ETV Bharat / bharat

India Sri Lanka Ferry Service : भारत-श्रीलंका प्रवास आता फक्त ३ तासांचा, मोदींनी केलं ४० वर्षांपासून बंद असलेल्या सागरी सेवेचं उद्घाटन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 8:01 PM IST

India Sri Lanka Ferry Service : गेल्या ४० वर्षांपासून बंद असलेली भारत-श्रीलंकेदरम्यानची सागरी सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तिला हिरवा झेंडा दाखवला. या दोन शेजारी देशांमधील सागरी सेवा इतके वर्षं का बंद होती, जाणून घेण्यासाठी हा वाचा ही बातमी...

India Sri Lanka Ferry Service
India Sri Lanka Ferry Service

नवी दिल्ली India Sri Lanka Ferry Service : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१४ ऑक्टोबर) भारत आणि श्रीलंकेदरम्यान बहुप्रतिक्षित प्रवासी फेरी सेवेला हिरवा झेंडा दाखवला. जवळपास ४० वर्षांनंतर दोन देशांदरम्यान ही सेवा सुरू झाली. या बोटीचा प्रवास तामिळनाडूमधील नागापट्टिनम येथे सुरू होणार असून तो श्रीलंकेतील जाफना येथील कानकेसंथुराई येथे संपेल. विशेष म्हणजे हा प्रवास अवघ्या तीन तासांत पूर्ण होणार आहे. या सेवेनं दोन देशांमधील लोकांचा संपर्क वाढेल, अशी आशा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्ती केली आहे. जाणून घ्या याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी...

ही सेवा का थांबली होती : भारत आणि श्रीलंका यांच्यातील भौगोलिक जवळीक लक्षात घेता, ही सागरी सेवा पारंपारिकपणे दोन देशांमधील कनेक्टिव्हिटीचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. या सेवेमुळे व्यापार आणि वस्तूंची वाहतूक सुलभ होते. परंतु श्रीलंकेतील गृहयुद्धामुळं ही सेवा चाळीस वर्ष थांबली होती. सुरक्षेच्या कारणास्तव १९८० च्या दशकात भारत आणि श्रीलंका दरम्यानची सागरी सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर, मे २०११ मध्ये तुतिकोरिन (तामिळनाडू) आणि कोलंबो (श्रीलंका) दरम्यान सेवा सुरू करण्यात आली. तथापि, व्यावसायिक व्यवहार्यतेच्या अभावामुळं नोव्हेंबर २०११ मध्ये ही सेवा पुन्हा बंद करण्यात आली.

'चेरियापानी' जहाजाचं वैशिष्ट्य : ही सागरी सेवा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI) द्वारे चालवली जाईल. तामिळनाडूहून श्रीलंकेला अवघ्या तीन तासांत घेऊन जाणाऱ्या क्रूझचं नाव आहे 'चेरियापानी'. या जहाजात १५० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असून ते पूर्णपणे वातानुकूलित आहे. मात्र, ही फेरी सेवा केवळ १० दिवस चालणार असून त्यानंतर ती बंद करण्यात येईल. ईशान्य मान्सूनमुळे बंगालच्या उपसागरात वादळ येण्याची शक्यता असल्यानं, नागापट्टिनम आणि श्रीलंका दरम्यानची ही सेवा मार्च २०२४ पर्यंत बंद राहिल.

सागरी सेवेचा उद्देश : ४० वर्षांनंतर सुरू होत असलेल्या या सागरी सेवेचा उद्देश १९०० च्या सुरुवातीला निर्माण झालेल्या ऐतिहासिक सागरी संबंधांना पुनरुज्जीवित करण्याचा आहे. चेन्नई आणि थुथुकुडी मार्गे कोलंबोहून जाणारी इंडो-सिलोन एक्सप्रेस १९८३ मध्ये श्रीलंकेतील गृहयुद्धामुळे बंद पडली होती. ही सेवा सुरू करण्यासाठी भारत सरकारनं तामिळनाडू मेरीटाईम बोर्डाला नागपट्टिनम बंदरातील सुविधा अपग्रेड करण्यासाठी मदत केली. त्याचप्रमाणे श्रीलंका सरकारनं कंकेसंथुराई बंदरात आवश्यक पायाभूत सुविधा विकसित केल्या. ही सेवा सुरू करण्यामागे भारत सरकारचा उद्देश शेजारी देशांशी संपर्क वाढवण्याचा आहे.

प्रवास खर्च : क्रूझचं भाडं ६,५०० रुपये + १८ टक्के जीएसटी असेल. अशाप्रकारे प्रति व्यक्ती ७,६७० रुपये लागतील. मात्र उद्घाटनाच्या निमित्तानं भाड्यात ७५ टक्के सूट देण्यात आली होती. १४ ऑक्टोबरला एका दिवसाचं तिकीट भाडं २,३७५ रुपये + १८ टक्के जीएसटी प्रति व्यक्ती होतं. उदघाटनाच्या दिवशी ३५ लोकांनी क्रूझ बुकिंग केलं होतं. प्रवाशांना क्रुझमध्ये ४० किलोपर्यंतचं सामान मोफत नेण्याची परवानगी असेल.

