ETV Bharat / briefs

कंगना रानावतचं लैंगिक शोषण आणि मारहाण केल्याप्रकरणी आदित्य पांचोली विरोधात गुन्हा दाखल

आदित्य पांचोलीने कंगना रानावतला मारहाण केली आणि तिचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार बहिण रंगोलीने केली होती. वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये याचा गुन्हा दाखल झाला आहे. रंगोली रानावत हिने ई-मेलच्या माध्यमातून आदित्य पांचोली विरोधात प्राथमिक तक्रार दाखल केली असून त्याआधारे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

author img

By

Published : May 15, 2019, 5:21 PM IST

आदित्य पांचोली आणि कंगना रानावत


मुंबई - अभिनेत्री कंगना रानावतचे लैंगिक शोषण करून तिला मारहाण केल्याप्रकरणी मुंबईतील वर्सोवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कंगनाची बहिण रंगोली रानावत हिने ई-मेलच्या माध्यमातून आदित्य पांचोली विरोधात प्राथमिक तक्रार दाखल केली असून त्याआधारे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना कंगनाच्या करिअरच्या सुरुवातीला म्हणजेच जवळपास १० वर्षांपूर्वी घडली असल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी यापूर्वीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून या दोघांनी एकमेकविरोधात अब्रु नुकसानीचे दावे दाखल केले होते. आदित्य पांचोलीने हे सगळं आपल्याविरुध्द षडयंत्र असल्याचा दावा केला होता. त्याचवेळी कंगनाचे वकील आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचही तक्रारीत म्हटलं होतं. त्यामुळे 10 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाचा नवीन अध्याय आता सुरू झाला आहे.

आदित्यने आणि कंगना यांनी आपल्यातील नातेसंबंध कधीही नाकारले नव्हते. मात्र आपल्यात जे काही होत ते परस्पर संमतीने घडलं होतं असं आदित्यच सांगणं आहे. त्याशिवाय बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी कंगनाने आपला वापर केल्याचं आदित्यच म्हणणं आहे. 'राज टू' हा सिनेमा संपता संपता कंगनाने आपल्याशी नातं तोडून नवीन बॉयफ्रेंड शोधलेला होता. त्यामुळे त्यानंतर आपला तिच्याशी काहीही संबंध नसल्याचं आदित्यच सांगणं आहे. तर दुसरीकडे लैंगिक शोषण आणि मारहाण यामुळे या नात्याची अखेर झाल्याचं कंगनाचं म्हणणं असून त्यासाठी आदित्य पांचोलीवर कारवाई करावी अशी मागणी कंगनाने केली आहे.

दरम्यान पोलिसांनी अद्याप या प्रकरणी आदित्यवर कोणतीही कारवाई केलेली नाही. मात्र तक्रारीच गांभीर्य पाहता ती कोणत्याही क्षणी होऊ शकते. अशात कंगना आणि आदित्य यांच्यात नव्याने सुरू झालेला हा वाद कुठपर्यंत जातो ते आता पहायचं.


मुंबई - अभिनेत्री कंगना रानावतचे लैंगिक शोषण करून तिला मारहाण केल्याप्रकरणी मुंबईतील वर्सोवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कंगनाची बहिण रंगोली रानावत हिने ई-मेलच्या माध्यमातून आदित्य पांचोली विरोधात प्राथमिक तक्रार दाखल केली असून त्याआधारे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना कंगनाच्या करिअरच्या सुरुवातीला म्हणजेच जवळपास १० वर्षांपूर्वी घडली असल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी यापूर्वीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून या दोघांनी एकमेकविरोधात अब्रु नुकसानीचे दावे दाखल केले होते. आदित्य पांचोलीने हे सगळं आपल्याविरुध्द षडयंत्र असल्याचा दावा केला होता. त्याचवेळी कंगनाचे वकील आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचही तक्रारीत म्हटलं होतं. त्यामुळे 10 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाचा नवीन अध्याय आता सुरू झाला आहे.

आदित्यने आणि कंगना यांनी आपल्यातील नातेसंबंध कधीही नाकारले नव्हते. मात्र आपल्यात जे काही होत ते परस्पर संमतीने घडलं होतं असं आदित्यच सांगणं आहे. त्याशिवाय बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी कंगनाने आपला वापर केल्याचं आदित्यच म्हणणं आहे. 'राज टू' हा सिनेमा संपता संपता कंगनाने आपल्याशी नातं तोडून नवीन बॉयफ्रेंड शोधलेला होता. त्यामुळे त्यानंतर आपला तिच्याशी काहीही संबंध नसल्याचं आदित्यच सांगणं आहे. तर दुसरीकडे लैंगिक शोषण आणि मारहाण यामुळे या नात्याची अखेर झाल्याचं कंगनाचं म्हणणं असून त्यासाठी आदित्य पांचोलीवर कारवाई करावी अशी मागणी कंगनाने केली आहे.

दरम्यान पोलिसांनी अद्याप या प्रकरणी आदित्यवर कोणतीही कारवाई केलेली नाही. मात्र तक्रारीच गांभीर्य पाहता ती कोणत्याही क्षणी होऊ शकते. अशात कंगना आणि आदित्य यांच्यात नव्याने सुरू झालेला हा वाद कुठपर्यंत जातो ते आता पहायचं.

Intro:अभिनेत्री कंगना रानौतच लैंगिक शोषण करून तिला मारहाण केल्याप्रकरणी मुंबईतील वर्सोवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कंगनाची बहिण रंगोली रानौत हिने ई-मेलच्या माध्यमातून आदित्य पांचोली विरोधात प्राथमिक तक्रार दाखल केली असून त्याआधारे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना कंगनाच्या करिअरच्या सुरुवातीला म्हणजेच जवळपास १० वर्षांपूर्वी घडली असल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी यापूर्वीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून या दोघांनी एकमेकविरोधात अब्रु नुकसानीचे दवे दाखल केले होते. आदित्य पांचोलीने हे सगळं आपल्याविरुध्द षडयंत्र असल्याचा दावा केला होता. त्याचवेळी कंगनाचे वकील आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचही तक्रारीत म्हटलं होतं. त्यामुळे 10 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाचा नवीन अध्याय आता सुरू झाला आहे.

आदित्यने आणि कंगना यांनी आपल्यातील नातेसंबंध कधीही नाकारले नव्हते. मात्र आपल्यात जे काही होत ते परस्पर संमतीने घडलं होतं असं आदित्यच सांगणं आहे. त्याशिवाय बॉलिवूड मध्ये नाव कमावण्यासाठी कंगणाने आपला वापर केल्याचं आदित्यच म्हणणं आहे. राज टू हा सिनेमा संपता संपता कंगणाने आपल्याशी नात तोडून नवीन बॉयफ्रेंड शोधलेला होता त्यामुळे त्यानंतर आपला तिच्याशी काहीही संबंध नसल्याचं आदित्यच सांगणं आहे. तर दुसरीकडे लैंगिक शोषण आणि मारहाण यामुळे या नात्याची अखेर झाल्याचं कंगणच म्हणणं असून त्यासाठी आदित्य पंचोलीवर कारवाई करावी अशी मागणी कंगणाने केली आहे.

दरम्यान पोलिसांनी अद्याप या प्रकरणी आदित्यवर कोणतीही कारवाई केलेली नाही. मात्र तक्रारीच गांभीर्य पाहता ती कोणत्याही क्षणी होऊ शकते. अशात कंगना आणि आदित्य यांच्यात नव्याने सुरू झालेला हा वाद कुठपर्यंत जातो ते आता पहायचं.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.