महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'पक्ष जी जबाबदारी देईल, त्याला योग्य न्याय देणार'

By

Published : Jan 3, 2020, 12:37 PM IST

जालना - खातेवाटप आज किंवा उद्या होईल, त्यामध्ये मला कोणतेही खाते दिले तरी, त्याला योग्य न्याय देण्याचे काम करेन, अशी प्रतिक्रिया मंत्री राजेश टोपे यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना दिली. आतापर्यंत जवळपास सात ते आठ खात्याचा मंत्री म्हणून मी काम केले होते. त्यामुळे तो अनुभव माझ्याकडे असून पक्ष देईल ती जबाबदारी योग्यरित्या पार पाडेन, असेही टोपे यांनी सांगितले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज (शुक्रवार) पहिल्यांदाच ते जालन्यात त्यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details