मुंबई - आजाद मैदान येथे मराठा समाजाच्या तरुणांनी आंदोलन केले आहे. मराठा आरक्षणाचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे यावर स्थगिती आलेली असताना न्यायालयाने स्थगिती देण्यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीला संरक्षण मिळावे, अशी मागणी या आंदोलकांनी यावेळी केली आहे. राज्य सरकारकडून त्यांच्या नोकरांना संरक्षण देण्यात यावे. मात्र, राज्य सरकार जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला. या संदर्भातील 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी यांनी घेतलेला आढावा...