ETV Bharat / bharat

FIR on Dhirendra Shastri: प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल

author img

By

Published : Mar 24, 2023, 6:10 PM IST

अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या बागेश्वर पीठाधीश धीरेंद्र शास्त्री यांच्यावर उदयपूर येथे झालेल्या धर्मसभेत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR ON BAGESHWAR PEETHADHISH DHIRENDRA SHASTRI FOR GIVING PROVOCATIVE SPEECH IN UDAIPUR
प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल

उदयपूर (राजस्थान) : बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कुमार शास्त्री यांच्या विरोधात चिथावणीखोर भाषण दिल्याच्या आरोपावरून शुक्रवारी जिल्ह्यातील हाथीपोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयपूरमध्ये नववर्षानिमित्त आयोजित धर्मसभेला संबोधित करण्यासाठी बागेश्वर पीठाधीश धीरेंद्र कुमार शास्त्री गुरुवारी गांधी मैदानावर पोहोचले. तिथे त्यांनी भाषण दिल्यानंतर हातीपोल पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंदू राष्ट्र अन् कन्हैया खून प्रकरण : धीरेंद्र शास्त्री यांनी उदयपूरच्या गांधी मैदानावर भाषण केले होते. उदयपूरच्या गांधी मैदानावर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कुमार शास्त्री आणि कथाकार देवकीनंदन ठाकूर यांनी धर्मसभेला संबोधित केले होते. या दोघांनी आपापल्या भाषणात देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचा आणि प्रसिद्ध कन्हैया खून प्रकरणाचा मुद्दा जोरदारपणे मांडला.

धीरेंद्र शास्त्री यांनी हे वक्तव्य केले : धार्मिक सभेत बागेश्वर धामचे पीठाधीश पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी हिंदूंना जाती-जातींमध्ये फूट पाडणं थांबवायला हवं, असं आवाहन उपस्थितांना केलं. जाती अनेक असल्या तरी आपण सर्व हिंदू एक आहोत. त्यांनी दोन्ही हात वर करून सध्याच्या समाजाला सीताराम आणि हनुमानजींची शपथ घ्यायला लावली की आजपासून आम्ही हिंदू एक आहोत, जातीजातीत विभागणार नाही. राम-कृष्णाला विरोध करणाऱ्यांना आता चोख प्रत्युत्तर दिले जाईल. जोपर्यंत देश हिंदू राष्ट्र घोषित होत नाही तोपर्यंत शांत बसू नका, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले होते.

उदयपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला : बागेश्वर धाम पीठाधीश धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कुंभलगड किल्ल्यावर भगवा फडकवल्याप्रकरणी आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी उदयपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाबाबत उदयपूर शहराचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रशील ठाकूर म्हणाले की, पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी दोन समुदायांमध्ये तेढ वाढवणारे भाषण दिले आहे. त्यामुळे राजसमंदच्या कुंभलगडमध्ये काही तरुणांच्या वतीने अराजक माजले आहे. पोलिसांनी कुंभलगड येथून 5 तरुणांना अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, राजसमंद येथील केलवाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस काय म्हणाले : त्याचवेळी प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात उदयपूरच्या हाथीपोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उदयपूरचे एसपी विकास शर्मा यांनी सांगितले की, धर्मसभेत धार्मिक भावना भडकवणारी भाषणे देण्यात आली. याबाबत हातीपोल पोलीस ठाण्यात धीरेंद्र शास्त्री यांच्याविरुद्ध धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: राहुल गांधी लोकसभा निवडणूक लढवण्यास ठरणार का अपात्र?

उदयपूर (राजस्थान) : बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कुमार शास्त्री यांच्या विरोधात चिथावणीखोर भाषण दिल्याच्या आरोपावरून शुक्रवारी जिल्ह्यातील हाथीपोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयपूरमध्ये नववर्षानिमित्त आयोजित धर्मसभेला संबोधित करण्यासाठी बागेश्वर पीठाधीश धीरेंद्र कुमार शास्त्री गुरुवारी गांधी मैदानावर पोहोचले. तिथे त्यांनी भाषण दिल्यानंतर हातीपोल पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंदू राष्ट्र अन् कन्हैया खून प्रकरण : धीरेंद्र शास्त्री यांनी उदयपूरच्या गांधी मैदानावर भाषण केले होते. उदयपूरच्या गांधी मैदानावर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कुमार शास्त्री आणि कथाकार देवकीनंदन ठाकूर यांनी धर्मसभेला संबोधित केले होते. या दोघांनी आपापल्या भाषणात देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचा आणि प्रसिद्ध कन्हैया खून प्रकरणाचा मुद्दा जोरदारपणे मांडला.

धीरेंद्र शास्त्री यांनी हे वक्तव्य केले : धार्मिक सभेत बागेश्वर धामचे पीठाधीश पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी हिंदूंना जाती-जातींमध्ये फूट पाडणं थांबवायला हवं, असं आवाहन उपस्थितांना केलं. जाती अनेक असल्या तरी आपण सर्व हिंदू एक आहोत. त्यांनी दोन्ही हात वर करून सध्याच्या समाजाला सीताराम आणि हनुमानजींची शपथ घ्यायला लावली की आजपासून आम्ही हिंदू एक आहोत, जातीजातीत विभागणार नाही. राम-कृष्णाला विरोध करणाऱ्यांना आता चोख प्रत्युत्तर दिले जाईल. जोपर्यंत देश हिंदू राष्ट्र घोषित होत नाही तोपर्यंत शांत बसू नका, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले होते.

उदयपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला : बागेश्वर धाम पीठाधीश धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कुंभलगड किल्ल्यावर भगवा फडकवल्याप्रकरणी आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी उदयपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाबाबत उदयपूर शहराचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रशील ठाकूर म्हणाले की, पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी दोन समुदायांमध्ये तेढ वाढवणारे भाषण दिले आहे. त्यामुळे राजसमंदच्या कुंभलगडमध्ये काही तरुणांच्या वतीने अराजक माजले आहे. पोलिसांनी कुंभलगड येथून 5 तरुणांना अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, राजसमंद येथील केलवाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस काय म्हणाले : त्याचवेळी प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात उदयपूरच्या हाथीपोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उदयपूरचे एसपी विकास शर्मा यांनी सांगितले की, धर्मसभेत धार्मिक भावना भडकवणारी भाषणे देण्यात आली. याबाबत हातीपोल पोलीस ठाण्यात धीरेंद्र शास्त्री यांच्याविरुद्ध धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: राहुल गांधी लोकसभा निवडणूक लढवण्यास ठरणार का अपात्र?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.