राज्य सरकारवर केंद्र सरकार दबाव आणत आहे, आणि त्यासाठी ईडीसारख्या संस्थांचा वापर करत आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. याबाबत ते आज सकाळी माध्यमांशी बोलत होते. यासोबतच, कंगना रणौतच्या अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने केलेली कारवाई ही बेकायदेशीर कशी असू शकते, याचा आपण अभ्यास करणार असल्याचेही राऊत म्हणाले.