तुम्हाला काहीतरी सांगायचंय : लॉकडाऊन नंतर कसं सुरु आहे तृतीयपंथींचं आयुष्य; पाहा ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट!
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गेल्या कित्येक महिन्यांपासून व्यवहार बंद होते. आपल्या सर्वांनाच याचा फटका बसला. मात्र, ज्यांचे हातावर पोट आहे, अशा लोकांना याचा सर्वाधिक फटका बसला. यामध्ये तृतीयपंथींचाही एक मोठा वर्ग आहे. रेल्वे, दुकाने, सिग्नल अशी विविध ठिकाणे तृतीयपंथींची कामाची ठिकाणे आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये हेच बंद होते. तृतीयपंथींनी काय केले इतके दिवस? कुठे होते ते? आणि आता हळूहळू अनलॉक होत असताना त्यांच्यासाठी कशी परिस्थिती आहे, याबाबत 'ईटीव्ही भारत'च्या 'तुम्हाला काहीतरी सांगायचंय' या सदरात आपण जाणून घेऊ या...
TAGGED:
तृतीयपंथी आणि लॉकडाऊन