हेही वाचा :

  1. Operation Ajay : इस्रायलवरुन दुसरं विमान धडकलं दिल्लीत; 235 भारतीयांना आणलं सुखरुप
  2. PM Narendra Modi Worship: पंतप्रधान मोदींनी कैलाशाचे दर्शन घेऊन केले ध्यान, शंखासह डमरू वाजून केली शिवभक्ती

नवी दिल्ली India Sri Lanka Ferry Service : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१४ ऑक्टोबर) भारत आणि श्रीलंकेदरम्यान बहुप्रतिक्षित प्रवासी फेरी सेवेला हिरवा झेंडा दाखवला. जवळपास ४० वर्षांनंतर दोन देशांदरम्यान ही सेवा सुरू झाली. या बोटीचा प्रवास तामिळनाडूमधील नागापट्टिनम येथे सुरू होणार असून तो श्रीलंकेतील जाफना येथील कानकेसंथुराई येथे संपेल. विशेष म्हणजे हा प्रवास अवघ्या तीन तासांत पूर्ण होणार आहे. या सेवेनं दोन देशांमधील लोकांचा संपर्क वाढेल, अशी आशा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्ती केली आहे. जाणून घ्या याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी...

ही सेवा का थांबली होती : भारत आणि श्रीलंका यांच्यातील भौगोलिक जवळीक लक्षात घेता, ही सागरी सेवा पारंपारिकपणे दोन देशांमधील कनेक्टिव्हिटीचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. या सेवेमुळे व्यापार आणि वस्तूंची वाहतूक सुलभ होते. परंतु श्रीलंकेतील गृहयुद्धामुळं ही सेवा चाळीस वर्ष थांबली होती. सुरक्षेच्या कारणास्तव १९८० च्या दशकात भारत आणि श्रीलंका दरम्यानची सागरी सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर, मे २०११ मध्ये तुतिकोरिन (तामिळनाडू) आणि कोलंबो (श्रीलंका) दरम्यान सेवा सुरू करण्यात आली. तथापि, व्यावसायिक व्यवहार्यतेच्या अभावामुळं नोव्हेंबर २०११ मध्ये ही सेवा पुन्हा बंद करण्यात आली.

'चेरियापानी' जहाजाचं वैशिष्ट्य : ही सागरी सेवा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI) द्वारे चालवली जाईल. तामिळनाडूहून श्रीलंकेला अवघ्या तीन तासांत घेऊन जाणाऱ्या क्रूझचं नाव आहे 'चेरियापानी'. या जहाजात १५० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असून ते पूर्णपणे वातानुकूलित आहे. मात्र, ही फेरी सेवा केवळ १० दिवस चालणार असून त्यानंतर ती बंद करण्यात येईल. ईशान्य मान्सूनमुळे बंगालच्या उपसागरात वादळ येण्याची शक्यता असल्यानं, नागापट्टिनम आणि श्रीलंका दरम्यानची ही सेवा मार्च २०२४ पर्यंत बंद राहिल.

सागरी सेवेचा उद्देश : ४० वर्षांनंतर सुरू होत असलेल्या या सागरी सेवेचा उद्देश १९०० च्या सुरुवातीला निर्माण झालेल्या ऐतिहासिक सागरी संबंधांना पुनरुज्जीवित करण्याचा आहे. चेन्नई आणि थुथुकुडी मार्गे कोलंबोहून जाणारी इंडो-सिलोन एक्सप्रेस १९८३ मध्ये श्रीलंकेतील गृहयुद्धामुळे बंद पडली होती. ही सेवा सुरू करण्यासाठी भारत सरकारनं तामिळनाडू मेरीटाईम बोर्डाला नागपट्टिनम बंदरातील सुविधा अपग्रेड करण्यासाठी मदत केली. त्याचप्रमाणे श्रीलंका सरकारनं कंकेसंथुराई बंदरात आवश्यक पायाभूत सुविधा विकसित केल्या. ही सेवा सुरू करण्यामागे भारत सरकारचा उद्देश शेजारी देशांशी संपर्क वाढवण्याचा आहे.

प्रवास खर्च : क्रूझचं भाडं ६,५०० रुपये + १८ टक्के जीएसटी असेल. अशाप्रकारे प्रति व्यक्ती ७,६७० रुपये लागतील. मात्र उद्घाटनाच्या निमित्तानं भाड्यात ७५ टक्के सूट देण्यात आली होती. १४ ऑक्टोबरला एका दिवसाचं तिकीट भाडं २,३७५ रुपये + १८ टक्के जीएसटी प्रति व्यक्ती होतं. उदघाटनाच्या दिवशी ३५ लोकांनी क्रूझ बुकिंग केलं होतं. प्रवाशांना क्रुझमध्ये ४० किलोपर्यंतचं सामान मोफत नेण्याची परवानगी असेल.

हेही वाचा :

  1. Operation Ajay : इस्रायलवरुन दुसरं विमान धडकलं दिल्लीत; 235 भारतीयांना आणलं सुखरुप
  2. PM Narendra Modi Worship: पंतप्रधान मोदींनी कैलाशाचे दर्शन घेऊन केले ध्यान, शंखासह डमरू वाजून केली शिवभक्ती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.