ETV Bharat / city

Emergency Management Training : धोकादायक इमारती व दरडी जवळील नागरिकांनाही आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण

author img

By

Published : Jul 4, 2022, 4:51 PM IST

मुंबईमध्ये सोमवारी कुर्ला नेहरू नगर येथील इमारत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला. इमारत व दरड कोसळण्याच्या अशा आपात्कालीन घटना घडल्यास वेळीच मदत पोहचावी. यासाठी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून प्रशिक्षण दिले जात आहे. ( Emergency Management Training In Mumbai )

Emergency Management Training In Mumbai
मुंबईत आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण

मुंबई - मुंबईमध्ये मागील वर्षी चेंबूर आणि विक्रोळी येथे दरडी कोसळून ३० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच, सोमवारी कुर्ला नेहरू नगर येथील इमारत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला. दरड व इमारत कोसळण्याच्या अशा घटना घडल्यास वेळीच मदत पोहचावी. यासाठी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून प्रशिक्षण दिले जात ( Emergency Management Training In Mumbai ) आहे, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

दरडी कोसळणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांना प्रशिक्षण - मुंबईमध्ये मागील वर्षी चेंबूर आणि विक्रोळी येथे दरडी कोसळून ३० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. मुंबईत दरडी कोसळू शकतात अशा ७२ ठिकाणांचा समावेश आहे. ज्याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. अश्या ठिकाणांना रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. अशा ठिकाणी दुर्घटना घडल्यावर त्याठिकाणी बचाव पथक पोहचण्यास काही कालावधी लागतो. दुर्घटना घडल्यापासून बचाव पथक पोहोचण्याच्या कालावधी मध्ये नागरिकांची पळापळ असते. अशा वेळी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे, त्यांना प्रथोमोपचार देणे असे प्रशिक्षण दिल्यास नागरिकांचे मृत्यू रोखता येऊ शकतात. धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आलेल्या इमारतीमधील आणि जवळील नागरिकांनी पालिकेशी संपर्क साधल्यास त्यांनाही प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी दिली.



१० हजार नागरिकांना प्रशिक्षण - नागरिकांना अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि डॉक्टरांकडून आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण दिल्याने दरड कोसळल्यास त्याठिकाणी राहणारे नागरिक, अंथरुणाला खिळून असलेले नागरिक अशा लोकांना त्वरित मदत पोहचवून त्यांचा जीव वाचवणे शक्य होणार आहे. अनिरुद्ध अकॅडमीची यासाठी पालिकेला मदत मिळत आहे. दरडी कोसळू शकतात ; अशा ठिकाणी १० हजार नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी आतापर्यंत ८ प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले आहे. हे प्रशिक्षण वर्ग कायमस्वरूपी सुरु राहणार असल्याची नार्वेकर यांनी दिली.



एनडीआरएफच्या ३ टीम - मुंबईमध्ये अनेकदा दरडी कोसळून नागरिकांचा मृत्यू होतो. हे मृत्यू रोखण्यासाठी दरडी कोसळू शकतात अशा ठिकाणी एनडीआरएफच्या ३ टीम तैनात करण्यात येणार आहेत. या टीम मधील कर्मचारी दरड कोसळू शकतात (रेड झोन )अशा ठिकाणी पावसाळ्याच्या कालावधीत राहून दुर्घटना घडल्यास बचाव करतील असे नार्वेकर यांनी सांगितले.



बचाव यंत्रणेकडून रेकी - मुंबईत दरडप्रवण क्षेत्रात एकुण ७२ ठिकाणांचा समावेश आहे. याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. या ठिकाणांना रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. अशा ठिकाणी तसेच पावसामुळे पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पालिका, अग्निशमन दल, पोलीस, नेव्ही, एनडीआरएफ आदी यंत्रणांनी रेकी केली आहे. यामुळे दुर्घटना घडल्यास त्याठिकाणी मदत आणि बचाव काम करणे सोपे जाणार असल्याची माहिती नार्वेकर यांनी दिली.



