ETV Bharat / city

Mahaparinirvan Diwas : आंबेडकरी अनुयायांची प्रशासनाविरोधातील नाराजी उफाळून आली - आनंदराज आंबेडकर

author img

By

Published : Dec 6, 2021, 5:07 PM IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din) येणाऱ्यांना दरवर्षी पालिका प्रशासनाकडून सोयी-सुविधा पुरवल्या जातात. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर पालिकेने हात आखडता घेतल्याने आंबेडकरी अनुयायांमधील नाराजी उफाळून आल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. काही गैरसमजातून हा प्रकार झाला असून यापुढे असे होणार नाही, असे आंबेडकर म्हणाले.

anandraj-ambedka
anandraj-ambedka

मुंबई - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din)येणाऱ्यांना दरवर्षी पालिका प्रशासनाकडून सोयी-सुविधा पुरवल्या जातात. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर पालिकेने हात आखडता घेतल्याने आंबेडकरी अनुयायांमधील नाराजी उफाळून आल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. काही गैरसमजातून हा प्रकार झाला असून यापुढे असे होणार नाही, असे आंबेडकर म्हणाले.

अनुयायांमध्ये संतापाची लाट -

बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Diwas )रविवारपासून आंबेडकरी अनुयायी मुंबईत दाखल झाले आहेत. देशासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी मुंबईत आले आहेत. मुंबई महापालिकेकडून दरवर्षी आंबेडकरी अनुयायांसाठी राहण्याची, खाण्याची आणि पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली जाते. पुस्तकांचे स्टॉल भरण्यास परवानगी दिली जाते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात असल्याने पालिकेने यंदा चैत्यभूमीचा परिसर वगळता इतर ठिकाणी कोणत्याही सोयी सुविधा दिलेल्या नाहीत. आंबेडकरी अनुयायांमध्ये यामुळे संतापाची लाट होती. ही लाट दुपारनंतर उफाळून आल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.

आनंदराज आंबेडकर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना
सोयी-सुविधांचा अभाव -
कोविडमुळे सुरुवातीला दर्शनासाठी येऊ नका असे सांगण्यात आले. लोकांच्या मनात यामुळे चीड निर्माण झाली होती. दरवर्षी शिवाजी पार्क परिसरात शौचालय, पिण्यासाठी पाणी, राहण्यासाठी मंडप उभारला जातो. यंदा कोणत्याही सोयी दिल्या नाहीत. दानशूर व्यक्तींनाही भोजनदान करण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे अनुयायांनी संताप व्यक्त केला, असे आनंदराज आंबेडकर म्हणाले.
स्मारकाचा प्रश्न प्रलंबित -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा (Dr. Babasaheb Ambedkar Memorial) प्रश्न गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या ४ वर्षात सरदार वल्लभ भाई पटेल यांचा पुतळा उभारला. भाजप काळात भूमिपूजन केलेल्या स्मारकाची वीट रचण्यात आलेली नाही, असे आंबेडकर यांनी सांगितले. तसेच बाबासाहेबांच्या विचारांच्या पुस्तकांची छपाई सरकारने बंद केल्याप्रकरणी आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली.

मुंबई - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din)येणाऱ्यांना दरवर्षी पालिका प्रशासनाकडून सोयी-सुविधा पुरवल्या जातात. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर पालिकेने हात आखडता घेतल्याने आंबेडकरी अनुयायांमधील नाराजी उफाळून आल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. काही गैरसमजातून हा प्रकार झाला असून यापुढे असे होणार नाही, असे आंबेडकर म्हणाले.

अनुयायांमध्ये संतापाची लाट -

बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Diwas )रविवारपासून आंबेडकरी अनुयायी मुंबईत दाखल झाले आहेत. देशासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी मुंबईत आले आहेत. मुंबई महापालिकेकडून दरवर्षी आंबेडकरी अनुयायांसाठी राहण्याची, खाण्याची आणि पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली जाते. पुस्तकांचे स्टॉल भरण्यास परवानगी दिली जाते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात असल्याने पालिकेने यंदा चैत्यभूमीचा परिसर वगळता इतर ठिकाणी कोणत्याही सोयी सुविधा दिलेल्या नाहीत. आंबेडकरी अनुयायांमध्ये यामुळे संतापाची लाट होती. ही लाट दुपारनंतर उफाळून आल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.

आनंदराज आंबेडकर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना
सोयी-सुविधांचा अभाव -
कोविडमुळे सुरुवातीला दर्शनासाठी येऊ नका असे सांगण्यात आले. लोकांच्या मनात यामुळे चीड निर्माण झाली होती. दरवर्षी शिवाजी पार्क परिसरात शौचालय, पिण्यासाठी पाणी, राहण्यासाठी मंडप उभारला जातो. यंदा कोणत्याही सोयी दिल्या नाहीत. दानशूर व्यक्तींनाही भोजनदान करण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे अनुयायांनी संताप व्यक्त केला, असे आनंदराज आंबेडकर म्हणाले.
स्मारकाचा प्रश्न प्रलंबित -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा (Dr. Babasaheb Ambedkar Memorial) प्रश्न गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या ४ वर्षात सरदार वल्लभ भाई पटेल यांचा पुतळा उभारला. भाजप काळात भूमिपूजन केलेल्या स्मारकाची वीट रचण्यात आलेली नाही, असे आंबेडकर यांनी सांगितले. तसेच बाबासाहेबांच्या विचारांच्या पुस्तकांची छपाई सरकारने बंद केल्याप्रकरणी आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.