येत्या २ ते ३ दिवसात विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी घुडघ्याला बाशिंग बांधले आहे. गुरुवारी भाजपच्या महाजनादेश यात्रेचा नाशिकमध्ये समारोप झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टिका केली. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास व्यक केला. पाहूया याच सभेत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर साधलेला निशाणा लय खासमधून....
Last Updated : Sep 20, 2019, 5:58 PM IST