा करिश्मा मनसेला तारण्यास यशस्वी होवू शकतो.

Intro:Body:

state news


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.