६ वर्षात ११६६ जणांचा मृत्यू - आग व इमारतींचे भाग, घरे, भिंती कोसळणे, समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, खदानात, मॅनहोलमध्ये पडणे अशा २०१३ पासून २०१८ या ५ वर्षांच्या कालावधी ४९ हजार १७९ दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. त्यात ९८७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३०६६ जण जखमी झाले आहेत. १ जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ पर्यंत एकूण १३१५० दुर्घटना घडल्या. यांत १७९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १३२ पुरुष आणि ४७ स्त्रियांचा समावेश आहे. तर ७२२ जण जखमी झाले. २०१३ ते २०१९ या ६ वर्षाच्या कालावधीत विविध दुर्घटनांमध्ये ११६६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - Floor Test Result : महाविकास आघाडीला शंभरीही गाठता आली नाही; दरवाजे बंद झाल्याने 'हे' आमदार राहिले गैरहजर

मुंबई - मुंबईमध्ये मागील वर्षी चेंबूर आणि विक्रोळी येथे दरडी कोसळून ३० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच, सोमवारी कुर्ला नेहरू नगर येथील इमारत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला. दरड व इमारत कोसळण्याच्या अशा घटना घडल्यास वेळीच मदत पोहचावी. यासाठी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून प्रशिक्षण दिले जात ( Emergency Management Training In Mumbai ) आहे, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

दरडी कोसळणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांना प्रशिक्षण - मुंबईमध्ये मागील वर्षी चेंबूर आणि विक्रोळी येथे दरडी कोसळून ३० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. मुंबईत दरडी कोसळू शकतात अशा ७२ ठिकाणांचा समावेश आहे. ज्याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. अश्या ठिकाणांना रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. अशा ठिकाणी दुर्घटना घडल्यावर त्याठिकाणी बचाव पथक पोहचण्यास काही कालावधी लागतो. दुर्घटना घडल्यापासून बचाव पथक पोहोचण्याच्या कालावधी मध्ये नागरिकांची पळापळ असते. अशा वेळी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे, त्यांना प्रथोमोपचार देणे असे प्रशिक्षण दिल्यास नागरिकांचे मृत्यू रोखता येऊ शकतात. धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आलेल्या इमारतीमधील आणि जवळील नागरिकांनी पालिकेशी संपर्क साधल्यास त्यांनाही प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी दिली.



१० हजार नागरिकांना प्रशिक्षण - नागरिकांना अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि डॉक्टरांकडून आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण दिल्याने दरड कोसळल्यास त्याठिकाणी राहणारे नागरिक, अंथरुणाला खिळून असलेले नागरिक अशा लोकांना त्वरित मदत पोहचवून त्यांचा जीव वाचवणे शक्य होणार आहे. अनिरुद्ध अकॅडमीची यासाठी पालिकेला मदत मिळत आहे. दरडी कोसळू शकतात ; अशा ठिकाणी १० हजार नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी आतापर्यंत ८ प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले आहे. हे प्रशिक्षण वर्ग कायमस्वरूपी सुरु राहणार असल्याची नार्वेकर यांनी दिली.



एनडीआरएफच्या ३ टीम - मुंबईमध्ये अनेकदा दरडी कोसळून नागरिकांचा मृत्यू होतो. हे मृत्यू रोखण्यासाठी दरडी कोसळू शकतात अशा ठिकाणी एनडीआरएफच्या ३ टीम तैनात करण्यात येणार आहेत. या टीम मधील कर्मचारी दरड कोसळू शकतात (रेड झोन )अशा ठिकाणी पावसाळ्याच्या कालावधीत राहून दुर्घटना घडल्यास बचाव करतील असे नार्वेकर यांनी सांगितले.



बचाव यंत्रणेकडून रेकी - मुंबईत दरडप्रवण क्षेत्रात एकुण ७२ ठिकाणांचा समावेश आहे. याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. या ठिकाणांना रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. अशा ठिकाणी तसेच पावसामुळे पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पालिका, अग्निशमन दल, पोलीस, नेव्ही, एनडीआरएफ आदी यंत्रणांनी रेकी केली आहे. यामुळे दुर्घटना घडल्यास त्याठिकाणी मदत आणि बचाव काम करणे सोपे जाणार असल्याची माहिती नार्वेकर यांनी दिली.



६ वर्षात ११६६ जणांचा मृत्यू - आग व इमारतींचे भाग, घरे, भिंती कोसळणे, समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, खदानात, मॅनहोलमध्ये पडणे अशा २०१३ पासून २०१८ या ५ वर्षांच्या कालावधी ४९ हजार १७९ दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. त्यात ९८७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३०६६ जण जखमी झाले आहेत. १ जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ पर्यंत एकूण १३१५० दुर्घटना घडल्या. यांत १७९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १३२ पुरुष आणि ४७ स्त्रियांचा समावेश आहे. तर ७२२ जण जखमी झाले. २०१३ ते २०१९ या ६ वर्षाच्या कालावधीत विविध दुर्घटनांमध्ये ११६६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - Floor Test Result : महाविकास आघाडीला शंभरीही गाठता आली नाही; दरवाजे बंद झाल्याने 'हे' आमदार राहिले गैरहजर

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.