आंध्रप्रदेश - श्रीशैलम धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणामधून ३ लाख ७५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. हे पाणी आता नागार्जुन सागर धरणाला जाऊन मिळेल.
तेलंगणातील जुराला धरणातून सोडण्यात आलेले पाणी श्रीशैलम धरणामध्ये मोठ्या प्रमाणात आले होते. त्यामुळे श्रीशैलम धरणामध्ये ४ लाख क्युसेक पाण्याचा साठा वाढला होता. त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
कृष्णा नदी खोऱ्यातही जोरदार पाऊस झाल्याने पुन्हा जुराला धरणातील पाणी साठ्यात वाढ होणार आहे. ते पाणीही पुन्हा जुराला धरणामध्ये सोडण्यात येत आहे.